Home Blog Page 682

पश्चिम महाराष्ट्रात ४१६ कोटींच्या वीजबिलांची थकबाकी; वीजबिल भरा सहकार्य करा- महावितरण

0
  • वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरू राहणार

पुणे – विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १९ लाख १९ हजार २३१ ग्राहकांकडे ४१६ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत घरगुती १७ लाख २८७ ग्राहकांकडे २९४ कोटी १६ लाख, व्यावसायिक १ लाख ९३ हजार ७६७ ग्राहकांकडे ८८ कोटी २९ लाख आणि औद्योगिक २५ हजार १७७ ग्राहकांकडे ३४ कोटी ३६ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख ३३ हजार ९२३ ग्राहकांकडे २६१ कोटी ४९ लाख, सातारा जिल्ह्यात २ लाख २८ हजार ग्राहकांकडे ३२ कोटी ४१ लाख, सोलापूर जिल्ह्यात २ लाख ९२ हजार ६७० ग्राहकांकडे ६० कोटी ६३ लाख, सांगली जिल्ह्यात २ लाख २६ हजार ३८३ ग्राहकांकडे ३२ कोटी ५८ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ३८ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर होत आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा आर्थिक अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे कळकळीचे आवाहन आले आहे. 

क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला समर्थ गौरव पुरस्कार जाहीर

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
  • समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा 

पुणे : समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी इन्स्टिट्यूटचे  डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल ललित राय (निवृत्त) हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. बुधवार, दिनांक २ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, निवृत्त कर्नल चितळे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, डॉ. अ.ल.देशमुख, हनुमंत बहिरट, यांसह पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रख्यात उयोजक पुनीत बालन हे आहेत. रुपये ११ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील होणार आहे.
संजय सातपुते म्हणाले,  देशसेवेसाठी कार्यरत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा जागविण्यासाठी काम  क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट करीत आहे/ कर्नल बल्लेवार हे संस्थेचे डीन आहेत. यामाध्यमातून सैनिकांसाठी व समाजासाठी संस्था मोठे कार्य सातत्याने करीत आहे. 
दिनांक २ आॅक्टोबर १९९९ रोजी समर्थ प्रतिष्ठान ची स्थापना झाली. संजय सातपुते हे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. यापूर्वी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी, भोई फाउंडेशनचे डॉ. मिलिंद भोई, मेळघाट येथील उमंग संस्थेचे ऋषिकेश खिलारे, बाबा आमटे विकास संस्थेचे अनंत झेंडे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते यांसह सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कैलास कोद्रे, तुकाराम गुजर यांना पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा जीवन गौरव पुरस्कार

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही होणार विशेष सन्मान
  • पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे : सहकार व बँकिंग क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) तर्फे सन २०२२-२३ वर्षासाठी पुणे कँन्टोमेंट बँकेचे अध्यक्ष कैलास कोद्रे आणि सन २०२३-२४ वर्षासाठी प्रेरणा सहकारी बँक थेरगावचे संस्थापक संचालक तुकाराम उर्फ भाऊसाहेब गुजर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी अ‍ॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, सुनिल रुकारी, निलेश ढमढेरे, डॉ. प्रिया महिंद्रे, बाळकृष्ण उंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही यावेळी विशेष सन्मान होणार आहे. तसेच मोहोळ यांच्या हस्ते बँकांचा सन्मान केला जाणार आहे. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षात ज्या बँकांनी शून्य टक्के एन.पी.ए. राखला, त्या बँकांचा गौरव करण्यात येणार आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ज्या बँकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला, त्या बँकांना देखील सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत. तर, रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सह. प्रबंधन संस्थानच्या निदेशक डॉ.हेमा यादव आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अ‍ॅड.साहेबराव टकले म्हणाले, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. (महाराष्ट्र) गेली ४५ वर्षे सातत्याने बँकिंग क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, प्रसार व प्रसिद्धीचे काम करीत आहे. अनेक अडचणींचा सामना करीत, तीव्र स्पर्धेतही सहकारी बँका केवळ टिकून आहेत असे नाही, तर प्रगतीही करीत आहेत. त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी करणा-या बँकांना असोसिएशनतर्फे गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शन’ शनिवार २८ पासून

  • महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे आयोजन ; दोन दिवसीय प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे : महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे राज्यातील महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी  ‘एमएलए नवरात्र उत्सव प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ आणि २९ सप्टेंबर रोजी जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये पुण्यासह संगमनेर, धाराशिव, धुळे, नगर, लोणावळा या ठिकाणाहून महिला उद्योजिका प्रदर्शनास सहभागी झाल्या असून विविध प्रकारचे ७५ स्टॉल्स आहेत, अशी माहिती आयोजिका अभिलाषा बेलुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला योगिता सिंघ, अपूर्वा पाटकर, दिशा जोशी, नम्रता जाधव टीकारे आदी उपस्थित होते. 
दोन दिवसीय प्रदर्शन दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे. या दरम्यान मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पधेर्चे देखील आयोजन करण्यात आले आहे. नऊवारी ठसका, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, दोन दिवसीय विनामूल्य गरबा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात नवरात्र आणि दिवाळीसाठी लागणारे कपडे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे साहित्य लहान मुलांची खेळणी अशा अनेक गोष्टी पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत.
‘लाडका ग्राहक योजना’ या अंतर्गत रुपये ५० हजारापेक्षा अधिक खरेदी करतील, त्यांना हिरा गिफ्ट म्हणून मिळणार आहे. तसेच रुपये १५ हजारापेक्षा अधिक खरेदी करतील त्यांना कुबेर की भेट म्हणून देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीतो अपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ प्रदान

  • जीतो अपेक्स इंटरनॅशनलला विजय भंडारींच्या रूपानेसर्वात तरुण अध्यक्ष लाभला हे पुण्यासाठी अभिमानास्पदप्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ प्रदान

पुणे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने जीतो अपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ने सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी.चोरडिया यांच्या हस्ते श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ साधना सदन पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.प.पू. गुरुदेव श्री गौतम मुनिजी म.सा., प.पू. श्री चेतन मुनिजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुग्गड, आदेश खिंवसरा, जैन श्रावक संघ साधना सदनचे पदाधिकारी  आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले,”जैन समाजाच्या मोठ्यासंघटनेच्या जीतो अपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी विजय भंडारी यांची निवड झाली असून, २०२४ ते २०२६ या कालावधीत ते काम पाहणार आहेत. जीतो अपेक्स श्रमन आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष, जीतो पुणेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. जीतोचे भारत देशातील ७० शहरात आणि जगभरात २९ ठिकाणी चॅप्टर आहेत. ४८ हजार सभासद असलेल्या जीतो संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी विजय भंडारी सांभाळणार आहेत.”
“भंडारीयांनी पेपर इंडस्ट्रीमध्ये अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच सामाजिक क्षेत्रात जीतो संघटनेबरोबर लायन्स क्लब, आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन युगल धर्म संघ, सावली वृद्धाश्रम आदी संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. लायन्स क्लब इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ चे प्रांतपाल म्हणून २०२३ ते २०२४ या कालावधीत त्यांनी काम केले आहे. लायन्स क्लब्जच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट प्रांतपालपदी नियुक्ती झालेले विजय भंडारी एकमेव लायन आहेत. विशेषतः पुण्यातून मेगा स्केलवरील सामाजिक कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने आयोजन करीत अल्पावधीत जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला,” असे प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी सांगितले.
उद्योग व व्यापार क्षेत्रात जगभरात कार्यरत असलेल्या जैन समाजातील उद्योजक व व्यापारी, महिला व युवा पिढीच्या तसेच जैन संस्थांच्या विकासासाठी प्रामुख्याने काम करेन. तसेच जैन समाजाच्या सर्व पंथांचे गुरुसंत, साधु व साध्वी मसा यांच्या उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करेन, असे उद्गार विजय भंडारी यांनी काढले. सूर्यदत्त संस्थेने मला सन्मानित केले, याचा आनंद वाटत असल्याचे भंडारी यांनी नमूद केले. सूत्रसंचालन आदेश खिंवसरा यांनी केले.

‘पूर्णवा हेरिटेज’ स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाचे उल्लेखनीय यश

पिंपरी, पुणे (दि.२५ सप्टेंबर २०२४) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल आणि चेन्नई येथील जॉय ऑफ गिव्हींग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या “पूर्णवा हेरिटेज प्रश्नमंजुषा” स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने उल्लेखनीय यश मिळवले. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १३ शाळांमधून १०४ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या अनुश्री काटमोरे, वैदेही वर्मा आणि हर्षित पाटील यांच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या लेखी, मौखिक स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांमध्ये इतिहास, पौराणिक कथा, नाणी, प्राचीन साहित्य, क्रीडा स्पर्धा, शिक्षण, खगोलशास्त्र ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांचा समावेश होता.
विजेत्या स्पर्धकांना डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलच्या कार्यकारी संचालक डॉ. रोहिणी पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, उपक्रम प्रभारी स्वालेहा मुजावर, शिक्षिका प्रविणा मोरे, अंजली गुगळे, प्रशासन अधिकारी मनीष ढेकळे आदी उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी देखील विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नागपूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर दि. २५ सप्टेंबर २०२४
नागपूर महानगरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडले असून शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे हे निश्चित झाले आहे त्यामुळे राज्य भरात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसीं सेलच्या सरचिटणीस कल्पनाताई मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढेंगरे, यांच्या नेतृत्वात राजकुमार जी वानखेड़े योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती ताई सोमकुंवर , संदीप वानखेड़े , लीला बारापात्रे, मंदा गनवीर ,राजू रामटेके , महेश भाई ,बिरजू धीमान , जावेद भाई शेख, असलम शेख, अज़हर शेख यांच्यासह नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते. राहुल गांधी यांचे देशाच्या विकासचे व्हीजनच देश एकसंध ठेवत देशाला खर्‍या अर्थाने जागतिक महासत्ता बनवू शकते, असे मनोगत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रवेशामुळे नागपूर महानगरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे.

पिंपरी चिंचवड आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २५ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यमुना नगर, पिंपरी चिंचवड येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी हा जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यास आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवार, एमसीव्हीसी बायफोकल उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु, शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर १२ वी, पदविकाधारक, पदवीधारक व पदव्युत्तर अशा नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गडदरे तसेच प्राचार्य एस. डी. साबळे यांनी केले आहे.
0000

पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल

पुणे, दि. २५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट व पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे आदेश पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त कार्यालयाच्यावतीन जारी करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत.

शहरातील भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून), निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग व पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- सेनादत्त पोलीस चौकी- उजवीकडे वळण घेवून म्हात्रे पूल डावीकडे डी.पी. रोड, सावरकर चौकामधून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल- उजवीकडे वळण घेवून डी. पी. रोड, सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल-सावरकर पुतळा-मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक-सातारा रोड मार्केट यार्ड जक्शन वरून शिवनेरी रोड असे बसेस पार्किंग मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे व त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहनही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
0000

विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी स्टेट बँकेचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान

0
  • बिनोदकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन; स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशनचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

पुणे, ता. २५: “विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी ५ वर्षे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामध्ये स्टेट बँकेसह बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील,” असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक (मनुष्यबळ विकास) बिनोदकुमार मिश्रा यांनी केले.

स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन (मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्र सर्कल्स) पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते. असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीत, तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले. स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना ‘संस्थापक एल. एन. पाबळकर स्मृती सुवर्णपदक’ प्रदान करून सपत्नीक (वृषाली) सन्मानित करण्यात आले.

महालक्ष्मी लाॅन्समध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सरव्यवस्थापक अरविंदकुमार सिंग, उपमहाव्यवस्थापक हरिशकुमार राजपाल, मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग, पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक सतीशकुमार, कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकजकुमार बर्नवाल, फेडरेशनचे अध्यक्ष जी. के. गांधी, सचिव डी. के. बसू, असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे, सचिव सुधीर पवार आदी उपस्थित होते.

बिनोदकुमार मिश्रा पुढे म्हणाले, “देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टेट बॅंकेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आर्थिक उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ९९ साली बँकेचा नफा ८५ कोटींचा होता, तो कित्येक हजार पटींनी वाढला आहे. त्यात या सर्व निवृत्त सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे परिश्रम, समर्पण आणि निष्ठा, यामुळेच बँकेने प्रगतीचे शिखर गाठले आहे. याची बँकेला जाणीव आहे.”

“निवृत्तीनंतर आरोग्य जपण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. निवृत्त सहकाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्टेट बँक नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करते. पेन्शन योजनेत सातत्याने सुधारणा होत आहेत. विमा योजनेचा अधिक फायदा घ्यावा. ई-फार्मसीचा पर्याय नेण्यावर, निवृत्त सहकार्यासाठी राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न व्हावेत,” असेही त्यांनी नमूद केले.

अरविंदकुमार सिंग म्हणाले, “बॅंकेचे निवृत्त सहकारी म्हणजे बँकेचे विस्तारित कुटुंब आहे. असोसिएशनचे कार्य भक्कम विश्वासाच्या पायावर उभे असून, निवृत्त सहकाऱ्यांना सर्वाधिक फायदे मिळवून देणारी बॅंक, असा लौकिक बँकेने मिळवला आहे. निवृत्त सहकाऱ्यांच्या सुविधांचा, मागण्यांचा, अडचणींचा बँकेने सदैव सकारात्मक विचार केला आहे आणि यापुढेही करीत राहील.”

सुधीर पवार यांनी असोसिएशनच्या वतीने काही मागण्यांचा उच्चार केला. निवृत्त सहकाऱ्यांना आरोग्य सुविधांसाठी दवाखाने, रुग्णालये सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत. तसेच ई-फार्मसीचा पर्याय उपलब्ध नसल्याने दुर्गम भागांत अनेक समस्या आहेत.

‘बँकेमध्ये दीर्घकाळ सेवा बजावताना अनेक बुजुर्ग अधिकारी भेटले. त्यांच्याकडून अतिशय मोलाच्या गोष्टी शिकता आल्या. बँकेच्या आजच्या अभिमानास्पद वाटचालीत सर्व सहकाऱ्यांच्या योगदानाचा मोठा वाटा आहे,’ असे मनोगत गांधी यांनी मांडले.

पंकजकुमार बर्नवाल म्हणाले, ‘देशात बँकेच्या निवृत्त सहकाऱ्यांची संख्या तब्बल ३ लाखांच्या घरात आहे. पण ते असोसिएशनच्या माध्यमातून असे काम करत आहेत, की ते रिटायर्ड झाले आहेत, पण टायर्ड झालेले नाहीत, असे म्हणावेसे वाटते’.

विलास गंधे यांनी आपल्या मनोगतात पाबळकर यांच्या स्मृतीनिमित्त प्रदान केलेले सुवर्णपदक हा त्यांचाच आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. डी. के. बसू, अमित जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले. वसुधा डोंगरे आणि सॅन्ड्रा पोरे यांनी सूत्रसंचालन केले.

येत्या ३ वर्षात भारत तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर

0


एमआयटीत डब्ल्यूपीयूत विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम

पुणे, २५ सप्टेंबर ः ” शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा आणि युवा या घटकांच्या माध्यमातूनच आपला देश विकसित भारत बनणार आहे. ज्या दिवशी भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल त्यावेळेस महाराष्ट्र सुध्दा १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. पुढील तीन वर्षात भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनेल. असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी व्यक्त केला.

भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने आयोजित विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस व कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांनी अनुराग ठाकुर यांचा विशेष सत्कार केला.
अनुराग ठाकुर म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार २०४७ मध्ये भारतातील युवक संपूर्ण जगावर राज्य करेल. विकसीत भारत एक नारा नाही तर संकल्प आहे. विकसीत भारतासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे. भविष्यातील भारतासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांमध्ये  १५ लाख कोटी पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजूर दिली आहे.”
“देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशातील शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये व त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्वामीनाथन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी पीएम किसान सन्मान योजना आहे. चंद्रयान ने देशात क्रांती घडविली. विकसित भारतासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सर्वाेत्तम हवे. त्यासाठी यावर्षी ११ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशात रोज ९१ किमी रस्ते  बनविले जात आहेत. ७० वर्षात जेवढे एअरपोर्ट बनविण्यात आले नाही, त्यापेक्षा अधिक एअरपोर्ट बनविण्यात आले आहेत. “
सरकार  १ कोटी युवकांना देशातील ५०० टॉप कंपन्यामध्ये इंटर्नशिप देणार आहे. पब्लिक पेपर लिंक होऊ नये म्हणून नवा कडक कायदा, मेडिकल कॉलेज मधील सिटांची संख्या वाढविणे,  ४ कोटी १० लाख युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, महिला सबलीकरणावर भर, टुरिझम वर कार्य, महिलांना लखपती बनविण्याचे कार्य, ४ कोटी घरे बनविणे, १४ कोटी महिलांना गॅस कनेक्शन,   ५३ कोटी लोकांचे बँक अकांउन्ट उघडणे,  प्रत्येक घराघरात वीज . तसेच देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, ” या देशात सर्वात मोठी युवा शक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी भारत विकासासाठी युवा शक्तीला जोडणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे युवकांसाठी भारतीय छात्र संसद, सोशल लिडरशीप डेव्हल्पमेंट प्रोग्राम व राईड यासारखे अनेक कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. ”
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
विकसीत महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, विकसीत महाराष्ट्र बनविण्यासाठी अटल सेतूची निर्मिती, रोजगार आणि युवकांना अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. भारत जेव्हा ५ ट्रिलियन अर्थ व्यवस्था बनेल तेव्हा महाराष्ट्र १ ट्रिलियन अर्थ व्यवस्था म्हणून उद्यास येईल.”

विरोधी पक्षाच्या खासदारांच्या,आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? -खा.सुप्रिया सुळे

पुणे – पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आज त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या वेळी त्या बोलताना म्हणाल्या की महाविकास आघाडीच्या एकाही खासदाराला,आमदाराला एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. याउलट महाविकास आघाडीच्या खासदार,आमदारांवर मात्र निधीचा पाऊस पाडण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या खासदार,आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? असा प्रश्न खा.सुळे यांनी विचारला आहे.

या आंदोलनात खासदार सुप्रियाताई सुळे,प्रशांत जगताप,आमदार अशोकबापू पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे,भारती शेवाळे, स्वाती पोकळे, मृणाल वाणी, स्वाती ढमाले,महादेव कोंढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की,भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – अवघ्या ३२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वर्षात वारंवार पुण्यात येतात भूमिपूजन, उदघाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येतायत, तेव्हा असं वाटतं की, हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे? की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी? अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली.

मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी होत आहे. या अगोदर ५ वेळा महामेट्रोच्या कार्यक्रमासाठी मोदी पुण्यात प्रत्तक्ष आले होते आणि एका टप्प्याचे उदघाटन त्यांनी कलकत्ता येथून आभासी पद्धतीने केले होते. मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मोदी पुण्यात आले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेतली होती. डिसेंबर २०१८ मध्ये हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी ते पुण्यात परत आले होते आणि बालेवाडी स्टेडियमवर त्यांनी सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२२ रोजी गरवारे ते वनाज मार्गाचे उदघाटन मोदी यांनी केले आणि कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी सभा घेतली.

१ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या टप्प्याचे उदघाटन त्यांनी केले आणि शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२४ रोजी कलकत्याहून त्यांनी आभासी पद्धतीने रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे उदघाटन आणि पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते निगडी या मार्गाची कोनशिला त्यांनी बसवली आणि आता ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या उदघाटनासाठी उद्या येत आहेत आणि स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभाही घेणार आहेत. विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राजकीय फायद्यासाठी सभा घेण्याचा खटाटोप चालला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

मेट्रो चा पहिला टप्पा सुद्धा अजून पूर्ण झालेला नाही. तरीही मोदी महामेट्रोचा सातवा कार्यक्रम करीत आहेत. भाजप मोठी विकासकामे करीत असल्याचा देखावा निर्माण करून एक प्रकारे पुणेकरांची शुद्ध फसवणूक करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उदघाटन मोदी यांनी केले. त्यानंणर पाच महिने उलटूनही टर्मिनल कार्यान्वित झाले नाही. त्या पाठोपाठ केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा उदघाटन केले, त्यालाही दोन महिने उलटून गेले. परिस्थिती जैसे थे आहे. ही स्टंटबाजी भाजप का करीत आहे? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

भाजपकडे विकासाची दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यासाठी हे खटाटोप चालू आहेत. मेट्रोच्या ३२ किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्ती वारंवार पुण्यात येऊन कार्यक्रम करते, हेही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही, असे मोहन जोशी म्हणाले.

पुणेकरांनी अजून किती वर्ष त्रास सहन करायचा
मेट्रो प्रकल्प हा काँग्रेस पक्षाने आणला. प्रकल्पाकरिता आवश्यक त्या मंजुऱ्याही काँग्रेस सरकारने मिळवल्या २०१४ नंतर हा प्रकल्प वेगाने पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे प्रकल्पाला विलंब होत गेला. प्रकल्प ११हजार कोटींचा होता. विलंबामुळे खर्च वाढत गेला. मेट्रो आल्यास वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, या आशाही मावळल्या. वाहतुकीच्या त्रासातून सुटका कधी होईल? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शौचास गेलेल्या मुलास बिबट्याने उचलून नेले:जुन्नरची घटना, ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

जुन्नर : मोकळ्या मैदानात शौचास गेलेल्या एका 9 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत घडली आहे.

आज दिनांक २५-०९-२०२४ रोजी तेजेवाडी ( ता. जुन्नर )गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत वीटभट्टी कामगार यांचा मुलगा चि. रुपेश तानाजी जाधव वय- ९ वर्ष हा पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला असताना लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा- ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने आजोबांना न जुमानता मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मुलाची शोधाशोध सुरु केली, एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाची बॉडी शेजारच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळाली. सदर शोधकार्य विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांचे अधिनस्त 30-35 वनकर्मचारी आणि रेस्कु टीम सदस्य यांनी गावातील आजी- माजी उपसरपंच व इतर जबाबदार नागरिक, तरुण यांच्या मदतीने राबविले. त्यानंतर मुलाची बॉडी शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठविण्यात आली. घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 10 पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. (लगतच्या शिरोली गावहद्दीत 2 पिंजरे यापूर्वीच कार्यरत होते.
काल रात्री लगतच्या परिसरातील विद्युत डीपी जळल्यामुळे व पावसामुळे तेथे विजपुरवठा खंडित होता. त्यामुळे घरामागे असलेल्या अंधारात ही दुर्दैवी घटना घडली.

बचावार्थ गोळी डोक्यात नाही,पायात मारतात, एन्काउंटर कसे म्हणता? कोर्टाने सुनावले..

0

4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही,

मुंबई:बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे मान्य करावे? आरोपीला हातकडी लावली होती. त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती.

कोर्ट म्हणाले – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

कोर्ट म्हणाले – आरोपीने ट्रिगर दाबताच 4 जणांना त्याच्यावर सहजपणे नियंत्रण मिळवता आले असते. तो काही फार बलवान माणूस नव्हता. त्यामुळे पोलिसांचा युक्तिवाद मान्य करणे फार अवघड आहे. याला एन्काउंटर म्हणता येत नाही. पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होईल.

मृत अक्षय शिंदेचे वडील अण्णा मारुती शिंदे यांनी आपल्या मुलीच्या एन्काउंटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. अक्षयच्या वडिलांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. अक्षय शिंदेचे एन्काउंटर विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयच्या वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक डोळ्यापुढे ठेवून एन्काउंटर

या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत अण्णा मारुती शिंदे यांच्या वकिलांनी अक्षय शिंदेची हत्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केल्याचा आरोप करत थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी चौकशी करण्याचीही मागणी केली. अण्णा शिंदेचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, मुलाने रिमांड कॉपीत कोणताही त्रास नसल्याचे म्हटले होते. जामिन मिळून शकतो का? यावर त्याने जामीन मिळू शकतो असेही सांगितले. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करण्यास सांगितले होते.

माझ्या मुलामध्ये पिस्तूल हिसकावून घेण्याची हिंमत नव्हती. या प्रकरणातील मोठ्या माशांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला. महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे कदाचित त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली असावी.

‘देवाभाऊचा न्याय’ असे मेसेज फिरत आहेत

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर सोशल मीडियात देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय, असे मेसेज फिरत आहेत. हे असे असेल तर मग न्यायव्यवस्थेची गरजच काय? आरोपीच्या पत्नीने बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार, तिथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रॅन्चकडे सोपवण्यात आले होते. कोर्टाच्या परवानगीने या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलिस कस्टडी ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आली होती. त्यासाठी त्याला नेले जात होते. त्यावेळी आरोपी शांत बसला होता. त्यावेळी तो आक्रमक होईल अशी कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नव्हती असे सरकारनेच कोर्टाला सांगितले आहे, अशी बाबही याचिकाकर्त्या पीडित कुटुंबीयांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्याच्या शरीरात थोडीही ताकद नव्हती

अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एन्काउंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे 500 रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.

तळागाळात कायद्याचे राज्य असावे
याचिकाकर्ते पुढे म्हणाले, तळागाळात कायद्याचे राज्य असले पाहिजे. पोलिस कुणाला दोषी ठरवायचे व कुणाला नाही हे ठरवत आहेत. ते अतिशय वाईट उदाहरण सादर करत आहेत. न्यायालये आणि आम्ही येथे का आहोत? पोलिस आणि गृहमंत्री असा न्याय करत आहेत. अशा कृत्यांमुळे पोलिसांना असे गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चकमकीचे कौतुक करणारे पोस्टर कोर्टाच्या पटलावर सादर केले. त्यावर न्यायमूर्तींनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी वकिलांना असे दस्तावेज रेकॉर्डवर न ठेवता गुणवत्तेवर युक्तिवाद करण्याची तंबी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रश्न आणि राज्य सरकारची उत्तरे

राज्य सरकार – या घटनेची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी 307 व अपघाती मृत्यू अहवाल (ADR) असे 2 एफआयआर दाखल करण्यात आलेत. या दोन्हीची सीआयडी चौकशी करत आहे.

न्यायमूर्ती – वेणेगावकर (राज्य सरकारचे वकील) आम्हाला टाइमलाइनबद्दल सांगा. टाइमलाइनबद्दल काहीही गोपनीय नाही.

न्यायमूर्ती – आरोपीला बोईसरहून बदलापूरला का हलवण्यात येत होते?

राज्य सरकार – कारण, गुन्हा तिकडे बदलापूरला घडला होता.

न्यायमूर्ती – त्यावेळी त्याच्यासोबत कोणते अधिकारी होते? गुन्हे शाखेचे होते की ठाणे पोलिस होते?

राज्य सरकार – होय.

न्यायमूर्ती – आरोपीला पोलिस कोठडी मंजूर होती काय?

राज्य सरकार – होय.

कोर्ट : अक्षय शिंदेला घेऊन जाणारा अधिकारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा होता?राज्य सरकार: होय.कोर्ट: घटना घडली ती जागा रिकामी होती की जवळपास वसाहती आणि घरे होती?

राज्य सरकार : उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला एक छोटेसे शहर होते. घटनेची माहिती मिळताच अक्षय आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही कोणते हॉस्पिटलमध्ये गेला? ते किती दूर होते?

राज्य सरकार : कळव्याजवळील शिवाजी हॉस्पिटल. हा प्रवास जवळपास 25 मिनिटांचा होता. हे जवळचे हॉस्पिटल होते.

न्यायालय : एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीवर कारवाई होत असताना निष्काळजीपणा कसा? SOP काय आहे, त्याला हातकडी घातली होती का?

राज्य सरकार : घातली होती, त्याने पाणी मागितले होते.

कोर्ट : पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का?

राज्य सरकारः FSL द्वारे फिंगर प्रिंट्स घेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही म्हणताय की आरोपीने 3 गोळ्या झाडल्या, पोलिस कर्मचाऱ्याला एक गोळी लागली, उरलेल्या 2 कुठे गेल्या? सहसा, स्वसंरक्षणार्थ आपण पायाला गोळी मारतो की हाताला?

राज्य सरकार : अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही, अशी मोकळी प्रतिक्रिया दिली.

कोर्ट : वाहनात 4 अधिकारी होते आणि त्यांना एक आरोपी आवरता आला नाही, असे कसे मानायचे?

राज्य सरकार: ही ऑन द स्पॉट प्रतिक्रिया होती.

न्यायालय : ते टाळता आले नसते का? पोलिसांची गाडी आहे. पायात गोळी मारणे हे स्वसंरक्षणार्थ केले जाते हे सामान्य माणसालाही माहीत आहे का? आरोपीवर गोळी झाडणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय?

राज्य सरकार: ते सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आहेत.

कोर्ट – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

राज्य सरकार : निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्वतंत्र एजन्सींनी तपास केला पाहिजे. राज्य सीआयडी आणि एसीपी याचा तपास करत आहेत.

कोर्ट : तुम्ही पोलिस अधिकाऱ्याचे बोटांचे ठसे घेतले का? सर्व अधिकाऱ्यांचे बोटांचे ठसे घ्या, आम्ही या प्रकरणाकडे प्रत्येक अंगाने पाहत आहोत. फॉरेन्सिक टीमची वाट पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःच बोटांचे ठसे घ्यायला हवे होते. सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?

राज्य सरकार : आम्ही वाटेतच सरकारी आणि खासगी इमारतींचे फुटेज सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते.

कोर्ट : आम्हाला आणखी एक गोष्ट हवी आहे. फॉरेन्सिक टीमला हे शोधण्यासाठी विचारा की, आरोपीला दुरून किंवा पॉइंट ब्लँक रेंजवर गोळी घातली गेली. त्याला कुठे गोळी लागली? यात पोलिसांचा सहभाग असला तरी आम्हाला या प्रकरणाचा निष्पक्ष तपास हवा आहे. आम्हाला शंका नाही, पण आम्हाला सत्य हवे आहे. आरोपीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला आहे का?

राज्य सरकार : नाही.

न्यायालय : शस्त्रे व्यवस्थित जप्त केली आहेत का?

राज्य सरकार : होय, ते एफएसएलकडे पाठवले आहेत.

अक्षयचे वडील : घटनेच्या एक दिवस आधी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्हाला मृतदेह दफन करायचा आहे, पण त्यासाठी जागा मिळत नाही.

कोर्ट : पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असे दिसते की, गोळी पॉईंट ब्लँक रेंजमधून चालवण्यात आली होती. आरोपींना काही शस्त्र दिले होते का? त्याने पिस्तूल हिसकावून घेतले असे म्हणत आहात?

राज्य सरकार : शस्त्रे दिली नाहीत. त्याने पिस्तूल हिसकावले नव्हते, ते हाणामारीत पडले होते.

कोर्ट : आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते रुग्णालयात मृत घोषित करेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जतन करावे, अशी आमची इच्छा आहे.