पुणे : ‘सिनर्जी,कॅज्युअरिना हॉलिडे व्हिलेज ‘च्या वतीनेरविवारी ‘बांबू डे (बांबू दिवस ) या उपक्रमाचे
आयोजनकरण्यात आले होते. ‘गृहनिर्मितीमध्ये बांबूचा कल्पक उपयोग’ या विषयांवर तज्ज्ञांचा परिसंवाद, बांबूपासून केलेल्या घरांच्या प्रतिकृती, फर्निचर चे प्रदर्शन, ‘बांबू हाऊस’ला भेट,उदघाटन , बांबू कलाकारांचा सत्कार, बांबू लागवड असे या ‘बांबू डे’चे स्वरूप होते. बांबूच्या माध्यमातून’पर्यावरणपूरक गृहनिर्मिती’ला चालना देणे, स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला उत्तेजन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. बांबूच्या साहाय्याने पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ,असा सूर या परिसंवादात उमटला .
हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 ते 2 या वेळात ‘कॅश्युरिना’ प्रकल्प, कुरुंजी (ता . भोर) येथे आयोजित करण्यात आलाहोता. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, भाटघर धरणाच्या बॅक वॉटर ला हा प्रकल्प निसर्गरम्य ठिकाणी आहे. ‘बांबू हाऊस’मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक,’नेटिव्ह कॉनबेक बांबू प्रा . लिमिटेड ‘ चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कर्पे , ‘बांबू टेल्स ‘संस्थेचे विवेक कोलते, स्थानिक बांबू कलाकार सचिन महाडीक, गडचिरोली येथील बांबू आणि वनहक्क चळवळीतील कार्यकर्ते सुबोध कुलकर्णी ,बांबू गृहनिर्मिती क्षेत्रातील उद्योजक मंदार देवगावकर, अपर्णा देवगावकर,राजेंद्र आवटे यांच्या परी संवाद कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. संजीव करपे म्हणाले, ‘ जगभर बांबू पासून घरे, फर्निचर, पूल अशा गोष्टी बनाविल्या जात आहेत.बांबूच्या बाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कष्ट असून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे.बांबूचा वापर पर्यावरणस्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवर देखिल उपयुक्त ठरणार आहे. बांबू आग आणि कीड रोधक करता येतो, त्यामुळे तो गृह बांधणीत निर्धोक ठरतो.’ गोवा ,मालदीव ,हैदराबाद ,जपान ,थायलंड येथे बांबू पासून गृहनिर्मिती आणि शोभिवंत बांधकामे करण्याचे प्रमाण वाढत आहे . पूर्वोत्तर राज्यात अशी घरे आहेत . मात्र भारतातील उर्वरित राज्यांनी बांबूला आपलेसे करण्याची गरज आहे . शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगातून संजीवनी मिळू शकते . महाराष्ट्र सरकार बांबू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गडचिरोली जिल्हयात उभारत असून वर्षभरात ती पूर्ण होईल असेही करपे यांनी सांगितले राजेंद्र आवटे म्हणाले निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन विकसित करताना बांबू हाऊस उभारणे हे आकर्षण ठरते.म्हणून ‘सिनर्जी ,कॅज्युअरिना हॉलिडे प्रकल्पात संजीव करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक बांबू हाऊस उभारण्यात आली आहेत . मंदार देवगावकर म्हणाले ,’धरणाजवळच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये १०० मीटर अंतरात बांबू हाऊस निर्मितीला शासनाची परवानगी आहे . त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी पारंपरिक रचना बाजूला ठेवून बांबू हाऊस संकल्पना अंगिकारली पाहिजे . अमृता देवगावकर म्हणाल्या ,’पर्यटंकाना बांबू हाऊस आवडत असून त्यातून थंडीत उबदार वातावरण आणि उन्हाळ्यात थंडावा मिळतो . बांबूचे फायदे गृहनिर्मितीमध्ये असून आवड निर्माण करण्याची गरज आहे ‘ मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांनी बांबू कलाकारांचा सत्कार केला.राजेंद्र आवटे यांनी स्वागत केले . गणेश शिरोडे ,श्री .मिरकुटे ,ग्रामस्थ आणि पुण्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .