पुणे- आगामी महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने पुन्हा
बहुखांबीनेतृत्वाचा तंबू उभारला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आणि विश्वजित कदम हे तिघे या तंबूचे प्रमुख पदाधिकारी असणार आहेत . याशिवाय अन्य पदाधिकारी देखील या तंबूची धुरा सांभाळणार आहेत. हे आज पुण्यात अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झाले आहे .
बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या नंतर सुरेश कलमाडी यांच्याकडे पुण्याच्या नेतृत्वाची धुरा होती.तोपर्यंत कॉंग्रेसचे शहरात प्राबल्य होते. कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसकडे एकखांबी असे कणखर नेतृत्व उरले नाही . त्यानंतर कॉंग्रेसने सामुहिक नेतृत्वाची कल्पना अंमलात आणली . आणि शहरातील कॉंग्रेसचे प्राबल्य हळू हळू कमी होत गेले . या निवडणुकीतही कॉंग्रेसकडे कणखर असे एक स्थानिक नेतृत्व उरले नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे …. आज काँग्रेस ने आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक घेतली . यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , रत्नाकर महाजन, शहर अध्यक्ष रमेश बागवे , विश्वजित कदम , अभय छाजेड ,अविनाश बागवे, शरद रणपिसे, आदी मान्यवर नेते उपस्थित होते .
यावेळी पत्रकार परिषदेत …पहा आणि ऐका .. नेमके कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण काय म्हणाले ….