Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात मीटरने पाणी देणे गरजेचे – सुनील माळी

Date:

पुणे :   पाण्याचे मीटर बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी वापरताना काळजी घेतली जाईल . असे प्रतिपादन सकाळ वृत्तसमूहाचे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी येथे केले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित  कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये . ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत पहिल्या सत्रात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, वंदन नगरकर आणि सकाळ वृत्तसमूहाचे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी मार्गदर्शन केले.
सुनील माळी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते यांना तुमच्या शहराचा मूलभूत अभ्यास, प्रश्‍नांची माहिती, सद्यस्थितीचे ज्ञान असणे आवश्यक असते. आणि हे सगळे माहीत असावे, हे माहीत करून घेण्याची वृत्ती असावी लागते.
आपल्या पुणे शहरात नागरीकरणाच्या सहा समस्या आहेत असे सांगून ते म्हणाले, प्रदूषण-जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण, वाहतूक समस्या, शहराचे केंद्रीकरण, झोपडपट्टी, साधन संपत्तीचा अपव्यय आणि कचरा या समस्या सोडविण्यासाठी काय केले पाहिजे,  हे ठरविणे गरजेचे आहे. जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रकल्पाना चालना देणे गरजेचे आहे. वायुप्रदूषण कमी होण्यासाठी वाहनांची संख्या कमी झाली पाहिजे पर्यायाने सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे.
वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी बसेस साठी डेपो, पीएमपीएमएलसाठी पायाभूत सुविधा हव्यात, सक्षमीकरण हवे, अंतर्गत वर्तुळाकार रास्ता (रिंग रोड) बीआरटीचे जाळे असावे. शहराचे केंद्रीकरण होण्यासाठी पीएमआरडीए प्लॅन वेगाने अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. झोपड्यांचे पुनर्वसन, पक्की घरे होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत एसआर ए नियम बदलले पाहिजेत, त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. आपल्या शहरी मानसिकतेमुळे नैसर्गिक साधन संपत्तीची  उधळ माधळ थांबविली पाहिजे . पाण्याचे मीटर बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी वापरताना काळजी घेतली जाईल . 
कचरा प्रश्‍न गंभीर आहे. ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करणे त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे ओला कचरा नागरिक राहतात तिथेच जिरवला गेला पाहिजे. यासाठी प्रयत्नांची गरज आहे,’ असे सुनील माळी यांनी सांगितले.
नागरिकांना विश्वासात घेवून कामे करा
विवेक वेलणकर यांनी पुण्यातील पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण मंडळ आणि महावितरण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना येणार्‍या समस्या याविषयी विश्‍लेषण केले.
‘वॉर्ड सभा घेऊन नागरिकांना काय हवे आहे? हे कधीच विचारले जात नाही. वॉर्ड सभा घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे, त्यांच्या सूचना लक्षात घेणे, नागरिकांशी चर्चा करून त्याप्रमाणे काम केले पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे’,

हे  शिबीर आशीष गार्डन, कोथरूड येथे झाले यावेळी  खासदार, शहराध्यक्ष  वंदना चव्हाण, महापौर  प्रशांत जगताप,  स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे , माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम,  निरीक्षक हरीश  सणस, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, कोथरूड अध्यक्ष मिलिंद बालवाडकर, रजनी पाचंगे, रुपाली चाकणकर, अमित अगरवाल उपस्थित होते .

जनतेच्या सुख, दुःखाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे : अजित पवार 
unnamed1
संध्याकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण जनमानसात आहोत हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे जनतेच्या सुख दुःखाशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपण आहोत हा विश्‍वास जनतेमध्ये वाढवला पाहिजे. नागरिक चोखंदळ आणि विचारी झाले आहेत. हे विसरून चालणार नाही.
आज कोणतीही घटना घडली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते नागरिक त्याची दखल घेतात तेव्हा कोणतेही चांगले काम करताना स्वतःपासून सुरुवात करा. राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली तर पुणे शहर हे भारतातील सर्वोत्तम शहर अशी ओळख आपण निर्माण करू शकू. यासाठी कामाला लागा असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान पुणे : पुराण...