Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

सोनी इंडियाचा जागतिक शटर सिस्टमसह१ फूल फ्रेम इमेज सेन्सर असलेला जगातील पहिला कॅमेरा, अल्फा 9 III बाजारात

नवी दिल्ली: सोनी इंडियाने आज अभूतपूर्व असा नवीन अल्फा 9 III हा जागतिक शटर सिस्टमसह फूल फ्रेम इमेज सेन्सर असलेला जगातील पहिला१ कॅमेरा बाजारात आणला. आकर्षक आणि प्रभावशाली अश्या या नवीन ग्लोबल...

एयर इंडियातर्फे भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्याच्या माध्यमातून नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच

गुरुग्राम – एयर इंडिया या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने आज ‘सेफ्टी मुद्राज’ हा कंपनीचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच केला. या व्हिडिओमध्ये भारताच्या समृद्ध संस्कृतीच्या माध्यमातून सुरक्षेशी संबंधित...

बँक ऑफ इंडियातर्फे शेतीशी संबंधित खास फेस्टिव्ह ऑफर्स

मुंबई,- बँक ऑफ कृषी उपकरणे आणि कृषी वाहन या दोन योजनांवर आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स लाँच केल्या असून त्या ३१ मार्च २०२४ पर्यंत खुल्या राहातील. शेतकरी आणि शेती उद्योजकांना जाणवणाऱ्या महत्त्वाच्या समस्येवर – आवश्यक वित्तीय सहाय्य मिळवण्यावर तोडगा काढण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  बँकेच्या कृषी वाहन आणि कृषी उपकरण कर्ज योजनेअंतर्गत शेतीशी संबंधित महत्त्वाच्या घटकांसाठी टर्म कर्ज सुविधा पुरवली जाते. त्यामध्ये शेती उपकरणे, वाहतुकीची साधने यांचा समावेश होतो. कृषी वाहन कर्ज योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण त्यामध्ये वाहनाची ९० टक्के एक्स शोरूम किंमत दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, तर शेती उद्योजकांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची गरज नसते. शेती उपकरणांसाठी खर्चाच्या ८५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनांचे वेगळेपण म्हणजे, त्या शेतकरी व शेती उद्योजकांना भरीव लाभ देतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या छुप्या खर्चाचा समावेश नसून त्यासाठी लागणारी कागदपत्रांची प्रक्रियाही थेट आहे. हे कर्ज प्रकार ग्राहकाच्या सोयीनुसार, सोपी अर्ज प्रक्रिया असलेले व जलद वितरण करणारे आहेत. बँक ऑफ इंडियाची ही बांधिलकी सहज व प्रभावी वित्त पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती बँकेचे प्रयत्न दर्शवणारी आहे. बँकेने शेतकरी व शेती उद्योजकांना सक्षम करण्याचे, आधुनिक शेतीमधील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी बळ देण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याशिवाय हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शेती उत्पन्न आणि उत्पादनक्षमता वाढवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. ही केवळ वित्त योजना नाही, तर अधिक समृद्ध शेती भविष्याच्या उचललेले लक्षणीय पाऊल आहे.

79% भारतीय सुट्टीवर असताना घराच्या सुरक्षेची करतात चिंता

मुंबई,21 फेब्रुवारी,2024: सुट्ट्या म्हणजे आराम करणे, टवटवीत करणे आणि रोजच्या धकाधकीतून विश्रांती घेणे. आपल्या घराबद्दल सतत चिंता करत राहणे ही गोष्ट सुट्टीच्या दिवशी आपल्यापैकी कोणालाही अगदीच शेवटची असते. तरीही, गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी, गोदरेज आणि बॉईसचा व्यवसाय, गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सच्या ‘Live Safe, Live Freely’ या नवीन संशोधन अभ्यासात असे आढळून आले आहे की अशी चिंता अनेकदा सुट्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यत्यय आणतात. याबाबत बोलताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे बिझनेस हेड श्याम मोटवानी म्हणाले की, ‘LiveSafe, LiveFreely’ या अभ्यासाचे निष्कर्ष हे उघड करतात की सुट्टीतील प्रवासी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेच्या चिंतेत कायम असतात. दारं नीट लावली होती की नाही हे प्रश्न त्यांच्या मनात वेकेशनवर असताना रेंगाळत राहतात. हे स्पष्ट आहे की चिंतामुक्त प्रवासासाठी घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे सर्वात आवश्यक आहे. घराच्या सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या व्हेकेशनचा पूर्ण आनंद लुटता येतो. डिजिटल लॉकसारख्या प्रगत उपायांसह, व्यक्ती आता चिंतामुक्त प्रवास करू शकतात, कारण ते हे लॉक दूरस्थपणे मोबाईल ॲपद्वारे Wi-Fi सह जगातील कोठूनही ऑपरेट करू शकतात. गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्समध्ये, सुरक्षिततेशी तडजोड न करता व्यक्तींना मुक्तपणे जगण्यासाठी चिंतामुक्त करणारे अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आहे.” ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचा उद्देश भारतीयांच्या जीवनशैलीबद्दल आणि घराच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल मौल्यवान माहिती देणे, त्यांना मानसिक शांती आणि चिंता न करता जगण्याचे स्वातंत्र्य देणे हा आहे. प्रवास हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा फोकस क्षेत्र म्हणून उदयास आला असून, प्रतिसादकर्त्यांपैकी 79% लोकांना सर्व दारे आणि खिडक्या व्यवस्थित लॉक केल्या आहेत की नाही याविषयी व्हेकेशनवर असताना सतत चिंता वाटत असते. शिवाय, 40 टक्के लोकांनी वृद्ध पालकांनी त्यांच्या चाव्या विसरल्याबद्दल किंवा हरवल्याबद्दल आणि लॉक आउट केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.जर त्यांच्या घराची चिंता त्यांना नसेल तर ते लांब व्हेकेशनला वर्केशनमध्ये बदलू इच्छितात असे 48 टक्के लोकांचे म्हणणे असल्याचे या संशोधन अभ्यासात दिसून आले आहे. टेक गॅजेट वापरू इच्छितात घराची सुरक्षा दिवसातून एकदा तरी तपासू इच्छितात असे 49 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 29 टक्के लोक म्हणतात की ते त्यांच्या घराची सुरक्षितता ऑफिसमध्ये बसून दर तीन तासांनी तपासतील. सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब करताना मानवी वर्तन समजून घेण्याचे उद्दिष्ट ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचे आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांमध्ये 2,000 व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे. 

जावा येझदी मोटारसायकल्स चा फेब्रुवारीत जयपूर आणि लखनऊ येथे मेगा सर्व्हिस कॅम्प

·         तीन दिवसीय सेवा शिबिराचे उद्दिष्ट दोन्ही शहरांमधील 2019-2020 जावा ग्राहकांना सेवा देणे हे असेल. ·         ग्राहकांना मदत करण्यासाठी, प्रमुख मूळ उपकरणे निर्माते देखील शिबिरात उपस्थित राहतील ·         पुढील...

Popular