पुणे, दि. 14 : केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी 210 कोटी 64 लाख रुपयांची कामे मंजूर झाले असून येत्या महिन्याभरात महावितरणच्या मुख्यालयातून निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विद्युत समितीची बैठकीत गुरुवारी (दि. 14) देण्यात आली.
विधानभवन येथे पुणे जिल्हा विद्युत समितीची बैठक झाली. जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव, जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री. प्रदीप कंद, आमदार श्री. विजय काळे, आमदार श्री. भीमराव तापकिर, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार श्री. सुरेश गोरे, आमदार श्री. दत्तात्रय भरणे, आमदार श्री. शरद सोनवणे, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे (पुणे परिमंडल) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वीजस्थिती, केंद्र शासनाच्या विविध योजना व त्यातील कामांच्या माहितीचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी सादरीकरण केले. यात पुणे जिल्ह्यासाठी केंद्ग शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रममध्ये (Integrated Power Development Scheme) 145 कोटी 31 लाख व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेत 65 कोटी 33 लाखांची विविध कामे पहिल्या टप्प्यात मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत तसेच वीजग्राहकांच्या तक्रारी निवारणाबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा विद्युत समितीचे अध्यक्ष खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रात नवीन वीजजोडण्या देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केली. तर जिल्ह्यातील बिबट्याप्रवण क्षेत्रातील 63 गावांमध्ये शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत खासदार श्री. आढळराव पाटील व आमदार श्री. शरद सोनवणे यांनी सूचना केली. याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यात इन्फ्रा दोनमधून कृषीपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्यात येत असून आणखी 6023 कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी मुख्यालयाकडे निधीची मागणी करण्यात आल्याचे महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणच्या मीटर रिडींग कंत्राटदारांना मोबाईल अॅपच्या माध्यमातूनच यापुढे मीटर रिडींग घ्यावे लागणार आहे व त्यात मीटरचा फोटो काढून अक्षांश/रेखांशच्या लोकेशनसह तो अॅपद्वारे अपलोड करावा लागणार आहे. त्यामुळे जागेवरच बसून चुकीचे, सरासरी मीटर रिडींग घेण्याच्या प्रकारास चाप बसणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी दिली.
समितीच्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शुक्राचार्य वांजळे, दक्षता व सुरक्षा विभागाचे उपसंचालक कमांडर श्री. शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. सुनील पावडे, श्री. केशव सदाकळे, संभाजी लंगोटे, श्री. नरेंद्ग ताडे (प्रभारी), श्री. वादिराज जहागिरदार, जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य श्री. संतोष सौंदणकर, श्री. भरत कुंभारकर आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अभियंते, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी केले तर अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांनी आभार मानले.