न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढला- पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Date:

पुणे-राजवट बदलली की वेगवेगळ्या प्रकारचे न्याय मिळतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. सरकारकडून ‘गो स्लो’ असे सांगितल्यानंतर तपास यंत्रणांकडून न्यायालयात योग्य पुरावे सादर केले जात नाहीत. परिणामी सरकारी पक्षाकडून खटला चांगल्या पद्धतीने मांडलाच गेला नाही तर न्यायालय काय निकाल देणार? अशी टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायपालिकांवर राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप शनिवारी केला.

परिवर्तन युवा परिषदेच्यावतीने आयोजित ‘तरुणांनी राजकारणात का यावे?’ या विषयावरील चर्चासत्रात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. खासदार राजू शेट्टी हेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. सहकार, राजकारण, कर्जमाफी, समाजमाध्यमे अशा विविध विषयांवर दोघांनीही परखड मते व्यक्त केली. प्रत्येक तरुणाने आधी समाजकारणात आले पाहिजे. देशात घडणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपले स्वत:चे असे एक मत बनवावे आणि ते मत ठामपणे सार्वजनिक ठिकाणी मांडावे. त्यातून आवड निर्माण झाल्यास राजकारणात यावे. राजकारण म्हणजे एक मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करणे नव्हे. अलीकडच्या काळात संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे मोठे विवाहसोहळे करणे ही फॅशन झाली आहे. अशा समाजभान विसरलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले. न्यायपालिकांवर होणारा राजकीय हस्तक्षेप हा गंभीर प्रकार असून तो देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, सरकारच्या प्रत्येक धोरणाबाबत आपले सकारात्मक-नकारात्मक काहीतरी मत असले पाहिजे. माझ्यातला मी विसरून समाज, देश म्हणून संबंधित प्रश्नाकडे पाहता यायला हवे. राजकारण वाईट व गटारगंगा आहे अशा प्रकारची नकारात्मक भूमिका नसावी, असे वाटते. सर्व निर्णय राजकारणीच घेतात. त्यामुळे राजकारणी वाईट असू शकतील, तर मग चांगले राजकारणी कसे असू शकतात हे दाखवून देण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे.

राजकारणी, प्रशासनातले भ्रष्ट नोकरदार, पोलीस अधिकारी असे कोणीही गैरमार्गाने सार्वजनिक उपक्रमांना पैसे देत असतील तर त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देता कामा नये, असे शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सहकाराचे गुजरातने अनुकरण केले आणि ते राज्य आज सहकारात अग्रक्रमावर आहे,  या उलट महाराष्ट्रात सहकार म्हणजे राजकारणाचे अड्डे झाल्याने सहकारक्षेत्राचे वाटोळे झाले. सहकार आणि राजकारण एकत्र करता येत नाही. सहकारक्षेत्रातील धुरिणांनी केवळ सहकारावरच लक्ष केंद्रित करावे. सहकारातून राजकारण करणाऱ्यांनी त्या क्षेत्राची वाट लावल्याचे अनेक दाखले शेट्टी यांनी या वेळी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल...

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...