Home Blog Page 1357

पृथ्वीराज चव्हाण यांनीच 2014मध्ये सरकार घालवले,काँग्रेसच्या वाताहतीला तेच जबाबदार-राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई-मुख्यमंत्री असताना मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर आज विखे-पाटील म्हणाले, २०१४मध्ये सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनीच केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनीही टीका केली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता. पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही.

याशिवाय २०१४नंतर पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर मराठा आरक्षण टीकले असते, असाही दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर प्रथमच आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला होता. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, नंतर न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले व आमचे सरकार पडले. नंतर कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. आम्ही कायदेशीर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आमचे सरकार टीकले असते तर कोर्टात आम्ही आणखी चांगल्या रितीने बाजू मांडली असती व आरक्षण टीकले असते.पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही. तर, सुनील तटकरे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. हल्ली पृथ्वीराज चव्हाण विनोद का करत आहे, हे समजत नाही.

अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव शुक्रवारपासून

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन
पुणे : गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. अशा कसबा पेठेतील पुण्याचे अतिप्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव दिनांक १ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे श्री काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त उत्सव व श्री दत्तयाग महायज्ञ होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि.१) सकाळपासून स्थापित देवतांचे आवाहन, पूजन, श्रीदत्त मालापाठ व आरती होणार आहे. दिनांक २ ते ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ यावेळेत स्थापित देवता पूजन व श्री दत्त मालापाठ आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ यावेळेत श्री दत्त मालापाठ, आरती व ४ डिसेंबर रोजी पूर्णाहुती, आरती होईल. 
तर, मंगळवारी (दि.५) सकाळी ७.३० वाजता लघुरुद्र, महापूजा व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी शत नामावली, आरती आणि रात्री १२ वाजता मुख्य जन्मसोहळा होईल. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत आहे. भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. भाविकांनी उत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

स्मार्ट सिटी पुण्यातील महत्वपूर्ण प्रकल्पाची विक्री ९०० कोटी रु. हून अधिकपर्यंत पोहोचणार

युनिव्हर्स या प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या भारतातील पहिल्या प्रकल्पाची जवळजवळ पूर्णपणे विक्री

पुणे: प्रॉपटेक आणि ईएसजी-कंप्लायंट रिअल इस्टेट उपायसुविधा एकत्रित करणार्‍या किफायतशीर गृहनिर्माण बाजारपेठेतील आघाडीची जागतिक कंपनी प्लॅनेट स्मार्ट सिटीने कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (KPDL) सह भागीदारीत पुण्यातील हिंजवडी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिपमधील आपल्या प्रमुख ‘युनिव्हर्स’ प्रकल्पाची जवळपास एकूण सर्व  विक्री झाल्याचे जाहीर केले आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटीचा हा देशातील पहिलाच विकास प्रकल्प असताना सप्टेंबर २०२३ च्या अखेरीस ८८% पेक्षा जास्त निवासी युनिट्स आणि ९१% पेक्षा जास्त व्यावसायिक युनिट्सची विक्री होऊन हा मैलाचा दगड असाधारण यश दर्शवितो.

‘युनिव्हर्स’ हा प्लॅनेट स्मार्ट सिटीने डिसेंबर २०२० मध्ये भारतात सादर केलेला पहिला प्रकल्प असून एकूण निवासी युनिट्समध्ये १.३ दशलक्ष हून अधिक चौरस फूट आणि व्यावसायिक युनिट्समध्ये ८५,००० चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र आहे. महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली आव्हाने असूनही ‘युनिव्हर्स’ आधीच ९०० कोटी रुपयांहून अधिकची विक्री करण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रातील निवासी गृहनिर्माण बाजारपेठेची गतिशीलता आणि गृहखरेदीदारांचा प्रचंड प्रतिसाद यातून ही अतुलनीय कामगिरी झाली आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटी द्वारे संपूर्ण प्रकल्पात लागू केलेल्या विस्तृत सुविधा आणि नाविन्यपूर्ण स्मार्ट उपायांचे मोल या गृहखरेदीदारांना आहे.

प्रकल्पाचे यश भारताच्या सीमेपलीकडे विस्तारले असून जीसीसी प्रदेशातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार त्यांच्या अद्वितीय विक्री मुद्द्यांना आणि मालमत्तेचे मूल्य वाढवण्याच्या संभाव्यतेला प्रतिसाद देत आहेत.

प्लॅनेट स्मार्ट सिटीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मार्को पिलिया म्हणाले, “भारतातील आमच्या पहिल्या प्रकल्पाची यशस्वी विक्री ही जागतिक स्तरावर प्लॅनेट स्मार्ट सिटीसाठी एक अतुलनीय कामगिरी आहे. ही कामगिरी आमच्या व्यवसाय मॉडेल आणि मूल्य प्रस्तावाची उत्तम पावती आहे. भारतातील सर्वोत्तम डेव्हलपर्ससह सहकार्य केल्याने आम्हाला निवासी बाजारपेठेत उच्च नावीन्यपूर्णता, भविष्याची तरतूद आणि आमच्या ग्राहकांसाठी योग्य बजेट रेंज प्रदान करण्याची अनुमती मिळते.”

कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे ग्रुप सीईओ श्री. राहुल तळेले म्हणाले, “युनिव्हर्स प्रकल्पाला ग्राहकांनी दिलेली मजबूत स्वीकृती ही भारतीय बाजारपेठेत नाविन्यपूर्ण रिअल इस्टेट सोल्यूशन्स आणण्याच्या कोलते-पाटील यांच्या क्षमतेला मिळालेली आणखी एक मान्यता आहे. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँडसह सहयोग करत शाश्वतता आणि स्मार्ट उपायांवर  लक्ष केंद्रित करून ग्राहकांसाठी सखोल मूल्य निर्माण करण्यास आम्हाला सक्षम करते. युनिव्हर्स प्रकल्प हा शहरी जीवनशैलीचा नमुना म्हणून तयार केला गेला असून तो आताच्या काळातील दोन प्रमुख ट्रेंड: प्रॉपटेक आणि ईएसजीचा अवलंब करत आहे. पुढे जाऊन, आमच्या पोर्टफोलिओमध्ये विस्तीर्ण कॅनव्हासवर या प्रकल्पाच्या यशाची प्रतिकृती बनेल याची आम्हाला खात्री आहे.”

प्रकल्पाच्या गतीमान विक्रीला ANAROCK मालमत्ता सल्लागार यांच्याबरोबरील महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीमुळे समर्थन मिळाले असून त्यांनी या प्रकल्पाच्या व्यावसायिक यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ANAROCK ग्रुपच्या निवासी विक्रीच्या अध्यक्षा अदिती वाटवे म्हणाल्या, “प्लॅनेट स्मार्ट सिटीसोबत त्यांच्या भारतातील पहिल्या प्रकल्पावर काम करणे हे खूप आनंददायी आहे. लाइफ रिपब्लिकसाठी, आम्ही आमच्या मालकीच्या SaaS प्रणीत प्रॉपटेक रिअल इस्टेट मार्केटिंग सोल्यूशन्सचा संपूर्ण विस्तार खुला केला आहे. याद्वारे आम्ही उत्तम निवासी जीवनशैली उपायसुविधा शोधत असलेल्या खरेदीदारांपर्यंत अचूकपणे पोहोचू शकतो.”

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

0

मुंबई दि. २९ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

मुंबई दि. २९ :- गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले. पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग

0

मुंबई,दि.२९: मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यामध्ये पोलिस आणि पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतील. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील. या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने प्रशिक्षणार्थींची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास सरकारतर्फे (NSQF) एनएसक्यूएफ स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यावयाचे याचे देखील मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येईल.

१ डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस वसाहत मैदान, वसंतराव नाईक मार्ग, ताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता आणि मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३, वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, आयुक्त डॉ.रामास्वामी एन., सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, मुख्यालयाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी या उपस्थित राहतील.

विद्या व्हॅली स्कूल, सूसने पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमध्ये जिंकला ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शाळेचा’ प्रतिष्ठित सन्मान

      क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या शाळेमध्ये सिटी प्राइड स्कूल, निगडी आणि लॉयला हाय स्कूल, पाषाण या शाळा रनर अप

·       विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने जिंकली ‘गोल्डन गर्ल’ची ट्रॉफी, तर विद्या व्हॅली सूस स्कूलचा मल्हार सागर देशमुख ठरला गोल्डन बॉय

पुणे– पुण्यामध्ये नुकतीच एसएफए चॅम्पियनशीपची सांगता झाली. पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमधील ‘क्रीडा क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शाळेचा’ प्रतिष्ठित सन्मान विद्या व्हॅली स्कूल, सूसने जिंकला. या शाळेने एकूण ३० सुवर्ण, १३ रौप्य आणि १५ ब्राँझ पदके व २३८ गुण जिंकले. वेगवेगळ्या खेळांतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपमध्ये विद्या व्हॅली स्कूल, सूसच्या अवंतिका रंजीत खेरने दोन सुवर्ण पदकांसह गोल्डन गर्ल हा पुरस्कार जिंकला, तर याच शाळेच्या मल्हार सागर देशमुखनेही २ सुवर्ण पदके जिंकत गोल्डन बॉय हा पुरस्कार मिळवला.

संयुक्त सचिव, महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन, सचिव पीसीएमसी आर्चरी असोसिएशनच्या सोनल बुंदेले यांनी सांगता समारंभात खेळाडूंचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, एसएफए चॅम्पियनशीपपुण्यातीलखेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ बनले असून या चॅम्पियनशीपमध्ये १२,००० खेळाडू सहभागी झाले होते. गुणवत्ता हेरून खेळाची संस्कृती रूजवण्याची एसएफएची बांधिलकी कौतुकास्पद आहे. पदके आणि विजयाच्या पलीकडे जात एसएफए खेळाच्या माध्यमातून विजेत्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एसएफए सकारात्मक स्थित्यंतर घडवून पुण्यातील क्रीडा विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधली आहे.

पुण्यात एसएफए चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ६०० शाळांतील १२०० मुले सहभागी झाली होती. या चॅम्पियनशीपमध्ये प्रत्येक खेळातील पुण्यातील आघाडीच्या शाळेचाही शोध घेतला गेला.

या समारंभात आदिती मुटाटकर, कॉमनवेल्थ गेम्स पदकविजेत्या, ५ वेळा राष्ट्रीय विजेत्या, प्रोग्रॅम प्रमुख – अथलीट अँड वुमन इनिशिएटिव्ह, सिंपली स्पोर्ट फाउंडेशन म्हणाल्या, ‘तळागाळातील क्रीडा स्पर्धांची पुरस्कर्ती या नात्याने मी एसएफए चॅम्पियनशीपचे तरुण खेळांडूचे खेळ कौशल्य सुधारण्यापलीकडे जाऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक करते. एसएफएने तळागाळात विकास घडवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम आणि क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी दिले जात असलेले योगदान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे, की इतर शहरांतील चॅम्पियनशीप्स आपल्या देशाला क्रीडा क्षेत्रातील दमदार गुणवत्ता मिळवून देतील.’

या चॅम्पियनशीपमध्ये २७० खेळप्रकारांत ४३०० पेक्षा जास्त सामने खेळले गेले व त्यातून तरुण खेळाडूंची गुणवत्ता आणि खिलाडी वृत्ती पाहायला मिळाली. पुण्यातील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एकूण खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण ३४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ६६ टक्के होते. अथलेटिक्स आणि बास्केटबॉलमध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते, तर मुलांनी फुटबॉल, बास्केटबॉल, बुद्धीबळ, पोहणे आणि अथलेटिक्सला पसंती दिली.

प्रत्येक खेळातील विजेत्यांची अंतिम यादी आणि प्रत्येक शाळेच्या कामगिरीचे तपशील www.sfaplay.com.

वर उपलब्ध आहेत.

एसएफए चॅम्पियनशीप, पुणे २०२३- २०२४ मधे क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शाळा        

क्रमांकशाळासुवर्णरौप्यब्राँझगुण
1विद्या व्हॅली शाळा, सूस301315 238
2 सिटी प्राइड शाळा, निगडी16179 158
3लॉयला हाय स्कूल, पाषाण13611 146
4द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री10910 145
5द ऑर्किड्स स्कूल, बाणेर887 117

एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात कुशल प्रशिक्षक – अशोक गुंजाळ

सर्वाधिक सहभाग एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर – २९५ खेळाडू

एसएफए चॅम्पियनशीप २०२३- २०२४ मधील प्रत्येक क्रीडाप्रकारातील आघाडीच्या शाळा

क्रमांकखेळशाळेचे नावगुण
1तिरंदाजीएल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड18
2अथलेटिक्ससिटी प्राइड स्कूल निगडी88
3बॅडमिंटनएड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल, बाणेर8
4बुद्धीबळ18
5जिमनॅस्टिकमिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर22
6खो खो40
7स्केटिंगविबग्योर राइज स्कूल, पिंपळे सौदागर29
8स्पीडक्युबिंगलॉयला हाय स्कूल पाषाण20
9पोहणेइंडस इंटरनॅशनल स्कूल पुणे37
10कबड्डीआर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे आणिआर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी40
11कराटेएसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, रहाटणी53
12टेबल टेनिसडीएव्ही पब्लिक स्कूल, पुणेऔंध13
13तायक्वांदोविद्या व्हॅली स्कूल, सूस111
14टेनिसद ऑर्किड्स स्कूल, बाणेर8
15थ्रोबॉलसिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक65
16व्हॉलीबॉलनालंदाज इंग्लिश मीडियम स्कूल, धायरी50

जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव

0

 न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे ५६ प्रकारच्या मिष्टानांचा अन्नकोट

पुणे : सिंहगड रस्त्यावरील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे अन्नकोट व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वस्तिक, ओंकार यासारख्या दिव्यांनी साकारलेल्या शुभचिन्हांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़ दोन हजार पणत्यांच्या माध्यमातून परिसर उजळून निघाला़ दीपोत्सवासह अन्नकोट देखील संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. 
विद्यार्थ्यांना आपल्या सण आणि उत्सवांची माहिती मिळावी, यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते़ नमकीन पदार्थ, फळे, मिठाई यांसारख्या ५६ प्रकारच्या मिष्टांनांचा अन्नकोट मांडण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
सुरेखा जाधवर म्हणाल्या, अन्नकोट आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आपल्या संस्कृतीतील शुभ चिन्हे, रंगावलीच्या माध्यमातून हा उत्सव अधिक मंगलमय होतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

सुमेधा चिथडे, डॉ.प्रमोद चौधरी यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर

पुणे प्रार्थना समाजाचा वार्षिकोत्सव : संस्थेचे १५३ व्या वर्षात पदार्पणकॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कार

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी  १५३ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. प्राज इंडस्ट्रीजचे डाॅ.प्रमोद चौधरी यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार,सुमेधा चिथडे यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, कॉकलिया पुणे संस्थेला डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.  
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाºया संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो. 
शुक्रवार दिनांक १ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता रोजी उपक्रमोपासना होणार आहे. शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय अर्थ विज्ञान वर्धिनी चे मानद संचालक डाॅ. अभय टिळक यांचेरहस्य भागवत धर्माचे आणि प्रार्थना समाजाचे या विषयावर व्याख्यान होणार असून सायंकाळी ७ वाजता समर्चना स्कूल आॅफ डान्स तर्फे नृत्य सादरीकरण होणार आहे. रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘मला उमजलेला प्रार्थना समाज’ हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये समीर चौधरी, धनराज निंबाळकर सहभागी होणार आहेत. याच विषयावर मराठी विश्वकोश मंडळ वाईचे अध्यक्ष प्रा. राजा दिक्षीत यांचे व्याख्यान होणार आहे. याच दिवशी बुधवार पेठेतील प्रार्थना समाजाच्या वास्तूत दिपोत्सव देखील करण्यात येणार आहे.

पुणे पेशवा लघुपट महोत्सवात ‘ भट्टी’ ने पटकाविला प्रथम क्रमांक

भारतभरातून ८० लघुपटांचा सहभाग 
पुणे :  पुणे पेशवा लघुपट महोत्सवात  भट्टी’ लघुपटाने प्रथम क्रमांक पटकाविला. या लघुपट महोत्सवात देशभरातील ८० लघुपट सहभागी झाले होते. त्यामधून ४७  शॉर्ट फिल्म स्क्रिनींगसाठी निवडण्यात आल्या. महोत्सवाचे आयोजन घोले रस्त्यावरील नेहरु सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते.

अनुप सुजाता ढेकणे हे महोत्सवाचे दिग्दर्शक होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण भोळे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर,माजी नगरसेविका गायत्री खडके, दिग्दर्शक प्रीतम पाटील, राजेंद्र आलमखाने उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. सहदिग्दर्शक म्हणून राम दत्ताकला, नियंत्रक म्हणून श्रीनिवास गायकवाड, तर सभासद म्हणून मुबारक तांबोळी, प्रदीप गरड, रिहान शेख, समर्थ सोनावणे, राजेंद्र कुलकर्णी, राजेंद्र पालवे यांनी काम पाहिले. महोत्सवाचे यंदा पहिले वर्ष होते.

पारितोषिक वितरणासाठी मेघराज भोसले, गणेश इनामदार, संग्राम भोसले उपस्थित होते. वीरेंद्र वळसंगकर आणि मितेश ताके यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. भट्टी लघुपटाने महोत्सवात प्रथम तर रेखा, लालीपॉप यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले. आधाशी लघुपटाने पुणे पेशवा चॉईस अवॉर्ड हा पुरस्कार पटकाविला.

चिथिका लघुपटाला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार, रेखा लघुपटाला सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, लालीपाॅप चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर  कॉलम लघुपटाला तर सर्वोत्तम लेखक पुरस्कार भट्टी, सर्वोत्तम बालकलाकार पुरस्कार झीलमील आणि पाखरं लघुपटाने पटकाविला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

पुणे, दि.२९: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

महंमदवाडीच्या गणेश बबन लोंढे आणि टोळीवर मोक्काची कारवाई,अल्पवयीन मुलासह सर्व नव्या तरुणाईची टोळी

मकोका अंतर्गत केलेली ही ९१ वी कारवाई

पुणे-महंमदवाडी येथील गणेश बबन लोंढे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता मागील वर्षामध्ये सदर टोळीने संघटितपणे व वैयक्तीकपणे, खुनाचा प्रयत्न, चोरी करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर जमावजमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, दरोडयाची तयारी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. या टोळीत १) गणेश बबन लोंढे वय २३ वर्षे रा. साठे चौक, तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे (टोळी प्रमुख) याने त्याचे इतर साथिदार २) विशाल माधव गोरे, वय २० वर्षे, रा. वेदात हाईट्स सोसायटी, तरवडे वस्ती, पुणे ३) मयुर माणिक पुरकास्त, वय १८ वर्षे, रा. कृष्णानगर, बुध्दविहार जवळ, पुणे ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे, वय २० वर्षे, रा. तरवडे वस्ती, पुणे ५) शुभम नंदु चव्हाण, वय १९ वर्षे, रा. तरवडे वस्ती, बी-६०४, मोहंमदवाडी, पुणे यांनी केला असुन, नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच ६) एक विधिसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) यास ताब्यात घेवुन बाल न्यायालय येरवडा, पुणे येथे हजर केले आहे. ७) एक wanted आरोपी आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना पोलिसांनी म्हटले आहे कि,’दि.०४/१०/२०२३ रोजी एस. डी. बार अॅण्ड रेस्टॉरन्ट समोर मंहमदवाडी, पुणे येथे फिर्यादी थांबले असताना १) गणेश बबन लोंढे २) विशाल माधव गोरे ३) माणिक पुरकास्त ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे यांनी मनोज साळवी कोठे आहे आमचे त्याचे कडे काम आहे अशी विचारणा केली असता मला माहित नसल्याचे फिर्यादी यांनी त्यांना सांगताच त्यांनी फिर्यादी सोबत वाद सुरु केला. त्यावर फिर्यादी यांनी त्यांना जाब विचारताच त्याचा राग आल्याने त्यांचेपैकी एकाने त्याचेकडील धारधार हत्याराने, तुला आता संपवतो असे म्हणुन फिर्यादी यांचे पाठीवर मारुन जखमी केले व त्यातील एका पांढरे रंगाचा शर्ट घातलेल्या लुकड्या मुलाने जमिल पठाण याला त्याचेकडील धारदार हत्याराने डावे कानावर डावे दंडावर व मनगटावर मारुन गंभीर जखमी केले तसेच हॉटेल मॅनेंजर विकास गोमसाळे याचे पाठीवर धारधार हत्यार मारुन त्यास जखमी करुन शिवीगाळ व आरडा ओरड करत त्यांचेकडील मोटर सायकलवरून निघुन गेले, तेव्हा तेथे पळापळ झाल्याने तेथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी हॉटेल मॅनेजर विकास याने हॉटेलचे शटर बंद करुन घेतले व हॉटेल मधील कामगार घाबरुन पळुन गेले. म्हणुन वरिल इसमांनी फिर्यादी यांना व जमील पठाण तसेच विकास गोमसाळे यांना धारधार हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे दिले फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं.१०१९/२०२३, भादविक ३०७,५०४,५०६, ३४ क्रि.लॉ.अॅ.अॅक्ट कलम ७ आर्म अॅ. कलम ४(२५) हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) गणेश बबन लोंढे वय २३ वर्षे रा. साठे चौक, तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे (टोळी प्रमुख) याने त्याचे इतर साथिदार २) विशाल माधव गोरे, वय २० वर्षे, रा. वेदात हाईट्स सोसायटी, तरवडे वस्ती, पुणे ३) मयुर माणिक पुरकास्त, वय १८ वर्षे, रा. कृष्णानगर, बुध्दविहार जवळ, पुणे ४) ऋषीकेश विठ्ठल घाडगे, वय २० वर्षे, रा. तरवडे वस्ती, पुणे ५) शुभम नंदु चव्हाण, वय १९ वर्षे, रा. तरवडे वस्ती, बी-६०४, मोहंमदवाडी, पुणे यांनी केला असुन, नमुद गुन्हयात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच ६) एक विधिसंघर्षीत बालक (टोळी सदस्य) यास ताब्यात घेवुन बाल न्यायालय येरवडा, पुणे येथे हजर केले आहे. ७) एक पाहिजे आरोपी आहे.
नमुद आरोपी नामे गणेश बबन लोंढे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून, दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवुन किंवा हमला इत्यादी करण्याची पुर्वतयारी करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता मागील १० वर्षामध्ये सदर टोळीने संघटितपणे व वैयक्तीकपणे, खुनाचा प्रयत्न, चोरी करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर जमावजमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, दरोडयाची तयारी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल असुन, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) चा प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०५, पुणे, श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. १०१९/२०२३ भादविक ३०७,५०४,५०६,३४ क्रि. लॉ. अॅ. अॅक्ट कलम ७ आर्म अॅ.कलम ४ (२५) या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, शाहुराजे साळवे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग विभाग, पुणे, श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), संदीप भासले, संजय मोगले, सहा. पोलीस निरीक्षक, राजेश उसगावकर, गणेश तोरगल, पोलीस उप-निरीक्षक, इकबाल शेख, पोलीस अंमलदार, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर,रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९१ वी कारवाई आहे

उत्तरकाशी बोगद्यातून मजुरांना बाहेर काढले….

0

12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या सिल्कियारा-दांदलगाव बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. 33 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. सायंकाळी 7.50 वाजता पहिल्या मजुराला बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आले. उर्वरित देखील लवकरच बाहेर काढले जातील.कामगार बाहेर येताच स्थानिकांनी मिठाईचे वाटप केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिल्कियारा बोगद्यातील दुर्घटनेत अडकलेल्या ४१ मजुरांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आल्याने मी आनंदी आहे. अनेक यंत्रणांनी केलेले हे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाच्या बचावकार्यापैकी हे बचावकार्य महत्त्वाचे ठरले. विविध विभाग आणि प्रत्येत यंत्रणांनी एकमेकांना पूरक सहकार्य केले. इतर अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले.

बचाव पथकाचे सदस्य हरपाल सिंग यांनी सांगितले की, पहिला ब्रेक थ्रू संध्याकाळी 7.05 वाजता सापडला. लवकरच सर्व कामगार बाहेर येतील.उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कामगारांशी संवाद साधला.

या कामगारांच्या सुटकेच्या मोहिममध्ये जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख अरनॉल्ड डिक्स यामध्ये सहभागी झाले. अरनॉल्ड डिक्स हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत.अरनॉल्ड डिक्स यांनी आज सकाळी बचावक कार्य यशस्वी होत असल्यानं समाधान वाटत असल्याचं म्हटलं होतं. ऑगर मशीन ४८ मीटरपर्यंतचं खोदकाम केल्यानंतर बंद पडली होती. त्यानंतरचं खोदकाम रॅट होल मायनर्स यांच्याकडून करण्यात आलं.

अरनॉल्ड डिक्स हे या मोहिमेत २० नोव्हेंबरपासून सहभागी झाले होते. अरनॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन, जिनेव्हाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्याकडे भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी आणि कायदा विषयाच्या पदव्या आहेत. त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयाची पदवी मोन्साह विद्यापीठ मेलबर्न येथून मिळवली आहे.

अरनॉल्ड डिक्स हे गेल्या ३० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत भूमिगत सुरक्षेसंदर्भातील कामांमध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. कतार रेड क्रिसेंट सोसायटीशी ते २०१६ ते २०१९ दरम्यान संबंधित होते.२०२० मध्ये देखील एक त्यांनी भूमिगत बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या मोहिमेत सहभाग घेतला होता.

काँग्रेसच्या आंदोलनाचा दणका:शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी लागले-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा दणका दिल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी आणि महामेट्रोच्या खर्चात बांधण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.

प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी होण्यासाठी १५ दिवसांत निर्णय घेतला जावा, अशा मागणीसाठी माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते. हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मुख्य मंत्र्यांनाच पुण्यात अडवू, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला होता.

महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले होते. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी एसटी स्थानक पूर्ववत करण्याबाबत निर्णय होत नव्हता. एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर झाला होता. परिवहन खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने आंदोलनानंतरही प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

एसटी प्रवाशांची सोय व्हावी तसेच एसटी स्थानकाचे स्थलांतर पुणे -मुंबई महामार्गावर वाकडेवाडी जवळ झाल्याने तेथील वाहतुकीची समस्या बिकट झाली होती, ती समस्याही सुटावी, अशा दुहेरी हेतूने काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला होता. अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.

अशा प्रकारे होणार रेस्क्यू…16 दिवस अडकलेल्या 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर येण्यास उरला काही अवधी

0

12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या सिल्कयारा-दांदलगाव बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पाईप आत जाण्यासाठी काही अंतर बाकी आहे. यानंतर रॅम्प बांधण्यात येणार आहे. यानंतर 16 दिवस अडकलेल्या 41 मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यात येणार आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनन म्हणाले – खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पाइपपर्यंत बोगद्यात रॅम्प तयार केला जाईल. रॅम्प बनवण्यात काही अडचण आल्यास शिडी बसवण्यात येईल. याद्वारे कामगारांना पाइपवर नेले जाऊ शकते. पाइपवर पोहोचल्यावर कामगारांना स्ट्रेचरवर झोपवले जाईल आणि दोरीच्या साहाय्याने ओढून बाहेर काढले जाईल. एका कामगाराला बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी 3 ते 5 मिनिटे लागतील.एकदा सर्व पुरुषांना बाहेर काढल्यानंतर, त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार केल्या गेल्या आहेत, त्यांच्या वैद्यकीय कल्याणासाठी कोणतीही शिथिलता ठेवली जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात 30 खाटांची सुविधा तर जागेवरच 10 खाटांची सुविधा तयार आहे. स्टँडबाय चिनूक हेलिकॉप्टर जवळच्या हेलिपॅडवर उपलब्ध आहे. मात्र, ते रात्रीच्या वेळी उडवले जाणार नाही. तातडीची गरज असल्यास, कामगारांना ऋषिकेशला आणण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. कामगारांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्यासाठी साइटवर ट्रायज केले जाईल. कामगारांनी अनुभवलेल्या दीर्घ कालावधीच्या अलगावमुळे उद्भवू शकणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन त्यांचे 48 – 72 तास निरीक्षण केले जाईल.

रुग्णवाहिकेशिवाय बोगद्याच्या आत स्ट्रेचर आणि गाद्या पोहोचवण्यात आल्या आहेत. येथे रुग्णालय बांधण्यात आले आहे. बचावकार्यानंतर कामगारांना येथे ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना 30-35 किमी दूर असलेल्या चिन्यालिसौर येथे नेले जाईल. जेथे 41 खाटांचे विशेष रुग्णालय बांधण्यात आले आहे. जर कोणत्याही मजुराची प्रकृती बिघडली, तर त्याला तत्काळ एअरलिफ्ट करून एम्स ऋषिकेशमध्ये पाठवले जाईल.चिन्यालीसौर विमानतळावर चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही मजुराची प्रकृती खालावल्यास त्याला हेलिकॉप्टरने तत्काळ ऋषिकेश एम्समध्ये पाठवले जाईल.

तत्पूर्वी, सिल्कयारा बाजूकडून आडवे ड्रिलिंग करण्यात गुंतलेले उंदीर खाण कामगारांनी उत्खनन पूर्ण केले आणि अपघाताच्या 17व्या दिवशी दुपारी 1.20 वाजता पाईपमधून बाहेर आले. त्याने सुमारे 21 तासांत 12 मीटर मॅन्युअल ड्रिलिंग केले. 24 नोव्हेंबर रोजी ऑगर मशीन कामगारांच्या ठिकाणापासून फक्त 12 मीटरवर तुटली. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले.यानंतर उर्वरित ड्रिलिंगसाठी लष्कर आणि रॅट मायनर्सना पाचारण करण्यात आले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अधिकाऱ्यांनी कपडे व दप्तर तयार ठेवण्यास सांगताच कामगारांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. लवकरच चांगली बातमी येत आहे.

शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी, कामगारांच्या ठिकाणापूर्वी केवळ 12 मीटर आधी मशीनचे ब्लेड तुटले. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 12 नोव्हेंबर रोजी निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे बोगद्यात काम करणारे ४१ मजूर आत अडकले होते. उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी सोमवारी संध्याकाळी देशवासियांना केले. त्यांची सुटका करण्यात सरकार कोणतीही कसर सोडत नसल्याचे ते म्हणाले.

16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर लांबीचे व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. आतापर्यंत 31 मीटर खोदकाम झाले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय के भल्ला आणि उत्तराखंडचे मुख्य सचिव एसएस संधू हे देखील बोगद्यातील बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.

बचाव कार्याबाबत महत्वाची अद्ययावत माहिती :

1. एनचआयडीसीएलचे जीवनरक्षणासाठीचे प्रयत्न:

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे ठराविक अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • एसडीआरएफने उपलब्ध मनुष्यबळासह व्हिडिओ संप्रेषण स्थापित केले आहे आणि एनडीआरएफने थेट लाईन संपर्क स्थापित केला आहे.

2. एनएचआयडीसीएल द्वारे हॉरीझॉन्टल बोरिंग (आडवे खोदकाम)

  • आतापर्यंत एकूण 58 मीटर पर्यंत पाईप आत ढकलण्यात आला आहे.

3.सतलज जल विद्युत निगम- द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग (उभे खोदकाम) (1.0 मीटर व्यास):

  • ड्रिलिंग काम सुरू झाले असून वार्तांकनाच्या वेळेपर्यंत 45 मीटर चे काम पूर्ण झाले.

4.टीएचडीसीएल द्वारे बरकोट बाजूला आडवे ड्रिलिंग:

  • टीएचडीसी ने बरकोट बाजूला बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे.
  • 28.11.2023 रोजी 0500 वाजता सातवा स्फोट करण्यात आला.
  • बोगद्याची एकूण निष्पादित लांबी 13.20 मीटर आहे. पुढे, खोदकाम सुरु आहे.
  • 18 रीब्सच्या फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

5.आरव्हीएनएल द्वारे लंब-क्षैतिज ड्रिलिंग:

  • मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या ड्रिलिंगसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म बोगद्यासाठी लागणारी उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.
  • प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

6.सिल्क्यरा टोकाला आरव्हीएनएल द्वारे उभे ड्रिलिंग (8 इंच व्यास):

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणि आरव्हीएनएल ला सुपूर्द केला आहे. ड्रिलिंगसाठी बीआरओ ने घटनास्थळी मशीन आणले.
  • आरव्हीएनएल ला विद्युत जोडणी प्रदान करण्यात आली आहे.
  • उभ्या ड्रिलिंगसाठी प्लॅटफॉर्म पूर्ण झाला आहे.
  • 26.11.2023 रोजी 0400 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 72 मीटर काम पूर्ण झाले.

7.ओएनजीसी द्वारे बरकोट टोकाकडे उभे ड्रिलिंग (24 इंच व्यास).

  • ओएनजीसी ने पुरवलेली एअर हॅमर ड्रिलिंग रिगची सर्व संबंधित सामग्री ऋषिकेश येथे पोहोचली आहे, कारण ड्रिलिंगसाठी रिग ठेवण्यासाठी बीआरओ द्वारे मार्ग आणि जागा तयार केली जात आहे.

8.टीएचडीसीएल/लष्कर/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल च्या संयुक्त टीमद्वारे मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेल:

  • 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.