Industrialist
मलबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे भव्य अनावरण
भारताच्या वैविध्यपूर्ण लग्न समारंभाचा उत्सव
नोव्हेंबर 25, 2025:
प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी...
अमृतांजन हेल्थकेअरचा ग्राहकांचा आवडता पिवळा बाम पुन्हा तयार होणार!
गेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजनचा पिवळा बाम म्हणज अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतीयांच्या घरी रात्री पलंगावर हा बाम हमखास आढळतो. प्रवासातही हा बाम वापरणारी अनेक मंडळी दिसून येतात. घरातील कुणालाही डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास झाल्यास एका हातातून दुस-या हातात प्रेमाने दिलेला हा बाम आश्वासक स्पर्शाने आधार देतो. शांत आणि सुखद सुगंधाने वेदनेपासून आराम मिळतो. कित्येक वर्षांच्या आधारामुळे आणि या बामच्या अस्तित्वामुळे अनेकांच्या सुंदर आठवणी तयार झाल्या आहेत. अमृतांजन हेल्थकेअरचा पिवळा बाम अनेकांच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला आहे. हा विश्वास गेल्या १३० वर्षांतील कधीही न डगमगलेल्या खात्रीचे प्रतीक आहे.
जुन्या आठवणींना उजाळा देत अमृतांजन हेल्थकेअरने आपल्या लोकप्रिय आणि आयकॉनिक पिवळ्या बामला पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले आहे. क्लासिक काचेच्या बाटलीतील पिवळा बाम लोकांना सर्वात जास्त आवडतो. पिवळ्या बामचि पुनरावृत्ती अविस्मरणीय असावी याकरिता प्रत्येक बाटलीत २५ टक्के अतिरिक्त बाम देण्यात आला आहे. अमृतांजनच्या विश्वासावर आणि आरामदायी उपचारांवर पिढ्यानपिढ्या जपलेले ग्राहक उत्तरोत्तर वाढत राहतील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.
बाजारात पिवळा बाम परत येत असल्याची माहिती सर्व ग्राहकांना पोहोचवण्यासाठी अमृतांजनने दोन नव्या जाहिरातींची निर्मिती केली आहे. शारीरीक वेदना कार्यालयीन ठिकाण, प्रवास ते अगदी साध्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कामकाजांत व्यत्यय आणतात. दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणा-या वेदनांवर अमृतांजनचा पिवळा बाम लोकांना सहज मुक्त करतो. वेदनेच्या भागावर बाम लावताचक्षणी लोकांना नैसर्गिकरित्या झटपट दिलासा मिळतो. बामचा वापर केल्यानंतर लोकांना त्या क्षणांचा पूरेपूर आनंद घेता येतो. अमृताजनंच्या या बामची ही किमया दोन्ही जाहिरातींमध्ये प्रभावीपणे मांडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अमृतांजनचा पिवळा बाम औषधाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील विश्वासार्ह सोबती म्हणून वावरला आहे. या बामच्या वापराने अनेकांना पिढ्यानपिढ्या आराम मिळाला आहे. आता हा बाम जुन्या आकर्षक काचेच्या बाटलीत शक्तीशाली जाहिरातींसह पुन्हा सर्वांसमोर येत आहे. नव्याने सादर झालेला हा बाम वेदनाशमनाचे आश्वासन पाळतो. अमृतांजन कंपनी आपल्या ग्राहकांना शाश्वत आराम देण्याची आधुनिक काळाची जबाबदारी पार पाडत मूल्यांच्या अपेक्षाही पूर्ण करते.
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. संभू म्हणाले, ‘‘गेल्या शतकांहून अधिक काळ भारतातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या रोजच्या वेदना निवारण क्षणांसाठी अमृतांजन बामवर विश्वास ठेवला आहे. १८९३ मध्ये पहिल्यांदा अमृतांजन वेदनाशमन बामचे बाजारात अनावरण झाले होते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात अनेक घरांत पिढ्यानपिढ्या अमृतांजनच्या पिवळ्या बामचे अस्तित्व टिकून आहे. आता बाजारात पुन्हा उपलब्ध होताना ग्राहकांना अपेक्षित गोष्टींची पूर्तता केली आहे. ग्राहकांना अजून चांगला आराम मिळेल, अगोदरपेक्षा जास्त बाम वापरता येईल तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग राहील याकडे आम्ही लक्ष दिले आहे. काचेच्या बाटलीत मिळणारा हा पिवळा बाम केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नसून, आमची १३० वर्षांची अविरहित वचनबद्धताही दर्शवते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी दर्शवलेली काळजी आता अजूनच सक्षम झाली आहे.’’
अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्री. मणी. भगवतीश्वरन म्हणाले, हा पिवळा बाम ग्राहकांसाठी औषधोपचारांसह ओळख आणि विश्वासाही भावना आहे. प्रत्येक कुटुंबासाठी या बामसोबत एक आठवण जोडलेली आहे. या पुनप्रेक्षणाने आम्ही नवीन आठणी निर्माण करु इच्छितो. बामसाठी काचेच्या बाटल्यांचे वेष्टन हे जबाबदारीक आणि भावनिक निर्णयात्मक पाऊल आहे. अमृतांजन आपल्या मूळ तत्त्वांशी पुन्हा जोडला गेला आहे. नव्या पिढ्यांसाठीही हा बाम प्रभावी आणि महत्त्वाचा ब्रँण्ड राहील याची खात्री आहे.
बाजारात पिवळा बाम पुन्हा उपलब्ध करुन देत अमृतांजनने ग्राहकांच्या वेदनाशमनाची आणि आरामाची परंपरा कायम ठेवली आहे. ही अखंड परंपरा यापुढेही प्रत्येक घरात कायम राहील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.
मुंबईतील ड्रायव्हर्ससाठी स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ऊबर आणि सुलभ इंटरनॅशनल यांची भागीदारी
सुरक्षित स्वच्छता आणि सुलभ सार्वजनिक सुविधांच्या माध्यमातून ड्रायव्हर्सचे आरोग्यस्वास्थ्य उंचावणे
मुंबई, 20 नोव्हेंबर 2025: भारतातील अग्रगण्य राइडशेअरिंग प्लॅटफॉर्म ऊबर आणि स्वच्छता आणि सामाजिक सुधारणा यांचे अग्रणी सुलभ इंटरनॅशनल यांनी वर्ल्ड टॉयलेट...
पुणे देशभरात सर्वाधिक योगदान देणारे शहर म्हणून उदयास आले आहे – आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंड
पुणे: आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जवळपास ३१,०१५ कोटी रूपयांची मोठ्या प्रमाणात व्यवस्थापनापंतर्गत मालमत्ता (एयूएम) संपादित केली आहे, तसेच पुणे देशभरात सर्वाधिक योगदान देणारे शहर म्हणून उदयास आले आहे. फंडाचा पुण्यातील वाढत्या एयूएम प्रमाणामधून शहरातील गुंतवणूकदारांची लार्ज-कॅप इक्विटी धोरणांप्रती वाढती पसंती दिसून येते, ज्यामध्ये स्थिरतेसह दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीचे संतुलन आहे.
पुण्यातील वैविध्यपूर्ण गुंतवणूकदार प्रोफाइलमध्ये आयटी, ऑटोमोबाइल व उत्पादन क्षेत्रांमधील व्यावसायिक, व्यवसाय मालक आणि उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडच्या शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोनाला प्राधान्य दिले आहे. २००२ मध्ये सुरू झालेल्या (पूर्वीचा फ्रण्टलाइन इक्विटी फंड) या फंडाने बाजारपेठ चक्रामध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रबळ २३ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड स्थापित केला आहे आणि पुण्यातील गुंतणूकदारांकरिता दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीसाठी पसंतीचे माध्यम बनला आहे.
२००२ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फंड शाश्वत विकास क्षमता असलेल्या उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप कंपन्यांमधील त्याच्या पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करतो. हा फंड ग्रोथ अॅट रिझनेबल प्राइम (जीएआरपी) तत्त्वाचे पालन करतो आणि मजबूत जोखीम व्यवस्थापन आराखड्याचा वापर करतो. पोर्टफोलिओ रचनेमध्ये व्यापक क्षमता, शक्तिशाली व्यवस्थापन, सर्वोत्तम प्रशासन आणि सातत्यपूर्ण रोखप्रवाह असलेल्या आघाडीच्या व्यवसायांवर भर दिला जातो, ज्यामधून अस्थिर बाजारपेठांमध्ये देखील स्थिरतेची खात्री मिळते.
आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाने सतत विविध कालावधींमध्ये बेंचमार्क इंडेक्सना मागे टाकले आहे आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ३ वर्षांमध्ये व ५ वर्षांमध्ये अनुक्रमे १८ टक्के आणि १७ टक्के परतावे दिले आहेत.
या फंडाच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.चे सीआयओ श्री. महेश पाटील म्हणाले, ''आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंड गुंतवणूकदारांना उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप रिडर्समध्ये स्थिरता व शाश्वत वाढ देण्यासाठी, तसेच उत्तम संधी देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. पुण्याच्या वाढत्या योगदानामधून निदर्शनास येते की पुण्यातील गुंतवणूकदार दीर्घकालीन सातत्यता, मुलभूत तत्त्वे आणि शिस्तबद्ध मालमत्ता निर्मितीला महत्त्व देतात. तसेच यामधून दिसून येते की, गुंतवणूकदांना मुलभूत तत्त्वे आणि प्रशासनाचे पाठबळ असलेल्या शिस्तबद्ध मालमत्ता निर्मितीमध्ये आत्मविश्वास आहे.''
सुरुवातीला १ लाख रूपयांची एकरकमी गुंतवणूक जवळपास ५४ लाख रूपयांपर्यंत वाढू शकते. तसेच, १०,००० रूपयांची मासिक एसआयपी २३ वर्षांमध्ये जवळपास २.५ कोटी रूपयांपर्यंत वाढू शकते. पुणे सर्वात मोठे योगदानकर्ते शहर असल्यामुळे आदित्य बिर्ला सन लाइफ लार्ज कॅप फंडाच्या वाढीमधून दर्जेदार, संशोधनाचे पाठबळ असलेल्या धोरणांप्रती गुंतवणूकदारांच्या वर्तणूकीमधील मोठा बदल दिसून येतो, जेथे या धोरणांमधून स्थिरतेसह शाश्वत मालमत्ता निर्मितीची खात्री मिळते. तसेच यामधून निदर्शनास येते की, पुण्यातील गुंतवणूकदार फंडाचे देशभरातील नेतृत्व आणि दीर्घकालीन गतीला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने संचालक मंडळ आणि नेतृत्व बदलांची घोषणा केली
पुणे, मूळ पुण्यातील असलेल्या आणि आता मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आघाडीवर असलेली रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडला (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) ब्लॅकस्टोनचे भक्कम पाठबळ मिळाले...
