पुणे(प्रतिनिधी):- सध्या सर्वञ वृक्ष लावण्यापेक्षा तोडण्यावरच जास्त भर असतो .माञ सर्वांनी एक तरी झाड लावले पाहिजे . सध्याच्या काळात वृक्षारोपण हि काळाची गरज आहे . असे मत नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी व्यक्त केले. निरंकारी फाऊंडेशन मार्फत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले . त्या प्रसंगी नगरसेवक सुतार उपस्थित होते. निरंकारी फाऊंडेशन गेले काहि वर्षापासून स्वच्छता अभियान करत आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरूष, मुले , वृद्ध सहभागी असतात. असे ते म्हणाले. जोनल इंचार्ज महात्मा ताराचंद करमंदानी यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. गेल्या काहि वर्षापासून पुणे शहर नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हात आम्ही स्वच्छता मोहिम राबवतो . आमचे सद्गगुरू हरदेव सिंह महाराज यांच्या आठवणीतील एक क्षण म्हणून पाषाण सूतारवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असे त्यांनी सांगितले. 120 वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी निरंकारी फाऊंडेशनच्या 150 हून अधिक सदस्यांनी हजेरी लावली होती.