“संत रोहिदास महाराज स्वातंत्र्य,समता व श्रमप्रतिष्ठेचे दीपस्तंभ- रवींद्र किरकोळे

Date:

पुणे-“संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी तत्कालीन विषम सामाजिक व्यवस्थेतील वेदनांना निराशेचे रूप न देता त्या आपल्या वाणीचे, विचारांचे आणि भक्तीचे सामर्थ्य बनविले.त्यांच्या शब्दांतून केवळ एका संताचे जीवन व्यक्त होत नाही,तर शोषित,वंचित आणि श्रमजीवी समाजाच्या वेदनांना आवाज मिळतो.त्यांनी श्रमाला ईश्वरपूजेचे स्थान दिले आणि ‘कष्ट हेच खरे वैभव’ हा जीवनमंत्र जगासमोर ठेवला.त्यामुळे संत रोहिदास महाराज हे श्रमप्रतिष्ठेचे चिरंतन प्रतीक ठरले,”असे प्रतिपादन अखिल भारतीय सामाजिक समरसता गतिविधीचे सहसंयोजक रवींद्र किरकोळे यांनी केले.”श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास,पुणे” ( महाराष्ट्र ) व “सामाजिक समरसता मंच” महाराष्ट्र गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी सद्गुरू श्री रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित “कीर्तन–प्रवचन–व्याख्यान महोत्सव” आणि ‘६५१ पुष्प समर्पण अभियान’ संकल्प समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.रवींद्र किरकोळे पुढे म्हणाले,”संत रोहिदास महाराजांच्या दृष्टीने माणसाचे मोठेपण जन्मावर किंवा जातिव्यवस्थेवर नव्हे,तर कर्म, चारित्र्य आणि अंतःकरणाच्या निर्मळतेवर अवलंबून होते.धार्मिक व आध्यात्मिक अधिकार हा बाह्य कर्मकांडात नसून अंतःकरणाच्या शुद्धतेत असतो, हे त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले.त्यांनी भक्तीला समता, मानवता आणि आत्मसन्मानाची दिशा दिली. त्यामुळे त्यांचे जीवन सामाजिक परिवर्तन आणि आध्यात्मिक क्रांतीचे तेजस्वी उदाहरण ठरते.”त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या स्वातंत्र्यवादी विचारांवरही प्रकाश टाकत सांगितले की,”त्या काळातील पारतंत्र्य,सामाजिक गुलामी आणि अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला निर्भय स्वर संत रोहिदासांच्या वाणीतून उमटतो.पराधीन जीवन हे मानवी प्रतिष्ठेला कलंक आहे,अशी त्यांची ठाम भूमिका होती. ‘जो पारतंत्र्यात राहतो,तो उपवासालाच पात्र ठरतो’ या विचारातून त्यांनी स्वातंत्र्य,आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.”संत रोहिदासांचे साहित्य लोकभाषेत आणि बोलीभाषेत असल्यामुळे ते थेट जनमानसाशी संवाद साधते,असे सांगत त्यांनी त्यांच्या प्रत्येक दोह्यातून समता, श्रमाचा गौरव,भक्तीची निर्मळता आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रकट होत असल्याचे नमूद केले.”संत रोहिदास महाराज आजही केवळ एका समाजाचे नव्हे,तर संपूर्ण मानवजातीच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचे चिरंतन दीपस्तंभ आहेत”असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प.मोरेश्वर जोशी चऱ्होलीकर यांच्या संत रोहिदास महाराजांवरील भावस्पर्शी कीर्तनाने झाली.समरसता गतिविधीचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनी प्रास्ताविक केले,तर ऍड आनंद गवळी यांनी संत रोहिदासांच्या विचारांचे समकालीन संदर्भांसह विशेष मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर ऍड आनंद गवळी,ह.भ.प.मोरेश्वर जोशी चऱ्होलीकर आणि मुकुंद आफळे उपस्थित होते.तसेच रवी ननावरे ,गीतेश जोशी,डॉ प्रसाद खंडागळे,अविनाश देशपांडे,अनिल भस्मे,गोरख शिंदे,विलास लांडगे,दत्ताजी वाळवेकर,राजेश मठपती,शरद शिंदे,ऍड मुकुंद यदमळ,डॉ.माणिक सोनावणे,धनंजय खुडे,विकास माने,सुरेश महाले,प्रतिभा कुलकर्णी ,ऍड एकनाथ जाविर,शुभांगी पोटभरे, विलास देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवानिमित्त संत रोहिदास महाराजांवरील माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच कार्यकारी मंडळ,कीर्तनकार आणि चरणसेवकांना सन्मानित करण्यात आले.मान्यवरांनी संत रोहिदास महाराजांच्या जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.धनंजय भिसे यांनी केले,तर आभार मुकुंद आफळे यांनी मानले.
निलेश गद्रे
सदस्य ,समरसता मंच ,महाराष्ट्र व गोवा

“संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी भारतीय समाजाला समता, मानवता आणि निर्मळ भक्तीचा कालातीत संदेश दिला.त्यांनी स्त्रीचा सन्मान हा समाजाच्या नैतिकतेचा पाया मानला. मोगलांच्या काळात धर्मांतराच्या प्रवृत्तीला त्यांनी निर्भीडपणे विरोध करत स्वधर्म,स्वाभिमान आणि अध्यात्मिक मूल्यांचे रक्षण केले.
त्यांच्या विचारांना समाजातील सर्व स्तरांतून स्वीकार मिळाल्याने त्यांची शिष्यपरंपरा हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींमध्ये विस्तारली.त्यांच्या वाणीतील सार्वत्रिक मानवतावादामुळेच त्यांच्या पवित्र रचनांना शीख धर्माच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले.
संत रोहिदास यांनी कर्मकांड,जातिभेद आणि बाह्य आडंबर यांना विरोध करून अंतःकरणातील शुद्धता, प्रामाणिक श्रम आणि निर्मळ भक्ती यांनाच खऱ्या अध्यात्माचे अधिष्ठान मानले.त्यांच्या वाङ्मयातून स्वातंत्र्य,समता, बंधुता,सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांचे बीजारोपण झाले.त्यामुळे संत रोहिदास महाराज हे केवळ संतकवी नव्हते,तर सामाजिक समरसता आणि मानवमुक्तीचे महान प्रणेते होते.”

भारतभरात संत रोहिदास महाराज यांच्या जीवन व कार्यावर कीर्तन,प्रवचन,व्याख्यानांच्या माध्यमातून ६५१ कार्यक्रमाचा संकल्प करण्यात आला.या संकल्प समारंभातून संत रोहिदास महाराजांचा समता, श्रमप्रतिष्ठा,बंधुता,स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्ष (आठवले) कडून अभिवादन

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त...

अण्णा भाऊंचे साहित्य जागतिक मानवतावादाकडे वाटचाल करणारे : डॉ. बळीराम गायकवाड

मसापतर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन पुणे : साम्यवादातील वर्गसंघर्ष आणि डॉ. आंबेडकरांनी...