ज्ञानेश्‍वरांच्या एका ओवीने सुद्धा समाज परिवर्तन घडते अण्णा हजारे यांचे मत

Date:

पुणे: “संत ज्ञानेश्‍वरांच्या एका ओवीने समाज परिवर्तन होऊ शकते याचे उदा. म्हणजे राळेगणसिद्धी येथील क्रांतीकारक बदल. शुद्ध आचार, शुद्ध विचार, चारित्र्य, निष्कलंक जीवन आणि त्यागाची भावना हीच संताची शिकवण या समाजात सुख शांती आणून परिवर्तन घडवू शकते. त्यासाठी प्राध्यपकांनी शिक्षणाला नोकरी समझण्याऐवजी निष्काम कर्म करून सेवा करावी. त्यांच्या माध्यमातूनच या देशात आदर्श व्यक्तिमत्वाची  पिढी तयार होईल.” असे मत थोर समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.   महाराष्ट्र विधान सभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समारंभात विधानसभेचे माजी सभापती श्री. दिलीप वळसे-पाटील यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र व ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी विशेष एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु.कराड, डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे  प्राचार्य डॉ.एल.के क्षीरसागर हे उपस्थित होते.
श्री.अण्णा हजारे म्हणाले,“ भरकटत चाललेल्या या समाजाला संताचे विचारच वाचवू शकतील. येथे प्रत्येक व्यक्ती हा धन-संपत्ती जमविण्यासाठी धावत असतो. त्या माध्यमातून तो  सुख व आनंद शोधीत असतो. खरे म्हणजे संतांची शिकवणच त्याला आनंद देऊ शकते. चंचल मनाला लगाम लावावा. राळेगण सिद्धी येथे ११ वर्षात ९ लाख लोक अभ्यासासाठी आले. तसेच,५ लोकांनी पीएचडी पूर्ण केली आहे. विज्ञानाने प्रगती केली पण जो पर्यंत मानवाच्या अंतर्मनात अध्यात्म उतरत नाही तो पर्यंत या विज्ञानाचा काहीही उपयोग नाही. अन्यथा विज्ञान विनाशाकडे घेऊन जाईल. देशाच्या परिवर्तनासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हे ठरविले पाहिजे, की जो पर्यंत कार्यकर्ता देहू-आळंदीला जाऊन अभ्यास करीत नाही, तो पर्यंत त्याला तिकीट मिळणार नाही.”
श्री. दिलीप वळसे पाटील म्हणाले,“ज्या सरकारी शिक्षण संस्थेला ऑटोनॉमी दिली, त्या संस्था आज प्रगतीचा टप्पा गाठीत आहेत. शिक्षण म्हणजे परिपूर्ण विद्यार्थी, नागरिक व व्यक्तिमत्व निर्माण करण्याचे साधन आहे. स्व. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात त्यांनी शिक्षण संस्था उघडण्याची परवानगी देऊन सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार उघडले. त्यामध्ये डॉ.विश्‍वनाथ कराड यांचा सुद्धा वाटा आहे. शिक्षण मंत्री असतांना राज्यातील प्रत्येक गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी आम्ही त्यांची फी भरावयास सुरूवात केली. त्यामुळे राज्यसरकारला १५०० कोटी रूपये लागले. माझ्या मते शरद पवार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. शिक्षण व्यवस्थेतून समाज परिवर्तन कसे करता येईल, ही त्यांची कल्पना आमच्या काळात अंमलात आणली. आज एमआयटी ने अध्यात्म आणि शिक्षणाची परिभाषा बदलून संपूर्ण जगात नाव लौकिक प्राप्त केला आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ तपस्या, त्याग, समर्पणची जीवंत मूर्ती असलेल्या अण्णा हजारे यांच्या हस्ते संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन होणे हे आमचे भाग्य आहे. अण्णांच्या हातून घडणारे कार्य हे संताचे कार्य आहे असे म्हणता येईल.”
प्रा.डॉ. मंगेश तु.कराड यांनी मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांचा परिचय करून दिला. प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....