पुणे-सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवुन काम करण्यावर भाजप चा भर असणार आहे आणि येणाऱ्या काळात पुणेकरांना त्याचा प्रत्यय येइल असे मनोगत ना गिरीश बापट यांनी व्यक्त केले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.भाजपचे नगरसेवक हे त्यांच्या भागात सर्वसामान्य पुणेकरांना अपेक्षित असलेले विषय हातात घेउन काम करतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असे ही ते म्हणाले.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी,संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,राधाबाई एग्रो फार्मस चे संचालक शांताराम रायकर,कार्यकारी संचालक निलेश रायकर,कर्वेनगर वारजे प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे,नगरसेवक दीपक पोटे,माधुरी सहस्त्रबुद्धे,जयंत भावे,प्रभाग १३ चे सरचिटणीस बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,राज तांबोळी,आनंद रणपिसे,माणिकताई दीक्षित,कुलदीप सावळेकर,स्मिता गिरमे,स्वातीताई हिर्लेकर,सुवर्णाताई काकडे,प्राची बगाटे,संगीता शेवडे,कल्पनाताई पुरंदरे,भारतीताई अकोलकर,प्रशांत हरसुले,बापूसाहेब मेंगडे,सुधीर नाईक,प्रमिलाताई फाले,अपर्णा लोणारे,गणेश गुर्जर,चंद्रकांत भिसे,आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजुश्री खर्डेकर या कार्यक्षम नगरसेविका असून त्यांनी प्रभागात विविध उपक्रमांचे सातत्य ठेवले आहे असे गौरवोदगार आमदार मेधा कुलकर्णी यांनी काढले.आजचा शेतकरी आठवडे बाजार ही नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करुन ” राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट शेत माल विक्रीची परवानगी दिल्याने त्याचा लाभ शेतकरी आणि नागरिकांना होत असल्याचे ही त्या म्हणाल्या.
मी माझ्या प्रभागातील नागरिकांना ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या उपक्रमाना राबविण्यावर भर दिला असून शेतकरी आठवडे बाजारात नेहमीच्या भाज्या वगळुन अस्सल गावरान आणि ताज्या भाज्या नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.यांचे दर ही रास्त असून यामुळे प्रभागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या कचरा,पाणी,वीज,रस्ते या समस्या सोडवण्याबरोबरच आता भाजीपाला ही रास्त दरात उपलब्ध करुन दिल्याने लोकोपयोगी विकास कामांचे चक्र पूर्ण होत असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी नमुद केले.या बाजारात जळगांव चे प्रसिद्ध मांडे,राजसी भाज्या ( Exotic Vegetables ) सेंद्रीय ,गावरान भाजीपाला,धान्य ,कडधान्य, गूळ ,काकवी लाकडी घाण्यावरचे तेल इ उपलब्ध असुन दर शुक्रवारी हा बाजार भरणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.तसेच लवकरच नवसह्याद्री परिसर,सहवास सोसायटी परिसर आणि प्रभात रस्ता येथे ही शेतकरी आठवडे बाजार सुरु करणार असल्याचे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
आमदार मेधा कुलकर्णी आणि श्री भगवान गवळी यांच्या हस्ते श्री संदीप खर्डेकर यांचा उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन पटवर्धन बाग येथे करण्यात आले असुन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,राधाबाई एग्रो फार्मस प्रोडयुसर कंपनी आणि क्रिएटिव्ह फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर सूत्र संचालन संदीप खर्डेकर यांनी केले.उपस्थितांचे स्वागत राधाबाई एग्रो फार्मस चे संचालक शांताराम रायकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश रायकर यांनी केले.