मुंबई,-
महावितरणच्यामोबाईलॲप्सचाराज्यातीलग्राहकांनामोठालाभमिळतअसूनमहावितरणच्याकामकाजातहीगतीशीलतावपारदर्शकताआलीआहे.याचाअनुभवराज्याच्यालोकप्रतिनिधींनाहीयेतअसूनआजविधानपरिषदेतमहावितरणच्यामोबाईलॲप्सचेकौतुककरण्यातआले.मोबाईलॲप्सद्वारेग्राहकांनाविविधसेवाऑनलाईनदेणारीमहावितरणहीदेशाच्याविद्युतवितरणक्षेत्रातीलपहिलीकंपनीआहे.
महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल ॲप्सद्वारे विविध दैनंदिन कामे ऑनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्या कामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. याचा प्रत्यय ग्राहकांसह लोकप्रतिनिधींनाही येत असून आज विधानपरिषदेतील कामकाजात विधानपरिषदेच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती निलमताई गोरे यांनी मोबाईल ॲप्सचे कौतुक केले.
अशाप्रकारचा मोबाईल ॲप्समुळे ग्राहकांना देण्यात येत असलेल्या नवीन वीजजोडण्या, वीजबिलांची माहिती व वीजबील भरणा तसेच वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यांदी सेवांबद्दल श्रीमती निलमताई गोरे यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले. राज्यातील सुमारे 12 लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल ॲप्स डाऊनलोड केले आहे. या ॲप्सद्वारे आतापर्यन्त 48 हजार 967 नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.
महावितरणच्या सुमारे 1 कोटी 21 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, ऑनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.