देहू : जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा‘ जलसाक्षरता यात्रेचे गाथा मंदिर ( आनंद डोह ) येथे स्वागत करण्यात आले. पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणी कॉन्क्वेस्ट कॉलेजच्या वतीने यात्रेच्या जल कलशाचे पूजन करण्यात आले.
प्रदूषणमुक्त, जलपर्णी मुक्त इंद्रायणीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नरेंद्र चुघ, सुनील जोशी,प्रा. नेहा बोकील, दिनेश जोशी, सोमनाथ म्हसगुडे, किशोर धारिया, विनोद बोधनकर, डॉ. सतीश चव्हाण, अनील कानडे, संदीप चोडणकर, शैलेंद्र पटेल, संतोष महाराज काळोखे, प्रा. पूजा अष्टपुत्रे, अनिल काकडे, चंद्रकांत काळोखे वनविभागाच्या अधिकारी सौ. शिंदे उपस्थित होते
‘जलपर्णी मुक्ती दलाची स्थापना करण्यात आली. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले