मुंबई – बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलेले स्पर्धक स्वामी ओम यांनी अभिनेता सलमान खानला मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर या रिअॅलिटी शोची फायनल उधळून लावण्याचीही धमकी दिली आहे. स्वामी ओमचे म्हणणे आहे की, जर सलमानने त्यांना परत बिग बॉसच्या घरात बोलाविले नाही तर सलमानची धुलाई करतील.
बिग बॉस एक कलर वाहिनीवर प्रसारित होणारा रिअॅलिटी शो आहे. यामध्ये ओम एक स्पर्धक होता परंतु दुसऱ्या स्पर्धकांवर मूत्र फेकल्याच्या घटनेनंतर त्याला घरातून बाहेर काढण्यात आले.
सलमान खान या शोचा होस्ट आहे. स्वामी ओमने असाही दावा केला आहे की, सलमान खान हात जोडून त्यांना बिग बॉसच्या घरात परतण्याची विनंती करत आहे. ओमने म्हटले आहे की, जेव्हापासून मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलो आहे तेव्हापासून शोचा टीआरपी घसरला आहे.त्यामुळे कलर चॅनलवाले त्यांना परत बोलावत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, घरात मी अभिनय करत होतो व मी एक चांगला खलनायक असल्याचे सिद्द केले आहे. जगातील टॉपचा खलनायक होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ओमने दावा केला आहे की, त्यांनी दोन-तीन दाक्षिणात्या चित्रपटात काम करण्याच्या ऑफर आल्या आहेत.
आपल्याच दाव्यातील विसंगती दाखवत स्वामी यांनी म्हटले की, जर त्यांना परत बोलाविले नाही तर ते बिग बॉसची फायनल होऊ देणार नाहीत. त्यांनी सांगितले की, ते तेथे जातील व फायनलसाठी तयार केलेल्या स्टेजवरच सलमानची धुलाई करतील.ओमने सलमानला देशद्रोही म्हणून संबोधले आहे. स्वामीने म्हटले की, २८ जानेवारी रोजी ते एक लाख लोकांना घेऊन जातील व सलमानला मारहाण करतील. त्यांनी म्हटले की, मी सलमानची हत्या करणार नाही परंतु त्याला चांगलाच धडा शिकवेन. स्वामी ओमने रोहन मेहरा आणि बीजे बानीवर यांच्या अंगावर मूत्र फेकले होते.