Home Blog Page 681

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवाशांनी उड्या मारल्या:दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या ट्रेनने चिरडले; 11 ठार

जळगाव-कर्नाटक एक्सप्रेसने पुष्पक एक्सप्रेसच्या अनेक प्रवाशांना उडवल्याची भयंकर घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 11 जण ठार, तर 40 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी तीव्र वळण होते. परिणामी, दुसऱ्या ट्रॅकवर बसलेल्या प्रवाशांना रेल्वे येत असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळेच वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क क्रांतीने इतक्या मोठ्या संख्येने लोक चिरडले गेले. घटनास्थळ मुंबईपासून 400 किमी अंतरावर आहे.

मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला म्हणाले, मेडिकल रिलीफ ट्रेन भुसावळहून निघाली आहे. या अपघातात कोणत्याही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नाही.

ब्रेक लावताना ट्रेनच्या चाकातून धूर निघत होता
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही ट्रेन यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनला जात होती. तर पुष्पक एक्सप्रेस (12533) लखनौहून मुंबईला जात होती. ब्रेक लावताना पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून धूर निघत होता. त्यामुळेच ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरल्या आणि प्रवाशांनी घाबरून डब्यातून बाहेर उड्या मारल्या.

आर्थिक सर्वसमावेशकता आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी भीमने (BHIM)केली फिनटेक यात्रा सोबत भागीदारी

डिजिटल पेमेंट जागरूकता आणणाऱ्या ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत निवडक एनजीओजमधील
200 हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देणे

मुंबई: एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लि. (NBSL) द्वारे समर्थित भारताचे प्रमुख डिजिटल पेमेंट ॲप भीम हे फिन टेक यात्रा 2025 चे प्रमुख भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. फिन टेक यात्रा हा 10,000 किमी लांबीचा मोठा प्रवास आहे, ज्याचा उद्देश देशभरातील विविध वित्तीय सेवांमधील प्रमुख कंपन्यांना ओळखणे, ते समजून घेणे आणि त्याच्या प्रगतीसाठी काम करणे हे आहे. समुदायांचे सक्षमीकरण करून आर्थिक समावेशनाला चालना देत भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीला गती देण्याचे या धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट आहे.

या सहकार्याचा एक भाग म्हणून, निवडक एनजीओ मधील 200 हून अधिक व्यक्तींना ट्रेन-द-ट्रेनर मॉडेल अंतर्गत प्रशिक्षित केले जाईल. यासोबतच डिजिटल पेमेंट जागरूकता पसरवण्यासाठी त्यांना ज्ञान आणि अन्य साधनाने सुसज्ज केले जाईल. तळागाळातील प्रशिक्षकांना सक्षम बनवत डिजिटल पेमेंटचे हे फायदे देशातील सर्वात दुर्लक्षित आणि दुर्गम भागात पोहोचण्याची खात्री हा उपक्रम करतो.

या भागीदारीबद्दल बोलताना, NBSL चे मुख्य व्यवसाय अधिकारी राहुल हांडा म्हणाले, “भीमची फिनटेक यात्रा 2025 सोबतची भागीदारी डिजिटल अंतर मिटवण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित आणि कार्यक्षम डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सबद्दल शिक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक आणि डिजिटली सशक्त भारत निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. या भागीदारीमुळे फिनटेक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मिळणाऱ्या संधींबद्दल आम्ही उत्साहित आहोत.”

भारताला डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी फिनटेक यात्रा 2025 ही एक चळवळ आहे. हे एक व्यासपीठ आहे जे स्टार्ट-अप सारखे नवोपक्रम पुरवणाऱ्या आणि वित्तीय संस्था, भांडवलदार आणि मोठे कॉर्पोरेट्स यांसारख्या नावीन्याची आवड असलेल्या इच्छुकांमध्ये संबंध प्रस्थापित करते. अनेक शहरांना भेटी देऊन, फिनटेक इनोव्हेटर्ससोबत बोलून, आणि BHIM सारख्या प्लॅटफॉर्मसह सहयोग करून, ही अनोखी यात्रा संपूर्ण देशात अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यासाठी तयार आहे.

द फिनटेक मीटअपचे संस्थापक अभिशांत पंत म्हणाले, “भीम सोबतची आमची भागीदारी यंदाच्या या यात्रेतील एक प्रमुख आणि परिवर्तनकारी घटक आहे. UPI इकोसिस्टममध्ये BHIM चे सिद्ध नेतृत्व हे सुनिश्चित करते की आर्थिक समावेशता ही केवळ एक दृष्टी नाही तर देशभरातील लाखो लोकांसाठी वास्तव आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवण्याचे आमचे एकत्रित ध्येय आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील फिनटेक संस्थापकांना कल्पना प्रमाणीकरण, नेटवर्क सपोर्ट आणि व्हेंचर कॅपिटलच्या संदर्भात मार्गदर्शन पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन वित्तीय सेवांमध्ये अधिक डिजिटल होण्यासाठी ते तयार होतील आणि इतरांनाही तयार करतील.”

अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा-अब्रारअली दलाल

कर्करोगाविषयीचे उपचार आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष द्यायला हवे

पुणे-अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे असे येथे सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक अब्रारअली दलाल यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,’“आपण आता २०२५ च्या अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलो आहोत. या बजेटच्या पूर्वतयारीच्या चर्चेत देशातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुधारणबद्दल आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

यंदाच्या अर्थसंकल्पात कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा ठरेल. आरोग्य सेवेतील तरतुदींत टायर २ आणि टायर ३ शहरांतील कर्करोगाविषयीचे उपचार आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष द्यायला हवे. कर्करोगाच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा, व्यापक तपासणी आणि रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्वतोपरी काळजी आदी घटकांचा विचार केला जावा जेणेकरुन रुग्णांचे जीवनमान आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल. त्याशिवाय वैद्यकीय उपचारांत अत्याधुनिक सेवा उपलब्ध होण्याकरिता कर्करोग रेडिएशन उपकरणांवरील सीमा शुल्क आणि सर्वसामान्य करप्रणालीत (जीएसटी) घट व्हायला हवी. यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेकरिता भारताचा जगभरात नावलौकिक होण्यास मदत होईल.

रुग्णालयाचा दैनंदिन कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक असणा-या वस्तू आणि सेवा खरेदीवरील सर्वसामान्य कर (जीएसटी) कमी होईल, ही आम्हां सर्वांना आशा आहे. रुग्णांना आरोग्य सेवांवरील जीएसटी सवलतींचा फायदा मिळतो. मात्र रुग्णालयीन प्रशासनाला रुग्णालयातील आवश्यक खरेदी आणि विक्रेत्यांच्या आर्थिक बिलांवर जीएसटीत सूट मिळत नाही. परिणामी, रुग्णालयांना आर्थिक भार सहन करावा लागतो. जीएसटी खर्चाचा थेट परिणाम रुग्णालयाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर होतो. रुग्णालयात आवश्यक असलेले अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण यांसारख्या आवश्यक घटकांवर आम्हांला गुंतवणूक करताना मर्यादा येतात. यामुळे रुग्णालयांसाठी जीएसटी दरात कपात केल्यास आर्थिक ताण नक्कीच कमी होईल आणि आम्हांला रुग्णांना परवडणा-या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट उपचार देता येतील.

वैद्यकीय कर्मचा-यांची कमतरता हा देखील एक गहन प्रश्न आहे. सरकारने वैद्यकीय शिक्षणासाठी निधी तसेच स्कॉलरशिप उपलब्ध करुन द्यावी. वैद्यकीय शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्यावात तसेच आरोग्य सेवेतील कामकाजांच्या ठिकाणीही सर्व सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात. टायर २ आणि टायर ३ शहरांत मोबाईल क्लिनिक आणि कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम सुरु केल्यास आरोग्य सेवा तत्परतेने उपलब्ध तर होईल. त्याशिवाय अनेकांना आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तपशीलवार माहिती या केंद्रांमधून मिळू शकेल. 

या सर्व घटकांचा विकास करताना वैद्यकीय पर्यटनाची वृद्धी देखील व्हायला हवी. वैद्यकीय पर्यटनाची  भरभराट झाल्यास निश्चितच आर्थिक सुबत्ता येईल. त्याशिवाय भारत जगभरात उत्तम वैद्यकीय सेवा पुरवणारा देश म्हणून उदयास येईल.

जीडीपी उत्तप्पन्नातून मिळणा-या रकमेतून २.५ टक्के गुंतवणूक आरोग्य क्षेत्रात करण्याची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या वाढीव तरतुदीमळे आरोग्य क्षेत्रातील विकास साधणे शक्य होणार आहे.

हा अर्थसंकल्प सर्व भारतीयांसाठी मजबूत, सर्वसमावेशक आणि अग्रेषित विचारसरणीच्या आरोग्य सेवा प्रणालीला प्रोत्साहन देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. शिवाय या बजेटमधून आरोग्यसेवेतील सुलभता आणि समानता वाढवण्याची अनोखी संधी उपलब्ध होईल अशी आशा आहे.”

एयर इंडियातर्फे एआयवर आधारित ईझेड बुकिंग सुविधा लाँच, सफाईदार आणि वेगाने रिझर्व्हेशन करता येणार

·         ग्राहकांना वेबसाइटवर बुकिंगची प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येणार असून त्यासाठी वेळखाऊ डेटा एंट्री करावी लागणार नाही किंवा वेगवेगळ्या स्क्रीन्स उघडाव्या लागणार नाहीत.

·         पायोनियर एजंटिक एआय इनोव्हेशनमुळे गुंतागुंतीची डिजिटल कामे किमान मानवी हस्तक्षेपासह पूर्ण होणार

गुरुग्राम२२ जानेवारी २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने ईझेड बुकिंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने ग्राहकांना वेबसाइटवरील त्यांची रिझर्व्हेशन्स सध्याच्या तुलनेत कमी स्टेप्समध्ये आणि टेक्स्ट पाठवून किंवा एआय एजंटशी प्रवासाच्या नियोजनबद्दल बोलून करता येणार आहे.

केवळ महाराजा क्लब, एयर इंडियाच्या लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी ही सुविधा खास उपलब्ध करण्यात आली असून या सुविधेमुळे ग्राहकांना एयर इंडियाच्या airindia.com या वेबसाइटवर तिकिट बुक करता येणार आहे. बुकिंग करताना ग्राहकांना वेगवेगळ्या कमांड्सचे पालन करण्याची किंवा स्क्रीन्समधून नॅव्हिगेट करण्याची गरज भासणार नाही. ईझेड बुकिंग सुविधा एयर इंडियाच्या ग्राहकांना सुधारित व सफाईदार अनुभव देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

ईझेड बुकिंगला बुद्धीमान ‘एजंटिक एआय’ टुल्सचा पाठिंबा लाभला आहे आणि हे टुल ट्रॅव्हल एजंटप्रमाणे ग्राहकाच्या गरजा ऐकून घेत त्यानुसार प्रवासाचे नियोजन करेल. ‘एजंटिक एआय’मुळे युजर्सना गुंतागुंतीचे काम मशिन लर्निंगच्या मदतीने मानवी हस्तक्षेपाशिवाय वेगाने करता येईल, तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्णय घेणे सोपे जाईल.

एयरलाइनच्या ग्राहकांसाठी डिजिटल चॅनेल्सवरील रिझर्व्हेशन करताना पेमेंट करण्यापूर्वी व तिकिट मिळवण्यापूर्वी प्रवासाचे तपशील भरणे, उपलब्ध पर्यायांतून निवड करणे विविध स्क्रीन्समधून नॅव्हिगेशन करणे, प्रवाशांविषयी माहिती भरणे इत्यादींचा समावेश असतो. ईझेड बुकिंगद्वारे ही प्रक्रिया कमीत कमी क्लिक्सद्वारे पूर्ण केली जाईल, शिवाय वेबसाइटवरील मल्टी- स्टेप्स कमी करून पेजेसमधून नॅव्हिगेट करण्याची गरज राहाणार नाही.

ईझेड बुकिंग कशाप्रकारे काम करते –

·         सोप्या आणि कमी स्टेप्स – ग्राहकांना त्यांच्या प्रवासाविषयक गरजा सोप्या, नैसर्गिक भाषेत मांडता येतील. उदा. त्यांना ‘Give me the first flight from Delhi to Mumbai tomorrow’ किंवा ‘I need to go to Chennai from Mumbai next Thursday and return on Friday’ असे प्रवासी एजंटशी बोलल्याप्रमाणे आपल्या गरजा सांगता येतील. ईझेड बुकिंगद्वारे तत्काळ संपूर्ण नियोजन उपलब्ध केले जाईल आणि युजर्सना गरजेप्रमाणे त्यात बदल करता येतील किंवा आहे तसेच मान्य करून तिकिट मिळवण्यासाठी पेमेंट करता येईल.

·         व्हॉइस इनपुट्स: प्रवाशांना टेक्स्ट एंटर करण्याऐवजी ईझेड बुकिंगशी बोलता येईल. यामुळे प्रवासाचा हेतू मांडण्यासाठी आणखी कमी प्रयत्न लागतील आणि मानवी संवाद साधल्यासारखा वाटेल.

·         कमीत कमी कमांड्सह बदल किंवा निवडीचे पर्याय – जर प्रवाशांना त्यांना देण्यात आलेले नियोजन पसंत नसेल, तर त्यांना अतिरिक्त माहिती देऊन सहजपणे त्यात बदल करता येतील व हे बदल टेक्स्ट अथवा व्हॉइस कमांड्सद्वारे सांगता येतील. यामध्ये व्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि टेक्स्ट किंवा व्हॉइस ड्रिव्हनचे समीकरण साधल्यामुळे रिझर्व्हेशनची प्रक्रिया वेगवान होते. पर्यायाने ग्राहकाला सतत वेगवेगळ्या स्क्रीन्समधून आधी निवडलेले पर्याय परत परत भरत नॅव्हिगेट करावे लागत नाही.

‘ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी विकसित तंत्रज्ञानाचा लाभ करून देण्यासाठी व त्यांना सफाईदार व इंटेलिजंट डिजिटल इंटरफेज पुरवण्याच्या हेतूने आम्ही आमच्या वेबसाइटवर ईझेड बुकिंग उपलब्ध केले आहे. सुरुवातीला ही सुविधा लॉयल्टी प्रोग्रॅमच्या सदस्यांसाठी असेल. या क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या या उपक्रमाच्या मदतीने आम्ही आमच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर उदयोन्मुख ‘एजंटिक एआय’ क्षमता उपलब्ध करण्याच्या दिशेने प्राथमिक पावले उचलत आहोत. आम्हाला आशा आहे, की प्रवासी या सोप्या, वेगवान आणि सोयीस्कर ईझेड बुकिंग प्रक्रियेचा आनंद घेतील. या सुविधेमुळे आमच्या डिजिटल चॅनेल्सचे अस्तित्व आणखी मजबूत होईल,’ असे एयर इंडियाचे प्रमुख डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्या रामास्वामी म्हणाले.

अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापराचा एयर इंडियाला असलेला अनुभव ईझेड बुकिंग प्रक्रिया ग्राहकस्नेही करण्यात महत्त्वाचा ठरत आहे. ईझेड बुकिंग संकल्पनेच्या डिझाइनचे पेटंट प्रलंबित असून त्याला नुकताच ‘रेड डॉट डिझाइन कॉन्सेप्ट’चा पुरस्कार मिळाला असून तो सिंगापूरच्या रेड डॉट डिझाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे.

ईझेड बुकिंगमुळे एयर इंडियाच्या ऑनलाइन ग्राहकांचा अनुभव उंचावणार असून त्यांना मे २०२३ मध्ये लाँच करण्यात आलेल्या एयर इंडियाच्या नाविन्यपूर्ण एआय- ड्रिव्हन चॅटबॉट ‘AI.g’ चा लाभ घेता येणार आहे. जागतिक विमान उद्योगाच्या पहिल्या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटने ‘AI.g’ ने आतापर्यंत ७ दशलक्ष प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले आहे. त्यात दररोज वेगवेगळ्या विषयांशी संबंधित ५०,००० प्रश्नांचा समावेश आहे. या चॅटबॉटमध्ये स्वायत्तपणे तब्बल ९७ टक्के प्रश्नांची उत्तरे दिली जातात, तर केवळ ३ टक्के प्रश्न मानवी एजंट्सकडे पाठवली जातात.

प्रवाशांना महाराजा क्लब वेबसाइटवर www.airindia.com लॉग इन केल्यावर टॉप नॅव्हिगेशन बारमध्ये ईझेड बुकिंग सुविधा दिसेल. एयर इंडियातर्फे पुढील काही आठवड्यांत ईझेड बुकिंग सुविधा मोबाइल वेबसाइट आणि मोबाइल अपवरही लाँच केले जाणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजने जनरेटिव्ह एआयवर लक्ष केंद्रित केलेल्या इनोव्हेंट २०२४ च्या विजेत्यांची केली घोषणा

·         जून २०२४ मध्ये सुरू झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीज इनोव्हेंटने, मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने, भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जनरेटिव्ह एआयचा वापर करून उत्पादन मूल्य साखळीत नवीन उपाय शोधण्यासाठी प्रेरित केले.

·         या हॅकॅथॉनमध्ये २६७ महाविद्यालयातील ९,३८९ विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला, ज्यामुळे २,५१६ अद्वितीय प्रकल्पांची निर्मिती झाली. हॅकॅथॉनचा समारोप २२ जानेवारी २०२५ रोजी टाटा टेक्नोलॉजीजच्या हिंजवडी, पुणे कॅम्पसमध्ये आयोजित डेमो डेच्या माध्यमातून संपन्न झाला.

·         पहिल्या तीन संघांना एकूण ४.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले, तर डेमो डेमध्ये सहभागी झालेल्या ३९ अंतिम स्पर्धकांना करिअरच्या संधी देण्यात आल्या.

·         टाटा टेक्नॉलॉजीज बिझनेस एक्सलन्स टीम आणि एसएमई (विषय तज्ञ) यांनी ११०० तासांहून अधिक जनरेटिव्ह एआय इनोव्हेशन प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची सुविधा दिली जेणेकरून प्रकल्प टीम/टिमला वास्तविक जगातील अनुप्रयोगांसाठी त्यांच्या कल्पनांचा विस्तार करण्यास मदत होईल.

पुणे २२ जानेवारी २०२५:

टाटा टेक्नोलॉजीज, एक जागतिक उत्पाद अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवांची कंपनी, यांनी टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट हॅकाथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली. जनरेटिव्ह एआयचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करून या हॅकाथॉनचे आयोजन मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्सच्या सहकार्याने करण्यात आले होते. या हॅकाथॉनचा उद्देश भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एक असे व्यासपीठ प्रदान करणे होता, जिथे ते उत्पादन क्षेत्रातील वा वास्तविक-जगातील आव्हानांना उत्तर देणाऱ्या उपाययोजना सादर करू शकतील. हा उपक्रम शैक्षणिक समुदायासोबतच्या कंपनीच्या सहभागामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो संपूर्ण भारतातील तरुण अभियांत्रिकी प्रतिभांमध्ये नवकल्पना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो आणि तरुणांसाठी अधिक चांगले करिअर घडवण्यास मदत होते. पहिल्या दहा संघांनी पुण्याच्या हिंजवडी येथील टाटा टेक्नोलॉजीजच्या मुख्यालयात डेमो डे मध्ये सहभाग घेतला, जिथे त्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप सादर केले आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. अंतिम मूल्यांकन एक प्रतिष्ठित निर्णायक मंडळाने केले, ज्यामध्ये टाटा टेक्नोलॉजीजचे सीईओ आणि एमडी श्री वॉरेन हॅरिस, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री स्वेन पटुश्का, मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक – उत्पादन आणि समूह श्री प्रवीण पंचाग्नुला आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुण्याचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुद यांचा समावेश होता. टाटा सन्समधील ग्रुप इनोव्हेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवी अरोरा यांनी ज्युरींना मार्गदर्शन केले.

चंदीगड विद्यापीठ, मोहाली मधील विजेता संघ, कोडझेफायर, यांना अभियांत्रिकी उत्कृष्टतेसाठी शाश्वत साहित्य एकत्रीकरणासाठी ₹300,000 चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी पटियाला येथील स्पॅनगिट कोडरला कारमधील सुरक्षित अनुभवासाठी एआयचालित आवाज रद्द करण्यासाठी ₹100,000 रोख बक्षीस मिळाले, आणि दुसरे पारितोषिक मिळाले. ₹50,000 चे तिसरे पारितोषिक प्लुटोला, श्री कृष्णा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर कडून त्यांच्या जनरेटिव्ह एआय साठी नेक्स्टजनरेशन इंटरएक्टिव्ह ग्राहक समर्थनासाठी देण्यात आले. मणिपाल युनिव्हर्सिटी जयपूर कडून हॅक्सएस ला त्यांच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठी एआय –चालित दोष विश्लेषणासाठी विशेष ज्युरी मान्यता प्रदान करण्यात आली. त्यांच्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला मान्यता देऊन, टाटा टेक्नॉलॉजीजने टॉप १० टीममधील ३९ टीम सदस्यांना त्यांचे अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर कंपनीसोबत त्यांचे करिअर सुरू करण्याची संधी दिली, तसेच त्यांचे प्रकल्प वाढवत राहण्यासाठी सशुल्क इंटर्नशिपची संधी देखील दिली.

टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट डेमो डे सन्मान समारंभात टाटा टेक्नोलॉजीजचे सीईओ आणि एमडीश्री वॉरेन हॅरिस म्हणाले: “टाटा टेक्नोलॉजीजचे दूरदृष्टीकोन ‘इंजीनियरिंगएबेटरवर्ल्ड’ आमच्या संपूर्ण इकोसिस्टमसोबत, ज्यामध्ये शैक्षणिक समुदाय देखील समाविष्ट आहे, सहकार्य करत स्मार्ट आणि शाश्वत ई-मोबिलिटी उपाय विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करते. मायक्रोसॉफ्ट आणि टाटा मोटर्ससोबतच्या सहकार्याच्या माध्यमातून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी वास्तव जगातील आव्हानांची ओळख पटवली, ज्यांना जेनरेटिव एआयचा वापर करून नवीन उपाय विकसित करून सोडवले जाऊ शकते. मी या नवकल्पकांनी या समस्यांसाठी सुलभ आणि किफायतशीर उपाय लागू करण्याच्या पद्धतीने प्रेरित झालो आहे, ज्यामध्ये पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानासह उत्कृष्ट मानवी सर्जनशीलतेचा समावेश आहे. आम्ही शीर्ष टीम्सना त्यांच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी मदत करू.”

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री स्वेन पटुश्का यांनी इनोवेंट डेमो डेच्या शेवटी आपला उत्साह व्यक्त केला: “मी ऑटोमोटिव व्हॅल्यू चेनमध्ये जेन एआयच्या उदयोन्मुख अनुप्रयोगांमुळे खूप रोमांचित आहे. डेमो डेवर युवा नवकल्पकांनी दाखवलेली सर्जनशीलता विलक्षण प्रेरणादायी आहे. टाटा टेक्नोलॉजीजसोबत, मी या प्रकल्पांपैकी काहींचे वास्तविक जगातील अनुप्रयोगांसाठी समर्थन करण्यासाठी उत्सुक आहे.”

श्रीप्रविण पांचाग्णुलाकार्यकारी संचालक – मॅन्युफॅक्चरिंग आणि कंग्लोमरेट्समायक्रोसॉफ्ट म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजसोबत, उद्योगात AI-चालित परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या अभियांत्रिकी प्रतिभेला सक्षम बनवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. मायक्रोसॉफ्टमध्ये, आम्ही सर्जनशीलता, सहकार्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला महत्त्व देतो. इनोव्हेंट हॅकाथॉनमध्ये तरुण नवोपक्रमकर्त्यांनी जनरेटिव्ह एआय आणि मायक्रोसॉफ्ट अझ्युरच्या सहाय्यक परिसंस्थेचा उपयोग करून उत्पादन क्षेत्रासाठी प्रभावी उपाय तयार करण्याची क्षमता उघडताना पाहणे खरोखरच प्रेरणादायक आहे.”

युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, टाटा टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष आणि मार्केटिंग आणि बिझनेस एक्सलन्सचे जागतिक प्रमुख श्री संतोष सिंह म्हणाले: “आजचे विद्यार्थी आज आणि उद्याच्या आव्हानांवर उपाय शोधतील. टाटा टेक्नोलॉजीजमध्ये, आम्ही नवोपक्रमाची संस्कृती प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना जेन एआयसारख्या भविष्यासाठी तयार कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी वचनबद्ध आहोत, ज्यामुळे ते आपले करिअर घडवू शकतील आणि सॉफ्टवेअर-डिफाइंड भविष्याची निर्मिती करू शकतील. या तरुण नवोपक्रमकांनी दाखवलेला उत्साह आणि सर्जनशीलता आमच्या अपेक्षांपेक्षा अधिक होती, ज्यामुळे सर्वांसाठी एक चांगल्या जगाच्या निर्मितीत नवोपक्रमाच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही सर्व फायनलिस्टना नोकरीच्या संधी देऊ शकलो आणि भारतातील जेन एआय उत्साही लोकांची संख्या वाढवण्यासाठी मदत करू शकलो.”

टाटा टेक्नोलॉजीज विजेता टीमों को हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व सहभागींचे त्यांच्या उल्लेखनीय जनरल एआय नवकल्पनांसाठी आभार व्यक्त करते, ज्यामुळे टाटा टेक्नोलॉजीज इनोवेंट हॅकाथॉनच्या दुसऱ्या संस्करणाला भव्य यश मिळाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई, दिनांक २२ जानेवारी, २०२५-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते.

घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात दि. 21 जानेवारीअखेर या योजनेत एकूण 1,00,700 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 392 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना 783 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. दि. 21 जानेवारी रोजी एका दिवसात 1195 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले.

राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे (7931 घरे), जळगाव (7514 घरे), छत्रपती संभाजीनगर (7008 घरे), नाशिक (6626 घरे), अमरावती (5795 घरे) आणि कोल्हापूर (5024 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. त्यांना केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी 78 हजार रुपये थेट अनुदान मिळते.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.

शहरातील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार कोथरुड वाहतूक विभागांतर्गत मीनाताई ठाकरे कमान लेनच्या सुरुवातीपासून ते संकल्प व सिद्धी को. ऑप. हौसींग सोसायटीदरम्यानच्या रस्त्यावर १०० मीटर दोन्ही बाजूस ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे. माई मंगेशकर मार्गावर मीनल गार्डन सोसायटी मुख्यद्वार ते श्रीकृष्ण सोसायटीदरम्यान दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.

बाणेर वाहतूक विभागांतर्गत पॅनकार्ड लेन बालेवाडी कॅनल रस्ता ते हॉटेल स्प्रिंग ओनियन दरम्यान दोन्ही बाजूस पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे. डेक्कन वाहतूक विभागांतर्गत कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या बाहेर पडण्याच्या द्वारापासून ते विमलाबाई गरवारे शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत १०० मीटर पर्यंत नो-पार्कीग झोन करण्यात येत आहे.

भारती विद्यपीठ वाहतूक विभागांतर्गत कदम प्लाझापासून लेक टाऊनकडे (बिबवेवाडी) जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रामनाथ स्वीट्स समोरील भिंतीपासून ते ग्रीन पार्क बिल्डिंग (पिझ्झा हट समोरील) भिंतीपर्यंत (१७६ मीटर) दोन्ही बाजुस सर्व प्रकारच्या वाहनांना ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था बदलाबाबतच्या या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झालेले डॉ. भावार्थ हे सर्वात युवा विश्वस्त आहेत.
आळंदी येथे नुकत्याच झालेल्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. देखणे यांची पालखी सोहळाप्रमुखपदी तर योगी निरंजननाथ यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे आणि योगी निरंजन नाथ यांच्या नावाची घोषणा संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी केली.
डॉ. देखणे, ॲड. उमाप व योगी निरंजन नाथ यांची गत वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी निवड झाली होती. ॲड. उमाप यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून तर योगी निरंजन नाथ यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून कार्यरत होते.
योगी निरंजन नाथ आणि डॉ. भावार्थ देखणे यांची नेमणूक झाल्याची माहिती ॲड. उमाप व संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी कळविली आहे. डॉ. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. देखणे घराण्याची ओळख म्हणजे भारुड. सुप्रसिद्ध भारुडकार डॉ. रामचंद्र देखणे यांची भारुडाची परंपरा डॉ. भावार्थ देखणे जपत आहेत व पुढे नेत आहेत.
वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार व व्याख्याते म्हणून डॉ. भावार्थ देखणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. योगी निरंजन नाथ यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आहे. एक साधक म्हणून त्यांनी अनेक वर्षे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सेवा रुजू केली आहे.

‘शिवदुर्ग संवर्धन मोहिमे’अंतर्गततिकोणा गडावर श्रमदान

पुणे, २२ जानेवारी : ‘श्री. शिवदुर्ग संवर्धन मोहिमे’ अंतर्गत गोखले नगर परिसरातील सुयोग मित्र मंडळ आणि विशाल मित्र मंडळ यांनी तिकोणा गडावर श्रमदान केले.

पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, माती व दगडांमध्ये ताल रचणे आणि बुरुज व पायऱ्यांची साफसफाई अशा प्रकारची श्रमदानाची कामे करण्यात आली.

श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने सुरक्षिततेसाठी गडावर सौरऊर्जेवर कार्यान्वित होणारा सी. सी. टी. व्ही. पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मुकेश पवार यांनी दिली.

मुकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश नेलगे, सचिन दगडे, निरंजन बहिरट, आकाश मारणे, आशिष माने, महेंद्र पवार, अविनाश देशमुख यांनी संयोजन केले.

कोथरूडमधील भाग्यश्री अपार्टमेंट सौर ऊर्जेवर;पुणे जिल्ह्यात पहिल्या ‘सौर’ अपार्टमेंटचा मान

• सर्वच फ्लॅट ‘सौर’वर • मासिक वीजबिल शून्यावर

पुणे, दि. २२ जानेवारी २०२५: सर्व घरगुती व कॉमन वीजजोडण्यांसाठी ३० किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून कोथरूडमधील भाग्यश्री अपार्टमेंटने पुणे परिमंडलात पहिल्या ‘सौर’ अपार्टमेंटचा मान मिळविला आहे. या अपार्टमेंटमधील सर्व वीजग्राहकांचे मासिक बिल शून्यावर आले असून त्यांचा दरमहा ३५ हजार रुपयांचा फायदा होत आहे. सोबतच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून या ग्राहकांना ५ लाख ५४ हजार रुपयांचे अनुदान देखील मिळाले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते भाग्यश्री अपार्टमेंटचे रहिवासी आनंद देशपांडे, मंदार देशमुख, सतीश आठवले यांचा नुकताच प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. यावेळी आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांची उपस्थिती होती.

       कोथरूडमधील रामबाग कॉलनीत असलेल्या भाग्यश्री अपार्टमेंटमध्ये एकूण १० सदनिका आहेत. दोन वर्षांपूर्वी लिफ्ट, पाण्याचा पम्प आणि दिव्यांसाठी असलेल्या थ्री फेज वीजजोडणीसाठी इमारतीच्या छतावर ११ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे दरमहा १५ ते १६ हजार रुपयांचे वीजबिल शून्यवत झाले. तर गेल्या ऑगस्टपासून महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश काळे, शाखा अभियंता श्री. आशुतोष थोरात, जनमित्र कैलास मडावी, कार्यालयीन सहायक विजय त्रिंबके यांनी या अपार्टमेंटमधील प्रत्येक सदनिकेसाठी पीएम सूर्यघर योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

भाग्यश्री अपार्टमेंटकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सौर एजन्सीचे श्री. दीपक कोटकर यांनीही सहकार्य केले. अपार्टमेंटच्या छतावर सौर पॅनेल्सच्या जागेची पाहणी करण्यात आली. यात १० सदनिकांच्या वीजजोडण्यांचा मंजूर वीजभार ८१ किलोवॅट असला तरी छतावरील जागेच्या मर्यादेमुळे १९ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची उभारणी शक्य होईल असे दिसून आले. त्यानंतर मासिक वीजवापरानुसार ४ सदनिकांसाठी प्रत्येकी १ किलोवॅट, ३ सदनिकांसाठी प्रत्येकी २ किलोवॅट आणि ३ सदनिकांसाठी प्रत्येकी ३ किलोवॅटचे छतावरील सौर प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे केवळ महिन्याभरात १९ किलोवॅट क्षमतेचे छतावरील १० सौर प्रकल्प उभारण्यात आले.

‘सर्व सदनिकाधारकांच्या सकारात्मक निर्णयामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेता आला व दरमहा वीजबिल शून्य झाले आहे. या सौर प्रकल्पांसाठी १५ लाख ७१ हजार रुपयांचा खर्च आला. त्यातील ५ लाख ५४ हजार ५२० रुपयांचे अनुदान महिन्याच्या आतच प्राप्त झाले व उर्वरित प्रकल्पाचा खर्च शून्य वीजबिलांमुळे येत्या ४ वर्षांत भरून निघेल याचा आम्हाला आनंद आहे’ असे भाग्यश्री अपार्टमेंटचे श्री. मंदार देशमुख यांनी सांगितले.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी प्राप्त १८ हजार ६४० अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी २८.९ मेगावॅटचे ५ हजार ८५३ छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. हरित उर्जेवरील राज्यात पहिले विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन पुण्यात झाले. तसेच टेकवडी (ता. खेड) गावाने राज्यात दुसरे ‘सौरग्राम’ म्हणून मान मिळवला. आता भाग्यश्री अपार्टमेंटने देखील सर्व वीजजोडण्यांसाठी सौर ऊर्जेचा पर्याय निवडला. हा आदर्श इतरही ग्रामपंचायती, सोसायट्या, अपार्टमेंटमधील वीजग्राहक ठेवतील असा विश्वास आहे’.

‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना करा:आमदार हेमंत रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले

पुणे (दि २२) : शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे. या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी तसेच पाणी शुद्धीकरण मोहिम राबवा, असे आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाला सुनावले आहे.

गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांची भेट घेत केली आहे. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे.


रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली

याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे आल्याने उकळून घेऊनच पाणी प्यावे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत.यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कसबा मतदारसंघातील विविध प्रश्न संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दहा वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रमांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. २२: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना अभियानाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण जामसिंग गिरासे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, मोनिका रंधवे तसेच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी यावेळी म्हणाले, बाल लिंग गुणोत्तर प्रमाण वाढावे, बालिकांच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि विकासाच्या संधी त्यांना मिळाव्यात यासाठी देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बाल लिंग गुणोत्तराचे पुणे जिल्ह्याचे प्रमाण वाढावे याकरिता पुढील सहा आठवड्यांमध्ये सर्व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारुड, आदिवासी बोहाडा, कळसूत्री बाहुल्या, गोंधळ, पिंगळा सादरीकरणातून दुर्मिळ लोककलांना उजाळा 

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या कार्यशाळेतून लोककलेचा जागर संस्कृति कार्य संचलनायानच्या उपक्रमाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

पुणेमहाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित आणि भारतीय लोककला अभ्यास संशोधन कल्याण केंद्र व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन पुणे यांच्या समन्वयातून व्याख्यान, परिसंवाद, कार्यशाळा, शोधनिबंध वाचन, लोकसंस्कृती विषयक सांस्कृतिक कार्यशाळाचे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ येथे केले होते.  या दोन दिवशी कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी  लोकसंस्कृतीतील मौखिक परंपरा, परिसंवाद लोकसंस्कृतीची बलस्थाने आणि मर्यादा, परिसंवाद लोकसंस्कृतीतील स्त्री जीवन, शोधनिबंध वाचन,  अंबाजोगाईची लळीत परंपरा, आदिवासी बोहाडा, पिंगळा, भारुड, गायन, लोकसंगीत मोठ्या उत्साहात पार पडले.तर दुसऱ्या दिवशी लोक दैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय, लोकरंगभूमीच्या भौतिक संस्कृतीमधील तथ्य आणि मिथक, लोक संस्कृतीतील रंजानात्म्क अविष्कार,  कळसूत्री बाहुल्या,  गोंधळ जागरण,  लोकजीवनातून लुप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे, कोंडी यांचे लोककथेच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.  कथक आणि लावणी जुगलबंदी सादर करून या लोकसाहित्य व लोकसंस्कृती कार्यशाळेची सांगता करण्यात आली.सदरील कार्यशाळेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये तरुणाई पासून वयोवृद्धांपर्यंत आवर्जून उपस्थिती लावली होती. सदरील महोत्सवाचे संयोजक  सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आणि लोकसाहित्य आणि फोकलोर अँड क्लचरल हेरीटेज फाउंडेशन  समन्वयक डॉ.सुनीता धर्मराव होत्या. 

महाराष्ट्रातील लोककला व कलाकारांना मिळणार नवसंजीवनी – चवरेमहाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या मार्फत अशाच कार्यशाळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतल्या जाणार असून अशा कार्यशाळांतून लुप्त होत चाललेल्या लोककला, लोकसंस्कृती व कलाकारांना नवसंजीवनी देण्यात येणार आहे. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

 स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी टाटा एआयए लाइफ तर्फे ‘शुभ मुहूर्त’ सादर

मुंबई: भारतातील लग्नसमारंभ केवळ विधीवत समारंभ नसतात तर जिथे संस्कृती, प्रेम आणि आनंद मोठ्या प्रमाणावर साजरे होतात असे उत्सव असतात. प्रत्येक कुटुंबासाठी तो आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असतो. त्याचबरोबर आता लग्नसमारंभ हा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यातून थीम आणि डेस्टिनेशनवर आधारित लग्नांचे ट्रेंड सुरू झाले आहेत. अशी लग्नं अनेक दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत चालतात. परिणामी, या प्रसंगासाठी पुरेसा निधी निश्चित करणे हे फक्त काही महिन्यांचे नव्हे, तर अनेक वर्षांचे काटेकोर आर्थिक नियोजन आवश्यक बनले आहे.

लग्नाचे महत्त्व आणि त्याचा ग्राहकांवरील आर्थिक परिणाम लक्षात घेऊन भारतातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स (टाटा एआयए) ‘शुभ मुहूर्त’ नावाची नाविन्यपूर्ण जीवन विमा योजना सादर करत आहे. या योजनेत इक्विटीमध्ये गुंतवणूक यांसह भांडवली हमी, इच्छित लाभार्थ्याला निश्चित लाभ, जीवन संरक्षण, मृत्यू सारखा प्रसंग उद्भवल्यास तत्काळ निधी अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या स्वप्नातील लग्नासाठी बचत करण्यात मदत होईल आणि हा क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय बनेल हे सुनिश्चित करता येऊ शकेल.

ही योजना सुरू करण्याबद्दल बोलताना टाटा एआयएचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी अय्यर म्हणाले: “टाटा एआयए लाइफमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांनुसार त्यांच्या अनोख्या गरजा समजून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पालकांसाठी लग्नाचे महत्त्व काय असते हे आम्हाला समजते. लग्न हा केवळ प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव नसून कुटुंबीयांच्या भावना आणि आकांक्षांचे प्रतीक आहे. ‘शुभ मुहूर्त’ कुटुंबांना पूर्वनियोजन करण्यासाठी मदत करेल.”

“जोडीला आम्हाला अशी उपाय सुविधा द्यायची होती की जर दुर्देवाने पालकांचा मृत्यू ओढवला तरी उद्दिष्ट सुरक्षित राहील. ‘शुभ मुहूर्त’द्वारे आम्ही कुटुंबांना आनंदाच्या या क्षणांचे आत्मविश्वासाने नियोजन करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत आणि त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्याला साजरे करण्यासाठी त्यांना ‘तयार’ करू इच्छितो.”

ही योजना ज्यांच्या मुलांचे वय 1 ते 20 वर्षे आहे अशा 31 ते 50 वर्षे वयोगटातील पालकांसाठी सर्वोत्तम आहे. या योजनेत लवकर गुंतवणूक केल्यास पालकांना त्यांच्या मुलाच्या भव्य लग्नासाठी हवे असलेले भांडवल जमविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

शुभ मुहूर्त ची खास वैशिष्ट्ये

लग्नाचे नियोजन हा आनंददायी आणि तणावमुक्त अनुभव होईल अशा प्रकारे शुभ मुहूर्त योजना डिझाइन करण्यात आली आहे. यातील अनोखे लाभ पुढीलप्रमाणे:

·         लग्नाशी संबंधित विविध खर्चांचे नियोजन: लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च समाविष्ट असतात. त्यात लग्नासाठीचे ठिकाण आरक्षित करणे, समारंभ आयोजित करणे, अन्न-पदार्थ आणि पेये यावर होणारा खर्च, दागिने आणि लग्नाचे पोशाख खरेदी करणे, पाहुण्यांसाठी निवासाची सोय करणे इत्यादी. शुभ मुहूर्ताचे नियोजित पेआऊट आवश्यक वेळेस निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे पालकांना अंतिम क्षणी पैसा जमवण्याची चिंता करण्याऐवजी सोहळा साजरा करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.

·         इक्विटी एक्स्पोजरसोबत भांडवली हमी: भरलेल्या प्रीमियमचे संरक्षण केल्यामुळे पालकांना आर्थिक सुरक्षा आणि मनःशांती मिळते. भलेही बाजारात चढ-उतार होत असले, तरीही हमी रक्कम हे सुनिश्चित करते की लग्नाचे नियोजन बाजारातील अनिश्चिततेमुळे बिघडणार नाही.

·         दीर्घकालीन संपत्ती वृद्धी: लग्नसमारंभाशी मोठ्या आकांक्षा जोडलेल्या असतात. शुभ मुहूर्त बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून कालांतराने मोठे भांडवल तयार करण्यात मदत करते. यामुळे इतर जीवन उद्दिष्टाशी तडजोड न करता डेस्टिनेशन लग्न किंवा उच्चस्तरीय व्यवस्था यांसारख्या भव्य शाही लग्नांसाठी आवश्यक आर्थिक स्त्रोत उपलब्ध होतात.

·         MWPA अंतर्गत विशेष संरक्षण: मॅरिड वुमन प्रॉपर्टी अॅक्ट (MWPA) अंतर्गत पॉलिसी उत्पन्नाचे संरक्षण केल्यामुळे मुलाच्या लग्नासाठी राखलेला निधी कायदेशीररित्या संरक्षित राहतो आणि कोणत्याही बाह्य आर्थिक दाव्यांपासून सुरक्षित राहून नॉमिनीला उपलब्ध होतो.

लाभ संरक्षण रायडर: हा रायडर अतुलनीय सुरक्षा प्रदान करतो:

·         तात्काळ मृत्यू लाभ: विमाधारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे त्यांचे जीवनाचे उद्दिष्ट निर्विघ्नपणे पुढे जाऊ शकते.

·         प्रीमियम सूट: भविष्यातील प्रीमियम माफ करून पॉलिसीची सातत्यपूर्णता राखली जाते आणि कुटुंबावर आर्थिक ताण येत नाही.

·         नॉमिनींसाठी मॅच्युरिटी लाभ: विमाधारकाच्या अनुपस्थितितसुद्धा मुलाच्या लग्नाचे उद्दिष्ट पूर्ण होईल हे सुनिश्चित करत ठरलेला मॅच्युरिटी लाभ देण्यात येतो.

शुभ मुहूर्त हा टाटा एआयए च्या शुभ सोल्यूशन्स मालिकेचा एक भाग आहे. मुलांच्या शिक्षणापासून त्यांचे लग्नाचे स्वप्न पूर्ण करणे यासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरता सुरुवातीच्या वर्षात संपत्ती निर्मितीपासून सुवर्णवर्षांत आपल्या आकांक्षा पूर्ण करणे, परंपरा जोपासणे यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी योग्य प्रकारचे विमा उत्पादन पुरवतो. टाटा एआयए च्या ‘हर वक्त के लिए तैयार’ या ब्रँड वचनाशी हा उपक्रम सुंदरपणे सुसंगत आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या आकांक्षा वेगवेगळ्या असतात आणि काही विशिष्ट वेळेस मुलाच्या लग्नाऐवजी इतर उद्दिष्टांसाठी असू शकतात. हे लक्षात घेऊन, टाटा एआयएने या मालिकेतील दुसरी योजना  ‘शुभ फॉर्च्यून’* सादर केली आहे.

शुभ फॉर्च्यून ही एक व्यापक आर्थिक योजना आहे जी जीवनातील विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या करिअरमध्ये संपत्ती निर्माण करणे, मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करणे किंवा घर खरेदी करण्यासारख्या आकांक्षा पूर्ण करणे यासारखे जीवनातील महत्वपूर्ण टप्पे विनाअडथळा पार करण्यासाठी मदत करण्याकरता शुभ फॉर्च्यून डिझाईन करण्यात आली आहे.

कोणतीही तडजोड न करता भारतीय कुटुंबांना सोहळा साजरा करण्यासाठी सक्षम करणे

या नाविन्यपूर्ण योजना सादर करून, टाटा एआयए लाइफ भारतीय कुटुंबांना त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांचे नियोजन आणि ते साजरे करण्यास मदत करण्यासाठी आपले योगदान दृढ करते. संस्कृतीशी जोडलेले मूल्य आणि आर्थिक स्थैर्य यांचा संगम साधणाऱ्या योजना तयार करण्याच्या टाटा एआयएच्या ध्येयाचे हे प्रतीक आहे. त्यामुळे कुटुंबे कोणत्याही आर्थिक ताणाविना जीवनातील खास क्षण साजरे करू शकतात.

ही योजना टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी सिक्युअर (UIN:110N206V02) ची एक वैयक्तिकनॉन-लिंक्डनॉन-पार्टिसिपेटिंगजीवन विमा बचत योजना आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स स्मार्ट फॉर्च्यून प्लस  (UIN:110L177V01एक युनिट-लिंक्डवैयक्तिक जीवन विमा बचत योजना यांचे संयोजन आहे.

“जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी” आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

जळगाव : पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण त्यानंतर पूजाच्या घरच्यांसोबत मुकेश शिरसाठचे वारंवार वाद आणि खटके उडत होते. त्यावरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आणि एनसी दाखल करण्यात आल्या आहेत. पण पळून जाऊन लग्न केल्याचा राग अजूनही पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होता, या संतापातून त्यांनी मुकेशची निर्घृणपणे हत्या केली. या गंभीर घटनेची तत्काळ दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर घटनेदिवशी मृत मुकेश शिरसाठचे पूजाच्या घरच्यांसोबत वादविवाद झाले होते. त्यावेळी एकूण आठ-नऊ लोकांपैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि जागेवरच त्याचा जीव गेला. याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘ऑनर किलिंगची ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे’; असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हा प्रेमविवाह होऊन चार-पाच वर्ष झाली होती त्याचबरोबर मयत मुकेश शिरसाठ व त्याच्या सासरची मंडळी यांच्यात सतत वादविवाद होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी एनसी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब विचारात घेता या प्रकरणामध्ये वेळोवेळी पोलिसांमार्फत काय कार्यवाही करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी.

ऑनर किलिंग टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत काय कार्यवाही यापूर्वी करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास आवश्यक संरक्षण व सुरक्षागृहाची व्यवस्था गरजेनुसार पुरवण्यात यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यांतर्गत साक्षीदारास आवश्यक संरक्षण पुरविण्यात यावे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक व ठोस साक्षी पुरावे मुदतीत संकलित करून चार्जशीट वेळेत दाखल करण्यात यावी. तसेच उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी.

याप्रकरणी अनुभवी निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास सामाजिक अर्थसहाय्य योजनेमधून नियमानुसार लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत समाज प्रबोधन व समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात यावी. तसेच, ‘याप्रमाणे कार्यवाही करून उपसभापती कार्यालयास या संदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करण्यात यावा’ असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.