मेघालयचे राज्यपाल तथागत राॅय यांच्या बडतर्फीसाठी धरणे आंदोलन
पुणे :काश्मीरच्या रहिवाशांवर आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे असंवेदनशील ,असंवैधानिक विधान करणाऱ्या मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांचा निषेध करण्यासाठी ,राजीनामा मागण्यासाठी ‘मतदार जागृती परिषद ‘ या मंचातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
परिषदेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना निवेदन दिले .या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन ,जांबुवंत मनोहर ,संजय बालगुडे ,मुख्तार शेख ,सचिन पांडुळे ,मयुरी शिंदे यांचा समावेश होता .
‘ देश भारतीय संविधानाच्या अनुसार चालणे अपेक्षित असताना मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुलवामा हल्ल्यानंतर कश्मिरी लोकांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा बहिष्कार करावा ,अशा प्रकारचे संवेदशील ,संवैधानिक विधान केले आहे .
भारतीय संविधानाने दिलेल्या पदावर आसनस्थ व्यक्तीने अशाप्रकारचे विधान करणे हे भारताच्या संविधानाला हरताळ फासण्याचे षडयंत्र मानले जाऊन त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी ‘ असे या निवेदनात म्हटले आहे .