मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन चालविले आहे , आणि मनसे ची हि गुंडागर्दी मुख्यमंत्री पाठीशी असल्याने ,त्यांच्या मूक सहमतीनेच चालू असल्याचा आरोप केला आहे .
संजय निरुपम मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी खुलेआमपणे धमकी दिली. कायदा, मुख्यमंत्री यांना खुलं आवाहन दिलं. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. त्यांनी 15 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.मनसेच्या कार्यकर्त्यांनी गरीब आणि परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला चढवला. मात्र पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. मनसेच्या गुंडगिरीचं मुख्यमंत्र्यांनी समर्थनच केल्याची टीका निरुपम यांनी केली.