फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

Date:

भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर देश वाचेल, संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा.

पणजी, दि. ७ सप्टेंबर २६

देशात दोन विचारप्रवाह आहेत, एक विचार सर्व जाती धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता देणारा विचार आहे, हा विचार संविधानाचा असून तोच विचार काँग्रेस पक्षाचा आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा विचार आहे. भाजपा, संघाचा हा फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी अत्यंत घातक असून या विचारापासून देशाला वाचवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच संविधान वाचवले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पणजी येथे ॲाल इंडिया कौमी तंजीम आयोजित संविधान बचाव कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिनो, माजी केंद्रीय मंत्री इदुराद्रो फालेरो, माजी खासदार रमाकांत खलप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुनाफ हकीम, अजिंक्य देसाई या कार्यक्रमाचे आयोजक कौमी तंजीमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ. हाझी झाकीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही व संविधानाच्या मार्गाने देशाची वाटलाच होईल असा निर्णय झाला व त्याच विचाराने मागील ७५ वर्ष देशाची वाटचाल सुरु आहे पण संविधानाला अभिप्रेत असा देश भाजपा व रा. स्व. संघाला नको आहे, त्यांना स्त्री पुरुष समानता नको आहे. स्पृश्य अस्पृशता मानणारा त्यांचा विचार आहे. मनुस्मृतीवर देश चालला पाहिजे हा संघाचा विचार आहे आणि त्याच्या अगदी उलट काँग्रेस पक्षाचा विचार आहे. संघाचा विचार देशाला तारणारा नाही. रा. स्व. संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात एक रॅली काढण्यात आली. यावेळी संघाच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले, हा त्यांचा वैचारिक पराभव आहे. संघाला १०० वर्ष पूर्ण होऊनही अजून त्याची नोंदणी केलेली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करावी व संविधान स्विकारावे असे आवाहन सपकाळ यांनी केले.

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले की, संविधान व काँग्रेसचा विचार एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. काँग्रेस संविधानाच्या विचाराने वाटचाल करत आहे. जगात सर्वात श्रेष्ठ संविधान हे भारताचे आहे. या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेस करत आला आहे व यापुढेही करत राहिल. संविधानाने सर्व जाती धर्माला समान अधिकार दिले आहेत परंतु भाजपा मात्र संविधान संपवण्याचे काम करत आहे, त्याविरोधात लढा देण्याची गरज आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान रक्षणासाठी लढत आहेत. आपले संविधान कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे ठाकरे म्हणाले..

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यावेळी म्हणाले की, राहुल गांधी संविधान वाचवण्य़ाची लढाई लढत असून हाती संविधानाची प्रत घेऊनच देशभर अभियान राबवत आहेत. संविधान बदलाची भाषा ही २०१४ पासून सुरु झालेली नाही तर संविधान निर्माण झाल्यापासूनच त्याला आरएसएसने विरोध केलेला आहे. आधीचा जनसंघ व आताचा भाजपा हे त्यांचे राजकीय विचाराचे पक्ष संविधानाच्या विरोधात आहेत. या विचाराच्या लोकांनी अनेकवेळा संविधान जाळले आहे व आता ते संविधानाची पायमल्ली करत राजकारभार करत आहेत. या विचाराने भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्यालाही विरोध केलेला आहे. स्वातंत्र्याच्या ५०-५५ वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा फडवला नाही असेही चोडणकर म्हणाले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

समाविष्ट ३२ गावांच्या मिळकतकर नोंदींच्या सखोल ऑडिटचा प्रस्ताव

दरवर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त; GISसह...

७४ कोटींच्या कचरा प्रकल्पावर पुनर्विचाराचा प्रस्ताव; २० वर्षांच्या करारावर प्रश्न

निविदेनंतरच्या वाटाघाटी आणि कालावधीवाढीवर आक्षेप; ९ सप्टेंबरच्या स्थायी समिती...

स्मार्ट मीटरची छेडछाड अंगलट;भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणकडून गुन्हे दाखल

मीटरचे सील तोडून गती कमी करण्याचा प्रयत्न ९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी; उर्वरित १० प्रकरणांत कारवाई सुरू पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीज वापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे. चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला. स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे. गुन्हा दाखल झालेली प्रकरणे महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे : •             शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली = २,६६,८०० रुपये •             सचिन भास्करराव तायडे = १,१८,३६० रुपये •             सुरज संजीवकुमार सूर्यवंशी = १,५३,७७० रुपये •             दयानंद श्रीमंत रसाळ = १,४६,०७० रुपये •             संदीप लक्ष्मण गवळी  = १,५६,५९० रुपये •             विष्णू सखाराम चोपडे = १,४०,४१० रुपये •             भगवत नारायण इंगळे = १,४६,६५० रुपये •             आनंद जी. = ६८,८६३ रुपये •             ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = ४३,६२२ रुपये