पुणे :
‘लष्काराला तयार व्हायला 7 दिवस लागतात, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सीमेवर लढण्यासाठी केवळ 3 दिवसात तयार होऊ शकतात,’ अशा आशयाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान लष्कराचा अवमान करणारे तर आहेच, पण मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारे आहे , अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खा.अॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
भारतीय लष्कराला शिस्त, त्याग, समर्पणाची दीर्घ परंपरा आहे. सीमेवर सतत सज्ज राहून , लढायाकरून भारतीय लष्काराने आपले सामर्थ्य जगाला वेळोवेळी दाखवलेले आहे. संघाला संचलनापलिकडे सेना उभारण्याची परवानगी घटनेने दिलेली नाही, तसा आवही त्यांनी आणू नये. तसेच सैन्याशी तुलना होईल अशी वक्तव्ये करून सैन्याचा तेजोभंग करू नये.’ असे खा. वंदना चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.
स्वातंत्र्य लढ्यात सर्व भारतीय जीवाची पर्वा न करता उतरले होते, तेव्हा संघ मैदानात का उतरला नाही, याचे उत्तर मोहन भागवत यांनी जगाला द्यावे, असेही खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.