पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

Date:

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : तुमच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाला आणि तुम्ही समाधानी असाल, तर प्रॉब्लेम आहे. असे करू नका, तुमच्या लिखाणात विविधता आणा, विविध प्रयोग करा. सिंदबादच्या सात सफरी आल्या पण पुढच्या कोणी का लिहिल्या नाहीत याचा विचार करणे आवश्यक आहे. आज बालसाहित्यिकांनी तीन पातळीवर काम करायला हवे. मराठीत काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय आहे, हे सर्व अभ्यासून लिखाण करणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी दिला.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.१०) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे मंचावर होते. क्षिप्रा शहाणे यांना लोखंडे-जोशी पुरस्कार, प्रिया फुलंब्रीकर यांना कवी ग. ह. पाटील पुरस्कार, डॉ. प्रतिमा जगताप यांना वा. गो. आपटे पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांना आनंद मासिक पुरस्कार, संध्या देवरूखकर यांना रा. वा. शेवडे गुरूजी पुरस्कार, पुंडलिक वझे यांना सर्जेराव जगताप पुरस्कार, संजय काकडे यांना बा. रा. मोडक पुरस्कार, बाबूराव शिरसाट यांना दयार्णव कोपर्डीकर पुरस्कार, डॉ. प्रसन्न दाभोळकर यांना सुधाकर प्रभू पुरस्कार आणि बबन शिंदे यांना अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजीव तांबे म्हणाले, मुलांना भविष्यात काय पहायचे आहे त्यावर लिहा. नाविन्यपूर्ण काम करा. आपल्या दृष्टीकोनाचा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाला, एआयला विरोध करून चालणार नाही. त्याच्या मदतीने पुढे जायला हवे. आपण अपडेट व्हायला हवे. आपण लिखाणात कमी पडतो; मुलांत मिसळायला कमी पडतो. मूल्ये जुनीच आहेत, पण ती नव्या पद्धतीने लिहायला हवीत. लेखक म्हणून जेवढे असमाधानी असू तेवढे अधिक चांगले काम होईल.

पंडित विद्यासागर म्हणाले, बालसाहित्य म्हणजे जादू, चेटकीण अशा गोष्टी. पण आता नवीन पिढीला काही तरी वेगळे हवे आहे. वेगळेपण दिले तर ते मुलांना आवडते. इंग्रजी भाषेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना मराठी वाचायला आवडत नाही. त्यामुळे नवीन प्रयोग करायला हवेत. सरकारचे धोरण निराशाजनक आहे.‌ त्यामुळे लेखकांना त्यांचा मार्ग शोधावा लागेल.

प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी म्हणाले, बालकुमार साहित्याला पुरस्कार देणारी बालकुमार ही एकमेव संस्था आहे. याची दखल सरकारने देखील घेतली आणि पुरस्कार देणे सुरू केले. संस्थेचे १९ पुरस्कार आहेत; पण सर्व प्रकारात लेखक लिहित नाहीत ही आमची खंत आहे. मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल याचा विचार व्हायला हवा.

प्रसाद भडसावळे म्हणाले, परीक्षणासाठी बरीच पुस्तके आली. पण त्यात कवितेची अधिक होती. बालसाहित्यात वास्तववाद अधिक होता. मुलांसाठी एवढा वास्तववाद योग्य आहे का याचा विचार लेखकांनी करावा.

माधव राजगुरू म्हणाले, आज मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य लिहिले जाते. पण ही संख्यात्मक वाढ आहे. दर्जा राहिलेला नाही. बालसाहित्याचा मूळ झरा आटत चालला आहे का अशी स्थिती आहे. बालसाहित्यात संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ व्हायला हवी.

वर्षा तोडमल म्हणाल्या, मराठी भाषेत ९४ हजार मुले नापास होतात, ही बातमी वाचली आणि हळहळ वाटली. इंग्रजीचा प्रभाव हे एक कारण आहे. भाषेच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रम आखले गेले नसावेत‌. मुलांच्या हातात पुस्तके हवीत; पण त्यांच्या हातात मोबाईल आहे. यावर जाणिवपूर्वक काम केले पाहिजे. भाषिक संस्कार हरवलाय‌.

सूत्रसंचालन प्रज्ञा देशपांडे यांनी केले, आभार संदीप तापकीर यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा: PM मोदींचे आवाहन, भारतात मोठ्या तेलाच्या विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज

हैद्राबाद/बेंगळूरू -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, आजच्या...

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...