Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

Date:

दिल्ली-कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला . ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 42 दिवस ते कोमात होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. विनोदाच्या दुनियेत आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या राजू यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात 5 भावंडे, पत्नी शिखा, मुलगा आयुष्मान, मुलगी अंतरा असे कुटुंब आहे.

11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होता. 31 जुलैपर्यंत ते सतत शो करत होता, अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते.

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी एक खास ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये अमिताभ म्हणाले होते – उठ राजू, खूप झाले, अजून खूप काम करायचे आहे. आता उठ… आम्हा सर्वांना हसायला शिकवं.” हे रेकॉर्डिंग राजू यांना ऐकवले गेले होते.

राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही होते. संघर्षाच्या काळात राजू यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘आमदानी अठ्ठनी खर्चा रुपैया’ आणि ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मुळे राजू यांनी लोकप्रियता मिळाली. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता.

राजू यांनी ‘बिग बॉस 3’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 2014 मध्ये राजू यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आले होते, तरीही त्यांनी काही काळानंतर तिकीट परत केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा भाग बनवले होते, त्यानंतर राजू सतत त्यांच्या कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेशी संबंधित जनजागृती करत असत.

10 वर्षांत तीनदा झाली होती अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांची 10 वर्षांत तीनदा अँजिओप्लास्टी झाली होती. पहिली अँजिओप्लास्टी 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांपूर्वी पुन्हा मुंबईच्याच लिलावती रुग्णालयात ते यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर 11 ऑगस्ट 2022 रोजी डॉक्टरांनी त्यांची तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी केली होती.

सामाजिक कार्यात अग्रसेर होते राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव सामाजिक कार्यात पुढे असायचे. त्यांनी कानपूर येथे त्यांचे दिवंगत मित्र राजेशच्या कुटुंबीयांच्या संपूर्ण खर्च उचलला होता. याशिवाय त्यांनी त्यांच्या परिसरातील रस्तेही बांधले आहेत. कानपूर येथे त्यांच्या शेजारी राहणारे रवी कुमार यांनी सांगितल्यानुसार, राजू काकांमुळे कधीही या परिसरात वाद झाले नाहीत. मदत करणे हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग होता. त्यांच्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात विहिंपचे जन आक्रोश आंदोलन 

विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी...

निष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले 

लेखक आनंद माडगूळकर : हटके म्युझिक ग्रुप 'हटके गीत...

तणावग्रस्तांच्या ९३४० कॉलमध्ये ६५ टक्के पुरुषांचे, ३ महिन्यात २४४ पैकी १७७ आत्महत्या पुरुषांच्या ..

तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा… टोकाचा निर्णय घेऊ नका! कनेक्टिंग...

हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यासकट उखडून टाकू-उद्धव बाळासाहेब ठाकरे

घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करा मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...