पुणे -शहरात थंडीला सुरुवात झाली असून या वातावरणात तयार होणार्या धुक्यामध्ये धूलिकण आणि धूर मिसळून हवा प्रदूषित होते. अशावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, आणि कचरा, पाला पाचोळा, टायर जाळणे बंद करावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी नागरिकांना केले आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रदूषणाची सध्याची पातळी व त्यातील संभाव्य वाढ लक्षात घेता उघडयावर जाळला जाणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि रस्ते बांधणीत कमीत कमी कचरा निर्माण होणे हे दोन उपाय प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा समवेत घेतलेल्या बैठकीत सांगितले होते .आणि महापौरांना त्यानुसार कळविले होते .त्यानंतर महापौरांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे .