महिला शाखांचे उदघाटन हे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व सरकारच्या महिलांसाठीच्या योजना त्यांच्या पर्यंत पोचविण्यासाठी – सौ.मंजुश्री खर्डेकर.
पुणे-
महिला आघाडी चे काम करताना जेव्हा तुम्ही एका स्त्री पर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही एका कुटुंबापर्यंत पोहोचता,ही स्त्रीची शक्ती आहे आणि त्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला होणे गरजेचे आहे असे मत आ.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.शिक्षण मंडळ सदस्य सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी गणेशनगर एरंडवणे येथे व अलंकार पोलिस स्टेशन चौक येथे आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शाखांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.राजकारणातील स्त्रीयांनी आपल्या समाजातील वावराबाबत सजग असले पाहिजे आणि त्यांना चूल आणि मूल याची सांगड घालता आली पाहिजे.राजकारण आणि समाजकारण करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होता कामा नये असे ही त्या म्हणाल्या.चुल आणि मूल ही चौकट सांभाळत असतानाच आज महिला सर्व क्षेत्रात सक्षमतेने स्वतःच्या कामाचा ठसा उमटवित आहेत. 50 टक्के आरक्षण महिलांना आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घेतला पाहिजे. समाजात वावरत असताना नेता म्हणून आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते. असंख्य नजरा आपल्याकडे पहात असतात. आपण त्यांचे role model असतो आणि त्यामुळे आपल्याकडून काहीही चूक होता कामा नये. त्यासाठी आपले चालणे, बोलणे, रहाणीमान त्याला अनुरूपच असले पाहिजे. नेता कधीही चुकता कामा नये.असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या सन्योजक मंजुश्री खर्डेकर यांनी या उदघाटनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की ” केवळ फलक लावला म्हणजे महिला आघाडी चे काम सुरु झाले असे नाही तर या शाखा स्त्री चळवळीचे केंद्र झाले पाहिजे,शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती आपल्या भगिनींना देउन त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.तसेच वस्ती विभागातील महिलांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा असे ही त्या म्हणाल्या.
महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष शशीकलाताई मेंगडे म्हणाल्या ” आपल्याला मिळालेल्या आरक्षणाचा आपण पुरेपूर फायदा करून घेऊन समाजामध्ये काम केले पाहिजे. शाखा ही केवळ बोर्डावर न राहता प्रत्यक्ष कामातुन सक्षमता दाखवण्याची गरज आहे.या फलकांच्या ठिकाणी मतदार नोंदणी पासून सर्व उपक्रम राबविण्यात यावेत व नागरी समस्या सोडविण्याचे हे केंद्र व्हावे असेही त्या म्हणाल्या.
अलंकार पोलिस स्टेशन चौक शाखेच्या प्रमुखपदी सौ अपर्णा निलेश गरुडकर व सौ शाहिस्ता राज तांबोळी यांची निवड करण्यात आली तर गणेशनगर शाखेच्या अध्यक्षपदी सौ प्रमिला विजय फाले यांची निवड करण्यात आली.
यावेळी आ मेधा कुलकर्णी,शशीकलाताई मेंगडे,मंजुश्री खर्डेकर यांच्या समवेत नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,शहर कार्यकारिणी सदस्य अनुराधा येडके,माणिकताई दिक्षीत,प्रभाग अध्यक्ष गौरी करंजकर,प्रभाग ३५ च्या महिला अध्यक्ष स्वातीताई हेर्लेकर,कल्पना पुरंदरे,रमा डांगे,संगीता आदवडे,बागेश्री ठिपसे,श्रद्धा मराठे,किर्ती गावडे,जयश्री तलेसरा, छाया सोनावणे,सरोज कुलकर्णी,रुपाली वाघ, संगिता शेवडे
शुभांगी पवार,रुपाली कांबळे संगीता खाडे,पूजा कोष्टी
कोथरूड मंडल अध्यक्ष प्रकाश बालवडकर,प्रशांत हरसुले,जयंत भावे,राजेन्द्र येडे,राज तांबोळी,निलेश गरुडकर,रमेश चव्हाण,विजय फाले,इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.