पुणे- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी हजारो सत्याग्रही आणि क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद अशा अनेक काँग्रेस नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी देश सुजलाम् – सुफलाम् केला. त्यांच्या दूरदृष्टी मुळे देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला. काँग्रेस व क्रांतीकारक ब्रिटीशांविरूध्द लढल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाची सध्याच्या राजकीय परिस्थित पाहता काँग्रेसला पुन्हा एक मोठा संघर्ष करावा लागेल असे वाटते. संविधान व लोकशाहीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तत्व आहे.’’

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा, माजी आमदार , माजी महापौर दीप्ती चवधरी, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे,प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,माजी आमदार मोहन जोशी, , सुनिल मलके, वीरेंद्र किराड, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, लतेंद्र भिंगारे, जयंत किराड, प्रवीण करपे, गौरव बोराडे, राजेंद्र भुतडा, बाळासाहेब अमराळे, धनंजय दाभाडे, सुभाष जेधे, हर्षद हांडे, चैतन्य पुरंदरे, राजेंद्र पडवळ, राजाभाऊ कदम, द. स. पोळेकर, अशोक लांडगे, ॲड. निलेश बोराटे, शाम काळे, राजू साठे, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, आसिफ शेख, अस्लम बागवान, गुलामहुसेन खान, अर्चना शहा, प्राजक्ता जाधव, प्राची दुधाणे, सीमा सावंत, ज्योती परदेशी, सुंदर ओव्हाळ, उषा राजगुरू, रवि ननावरे, स्वप्निल नाईक, विजय साबळे, हरिदास अडसूळ, रंजना रजपूत, एम. एम. फुलगावकर, , दिलीप लोळगे आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

