ही नरकासुराची कथा !

Date:

महात्मा बळीची कथा जशी धुसर करत नेली गेली तशीच नरकासुराचीसुद्धा गत आहे. नरकासुराची कथा अवतरते महाभारतात व नंतर विस्तृत स्वरुपात हरीवंशात. आधी आपण नरकासुराच्या उपलब्ध काहे कथांचा आढावा घेऊ!
भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने पराजित केलेल्या सर्व राजांच्या १६००० राजकन्यांना पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांनाही वरदान दिले. नरकासुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला आणि मधे किती अवतार झाले याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?
कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. माहिती समजताच कृष्णाने गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षौहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.
याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक आवृत्ती येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.
नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या राजकन्या कोणाच्या राजांच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारंण नरकासुराने (ही कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा नरक चतुर्दशी साजरी होण्याचे खरे कारण विकृत बनवण्यासाठी बनवण्यात आलीय हे उघड आहे.
ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. (भुदेवी शक्तीचेच एक स्वरुप आहे) महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. त्यामुळे ते ऐतिहासिक मानता येत नाही.
कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. बाणासुराचा बळीशी का संबंध जोडला हे अनाकलनीय असले तरी असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व असे का याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी ’त्याने तसे वरदानच मागितले होत” अशा स्पष्टीकरण कथा नंतर बनवल्या गेल्यात हे उघड आहे.
प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.
म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध, अगदी कथात्मक का होईना जोडणे, अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.
म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ. त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.
नरकासूराचा संबंध “नरक” या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात “नरक” या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्कानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये “क” म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू “काश” धातुपासून अर्धांग का घेतले तर.)
नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक…म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले? खरे तर नरकचतुर्दशी लोक आनंदानेच साजरा करतात तेंव्हा ’नर+क=आनंदी-उत्साही माणुस’ अशीच व्युत्पत्ती घेणे योग्य नाही काय?
थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन आगमिक संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो…नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. वैदिक धर्मसंस्कृतीचा हिंदुंवरील प्रभाव असला तर तो फक्त भोंगळ कथात्मक आहे. बाकी आगमिक संस्कृतीचा प्रवाह अव्याहत आजही वहात राहिलेला आहे व पुढेही वहात राहील.
लेखक -संजय सोनवणी
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घोष पथकाच्या वादनातून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना

पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि...

पाणी साठवा, पण झाकून ठेवा; डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पुणे, दि. १८ : उन्हाळ्यात आणि ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’...

जगभरातील सैन्य दलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माउंटेड आर्टिलरी गन प्रणाली उपलब्ध करण्याचा करार

पॅरिस, फ्रान्स, १८ जून २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) लष्करी वाहनाधारित संरक्षण प्रणाली विकसित करणारी आघाडीची कंपनी एएम जनरल हिच्यासोबत युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात आज धोरणात्मक भागीदारी करार केला. बदलत्या युद्धपरिस्थितीत जगभरातील आधुनिक सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यात ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे सैन्य दलांना आकाराने कॉम्पॅक्ट, हलक्या वजनाचा, टिकाऊ, कठीण परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करणारा तसेच सर्व हवामानात आणि सर्व प्रकारच्या भूभागांवर सहज वापरता येणारा अत्याधुनिक ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सैन्य दलांना विशेष स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो. या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने ही भागीदारी मित्रदेशांमधील व्यापक वितरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक, गतिमान आणि युद्धपरिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या १५५ मिमी तोफखान्याची क्षमता विकसित करू इच्छिणाऱ्या भागीदार देशांसाठी हे व्यासपीठ विस्तारक्षम आणि निर्यातीसाठी योग्य उपाय म्हणून सादर केले जाणार आहे. या धोरणात्मक भागीदारीचा लाभ घेत ‘एएम जनरल’ने अमेरिकी लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ (एमटीसी) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकी सरकारला सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये केएसएसएलच्या माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मच्या युद्धपरिस्थितीत उपयुक्त ठरलेल्या आणि सिद्ध झालेल्या रचनेवर आधारित १५५ मिमी एमटीसी प्रणाली विकसित करून पुरविण्याचा समावेश आहे. या प्रस्तावाची निवड झाल्यास, या प्रणालीचे वितरण २०२७मध्ये करण्याचे नियोजन आहे. विशेष विकसित करण्यात आलेल्या पॉवरपॅक आणि सस्पेन्शन प्रणालीसह कमी वजनाच्या या वाहनामुळे एमएआरजी प्रणाली लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच रणांगणावरील जलद हालचालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रणालीमध्ये ५२ कॅलिबर १५५ मिमी तोफ, पेटंटप्राप्त सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी (एसआरटी) आधारित रीकॉइल नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात कार्य करणारी प्रगत फायर कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष मारा करणे शक्य होते. ही प्रणाली प्रमाणित उच्च-स्फोटक प्रक्षेपास्त्र ४० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत डागू शकते. तसेच या वाहनामध्ये २० हून अधिक प्रक्षेपास्त्रे आणि प्रोपेलंट चार्जेस साठवता येतात. पारंपरिक तोफखाना प्रणालींच्या तुलनेत ‘एमएआरजी’मधील एसआरटी प्रणाली ही रीकॉइलमधून निर्माण होणारा अधिकचा जोर शोषून घेते. त्यामुळे वाहन आणि टॉवरचे वजन कमी ठेवणे शक्य होते. तसेच संपूर्ण शस्त्र प्रणालीवर तिच्या वापराच्या कालावधीत कमी ताण येतो. ‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, "आमच्या प्रगत तोफखान्याच्या क्षमतांवर एएम जनरलने विश्वास दाखवला आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक आणि युद्धपरिस्थितीत सिद्ध झालेली उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून ही भागीदारी साकार झाली आहे." ‘एएम जनरल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न म्हणाले, "केएसएसएल’सोबतची ही भागीदारी आमच्या मित्रदेशांना आणि रणांगणावरील सैनिकांना सहाय्य करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि सिद्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’चा समावेश करून आम्ही खऱ्या अर्थाने नवी क्षमता उपलब्ध करून देत आहोत. रणांगणावरील बदलत्या परिस्थितीत यामुळे लष्करी दलांना महत्त्वाचा फायदा मिळू शकतो." केएसएसएल भारतात विकसित करण्यात आलेल्या आणि जागतिक दर्जाच्या निकषांशी सुसंगत संरक्षण प्रणाली तयार करते. भारतासह जगभरातील देशांना प्रगत संरक्षण क्षमता उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासह डी बिअर्स ग्रुपकडून वडील आणि मुलीच्या स्वाभाविक नात्याचा उत्सव

- यंदाच्या फादर्स डे निमित्त 50 स्टोअर्समध्ये ग्राहकांसाठी एक अनोखा उपक्रम – पुणे-18 जून 2026: डी बिअर्स ग्रुप यंदाचा फादर्स डे आपल्या ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेत एक अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक भर घालून साजरा करत आहे. या मोहिमेअंतर्गत ख्यातनाम अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांची कन्या आशी यांच्यासोबत तयार करण्यात आलेल्या एका विशेष फिल्मद्वारे वडील आणि मुलगी यांच्यातील काळानुरूप विकसित होत जाणारे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. विश्वास, प्रोत्साहन आणि निःस्वार्थ, निरपेक्ष पाठिंबा या मूल्यांवर उभ्या असलेल्या या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास या फिल्ममध्ये मांडण्यात आला आहे. स्वतःची अभिव्यक्ती आणि वाढत्या स्वातंत्र्याचे अर्थपूर्ण प्रतीक ठरलेल्या दुसऱ्यांदा कान टोचून घेण्याच्या निर्णयाभोवती केंद्रित असलेली ही फिल्म वडील-मुलीच्या नात्यातील सर्वात प्रामाणिक आणि भावनिक क्षणांना जिवंत करते. समुद्रकिनाऱ्याच्या निवांत आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या या कथेत वाळूत उमटलेली पावले काळाच्या प्रवाहाचे आणि अधिक दृढ होत गेलेल्या नात्याचे प्रतीक बनतात. ही चित्रफीत प्रत्येक वडिलांना जवळची वाटणारी एक जाणीव टिपते. एकेकाळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी मुलगी आता आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग निवडत पुढे जात आहे. अभिमानाने भरलेल्या या शांत क्षणी नैसर्गिक हिरा हा केवळ एक भेटवस्तू राहत नाही; तो वडिलांकडून मुलीला दिलेला “मी तुला बघत आहे, समजून घेत आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू जशी घडत आहेस त्याचा मला अभिमान आहे,”  असा एक संदेश ठरतो. ही कथा भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डी बिअर्स ग्रुपने देशभरातील 50 निवडक रिटेल स्टोअर्समध्ये व्यापक उपक्रम सुरू केला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनऊ आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये वडील आणि मुलींना एका अनोख्या, आठवणींना उजाळा देणाऱ्या रिटेल अनुभवात सहभागी होता येणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक ग्राहक आपल्या नात्याची एक गोड आणि कायमस्वरूपी आठवण सोबत घेऊन जाईल. फादर्स डे सप्ताहाच्या अखेरीस (20 - 21 जून, 2026) या निवडक स्टोअर्समध्ये नामांकित छायाचित्रकारांकडून वडील आणि मुली विशेष छायाचित्रे काढून हा क्षण संस्मरणीय बनवू शकतील. पहिल्यांदा कान टोचण्याचा कार्यक्रम हा परंपरेनुसार होत असतो. पण दुसऱ्यांदा कान टोचणे हा एका तरुणीचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. तो तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवतो. ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेद्वारे डी बिअर्स नैसर्गिक हिऱ्याला या विशेष क्षणाचा गौरव करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणून सादर करत आहे. नैसर्गिक हिऱ्याची दुर्मिळता, टिकाऊपणा आणि चिरस्थायित्व हे गुण वडील मुलीच्या नात्याच्या अढळ आणि दृढ बंधाशी जोडले गेले आहेत. डी बिअर्स इंडियाच्या कॅटेगरी मार्केटिंगच्या कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाल्या, “नैसर्गिक हिरे हे नेहमीच आयुष्यातील अत्यंत दुर्मिळ आणि विशेष क्षणांचे साक्षीदार राहिले आहेत. यंदाच्या फादर्स डे निमित्त आम्ही दुसऱ्यांदा कान टोचण्याचा निर्णय घेणे या गोष्टीचा मुलीच्या स्वातंत्र्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून गौरव करत आहोत. पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासोबत सहयोग करताना आम्ही प्रामाणिकपणा आणि दुर्मिळतेवर आधारित एका सुंदर नात्याचा उत्सव साजरा करत आहोत. भारतभरातील 50 हून अधिक स्टोअर्समध्ये परस्परसंवादी उपक्रमांद्वारे ही कथा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे कुटुंबांना मोहिमेशी जवळून जोडले जाण्याची, नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि स्वतःसाठी एक अविस्मरणीय आठवण जपण्याची संधी मिळेल.” पंकज त्रिपाठी यांच्यासाठीही हा सहयोग अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचा होता. आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी म्हणाले, “वडील म्हणून काही क्षण अत्यंत भावनिक असतात. त्यापैकी एक म्हणजे आपले मूल स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे आणि स्वतःचे निर्णय घेत आहे याची जाणीव होण्याचा क्षण. दुसऱ्यांदा कान टोचणे हा अशाच आत्मविश्वासाच्या क्षणाचे प्रतीक आहे. या कथेत मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे एक साधी, छोटी कृती  आयुष्यभर जपली जाणारी आठवण बनू शकते. माझी मुलगी आशीसोबत हा अनुभव शेअर करणे माझ्यासाठी खूपच विशेष ठरले. नैसर्गिक हिरा हा वडिलांच्या प्रेमाप्रमाणेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तितकाच अढळ आणि कायमस्वरूपी सोबत राहतो.” फादर्स डे निमित्त तयार करण्यात आलेली ही व्हिडिओ मालिका डी बिअर्स ग्रुपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित केली जाणार असून भारतभरातील कुटुंबांना क्षणिक ट्रेंड्सच्या पलीकडे टिकून राहणाऱ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. या सहयोगाद्वारे डी बिअर्स जीवनातील सर्वात अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या केंद्रस्थानी नैसर्गिक हिऱ्यांना स्थान देण्याची आपली परंपरा पुढे नेत आहे. रील पाहण्यासाठी @heerahaisadakeliye ला भेट द्या आणि नैसर्गिक हिऱ्यांविषयी अधिक माहितीसाठी www.adiamondisforever.com ला भेट द्या. यंदाच्या फादर्स डे निमित्त आपल्या खास छायाचित्रांद्वारे एक सुंदर आठवण जपण्यासाठी https://withlovefromdad.netlify.app/  ला भेट द्या.