Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढला- पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Date:

पुणे-राजवट बदलली की वेगवेगळ्या प्रकारचे न्याय मिळतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. सरकारकडून ‘गो स्लो’ असे सांगितल्यानंतर तपास यंत्रणांकडून न्यायालयात योग्य पुरावे सादर केले जात नाहीत. परिणामी सरकारी पक्षाकडून खटला चांगल्या पद्धतीने मांडलाच गेला नाही तर न्यायालय काय निकाल देणार? अशी टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप शनिवारी केला.

परिवर्तन युवा परिषदेच्यावतीने आयोजित ‘तरुणांनी राजकारणात का यावे?’ या विषयावरील चर्चासत्रात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. खासदार राजू शेट्टी हेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. सहकार, राजकारण, कर्जमाफी, समाजमाध्यमे अशा विविध विषयांवर दोघांनीही परखड मते व्यक्त केली. प्रत्येक तरुणाने आधी समाजकारणात आले पाहिजे. देशात घडणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपले स्वत:चे असे एक मत बनवावे आणि ते मत ठामपणे सार्वजनिक ठिकाणी मांडावे. त्यातून आवड निर्माण झाल्यास राजकारणात यावे. राजकारण म्हणजे एक मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करणे नव्हे. अलीकडच्या काळात संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे मोठे विवाहसोहळे करणे ही फॅशन झाली आहे. अशा समाजभान विसरलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. न्यायपालिकांवर होणारा राजकीय हस्तक्षेप हा गंभीर प्रकार असून तो देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, सरकारच्या प्रत्येक धोरणाबाबत आपले सकारात्मक-नकारात्मक काहीतरी मत असले पाहिजे. माझ्यातला मी विसरून समाज, देश म्हणून संबंधित प्रश्नाकडे पाहता यायला हवे. राजकारण वाईट व गटारगंगा आहे अशा प्रकारची नकारात्मक भूमिका नसावी, असे वाटते. सर्व निर्णय राजकारणीच घेतात. त्यामुळे राजकारणी वाईट असू शकतील, तर मग चांगले राजकारणी कसे असू शकतात हे दाखवून देण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे.

राजकारणी, प्रशासनातले भ्रष्ट नोकरदार, पोलीस अधिकारी असे कोणीही गैरमार्गाने सार्वजनिक उपक्रमांना पैसे देत असतील तर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देता कामा नये, असे शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सहकाराचे गुजरातने अनुकरण केले आणि ते राज्य आज सहकारात अग्रक्रमावर आहे,  या उलट महाराष्ट्रात सहकार म्हणजे राजकारणाचे अड्डे झाल्याने सहकारक्षेत्राचे वाटोळे झाले. सहकार आणि राजकारण एकत्र करता येत नाही. सहकारक्षेत्रातील धुरिणांनी केवळ सहकारावरच लक्ष केंद्रित करावे. सहकारातून राजकारण करणाऱ्यांनी त्या क्षेत्राची वाट लावल्याचे अनेक दाखले शेट्टी यांनी या वेळी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान,...

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे....

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...