राजकारणात संवेदनशील काम करणाऱ्या व्यक्तींची गरज – केंद्रियमंत्री नितीन गडकरी
मुंबई -राजकारण हे एक कोरडे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्रामध्ये संवेदनशील काम करणाऱ्या व्यक्तींची आज समाजाला खरी गरज आहे. आपल्या सारख्या लेखकाला राजकारणात यायची इच्छा असेल तर आपण नक्की राजकारणात सहभागी व्हावे असे मत आज दादर पश्चिम रविंद्र नाट्य मंदिर येथे शंकराचार्य महाराज यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या हिंदी, इंग्रजी व मराठी प्रख्यात लेखक माणिक मुंडे यांच्या पुस्तक लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रिय नौकायन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले असून ‘आदी रात जगाने आया हूँ! आणि गाईन ओवी गाईन नाम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
मराठी आणि हिंदी पुस्तकाचे एकाच वेळी प्रकाशन होणे हा एक ऐतिहासिक योग असून आईने रचलेल्या गीतांचे पुस्तक तयार करून माणिक मुंडे यांनी ते प्रकाशित करण्याचे कार्य केले आहे आणि हे कार्य मुलाच्या हातून घडणे हि एक अनोखी गोष्ट आहे. असे गौरउद्गार कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी काढले. तर आजवर अनेक पुस्तके लिहली गेली वाचणाऱ्यानी वाचलेही मात्र आपल्या आत्म्याला समाधान देणारे असे पुस्तक लिहण्याचा प्रयत्न लेखक माणिक मुंडे यांनी आपल्या आई गंगाबाई मुंडे यांनी रचलेल्या गीतातून ‘आदी रात जगाने आया हूँ! आणि गाईन ओवी गाईन नाम’ हि दोन पुस्तके लिहली असल्याचे मुंडे यांनी सांगितले असून बदलत्या जीवनशैलीमध्ये मानव वरवर समाधानी वाटला तरी आतून तो समाधानी नाही कारण बाहेरील जीवन मानवाला समाधान देऊ शकत नाही. या समाधानी जीवनासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे असेही मुंडे म्हणाले. तसेच कार्यक्रमा निमित्त उपस्थित असलेले जैन धर्मगुरू न्याय पद्मसागर म्हणाले कि हे पुस्तक एखाद्या वाट चुकलेल्या अथवा जीवनात नैराश्य प्राप्त झालेल्या व्यक्तीला अंधारातही मार्ग दाखवणारे आहे.
तर पाहल्यांदाच मराठी व्यक्तीला हिंदी पुस्तक लिहिल्याबद्दल वाणी प्रकाशनच्या वतीने मानधन स्वरूपात 10 लाख रुपये रक्कम या दरम्यान देण्यात आली असून यातील 1 लाख रुपये रकमेचा चेक मुंडे यांनी शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत निधीमध्ये जमा करण्यासाठी गडकरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी भाजप नेता प्रविण दरेकर, भाजप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अमरजित मिश्र, हरिद्वार चे शंकराचार्य, बौद्ध धर्मगुरू मास्टर कर्मा तानपाई गियालेशन, जैनमुनी पदमा सागर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ल यांनी केले.