पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट यांचे प्रतिपादन
पुणे, : महावितरणने मुंबईच्या मुख्यालयाच्या अधिकारांचे विक्रेंद्गीकरण करून पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी पुणे येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाची निर्मिती केली आहे. यामुळे सर्वसामान्य वीजग्राहकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य राहील व त्यामुळे दर्जेदार ग्राहकसेवेचा नवा मापदंड निर्माण होईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट यांनी रविवारी (दि. 2) व्यक्त केला.
महावितरणने पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांसाठी नवीन प्रादेशिक संचालक कार्यालयाची निर्मिती केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सेनापती बापट मार्गावरील ‘प्रकाशभवन’ येथे या प्रादेशिक संचालक कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमएसईबी होल्डींग कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, प्रादेशिक संचालक म्हणून रुजू झालेले श्री. संजय ताकसांडे, आमदार श्री. विजय काळे, आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी, विभागीय आयुक्त श्री. एस. चोक्कलिंगम आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
पालकमंत्री ना. श्री. बापट म्हणाले, शासकीय प्रशासनात नियमानुसार काम होत नसेल तर त्यासंबंधीच्या फाईली प्रलंबित ठेवल्या जातात. परंतु स्पष्टता व पारदर्शीपणा ठेऊन नियमांच्या निकषानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. वीजग्राहक हे महावितरणचे दैवत आहे व वीज ही मुलभूत गरज झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या ग्राहकसेवेच्या तुलनेत मागील दोन वर्षांपासून महावितरणची घौडदौड सुरु आहे. महावितरणच्या मुख्यालयाच्या अधिकारांचे विकेंद्गीकरण करून प्रादेशिक संचालकांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार देण्यात आले आहेत. ही बाब महावितरणच्या ग्राहकसेवेसाठी अतिशय महत्वाची आहे.
एमएसईबी होल्डींग कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक म्हणाले, वीज वितरणासाठी महावितरण कंपनीचे विभाजन केलेले नाही तर अधिकारांचे विकेंद्गीकरण करण्यात आले आहे व प्रादेशिक संचालक कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रादेशिक कार्यालयांमुळे ग्राहकसंख्येच्या दृष्टीने आशिया खंडातील दुसर्या क्रमांकावर असलेल्या महावितरण कंपनीमध्ये अंतर्गत प्रशासन व निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.
प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी चांगली ग्राहक सेवा कशाप्रकारे प्रकारे देता येईल व त्यामुळे या विभागाचा विकास साधता येईल याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला मुख्य अभियंता श्री रामराव मुंडे (पुणे), श्री. शंकर शिंदे (कोल्हापूर), श्री. नागनाथ ईरवाडकर (बारामती) आदींसह महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, अभियंता, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.