Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवस्मारकासाठी राजभवनावर धडकणार संभाजी ब्रिगेडचा ‘कुदळ मोर्चा’

Date:

संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय “लोकशाही जागर महामेळावा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आणि प्रेरणा आहे. त्यांचे स्मारक राज भवनावर व्हावे, ही संभाजी ब्रिगेडची गेली अनेक वर्षा पासूनची मागणी आहे.पण राज्य सरकारला केवळ निवडणुका आल्यावरच शिवस्मारक आठवण होते. मात्र, आगामी काळात राज्यभावनावर शिवस्मारक व्हावे, यासाठी संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी आज दिला आहे. 

संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय ‘लोकशाही जागर महामेळावा…’ आज (दि.23) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. महामेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड. मनोज आखरे बोलत होते.  यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

अँड. मनोज आखरे म्हणाले, फसणवीस सरकार असताना त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक तयार करण्याचा घाट घातला होता. मात्र तेथे एक वीट सुद्धा बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यासाठी तरतूद करण्यात आलेले 2700 कोटी रुपये हे पाण्यात गेले. तेव्हा देखील संभाजी ब्रिगेडने शिवस्मारक राजभवन येथे साकारावे, अशी मागणी केली होती. पण त्या मागणीला सरकारने गांभीर्याने घेतले नाही. आता संभाजी महाराजांच्या पुतळ्यांचे आंदोलन झाल्यावर आपल्याला शिवस्मारकाचे आंदोलन हाती घ्यायचे आहे. यासाठी आगामी काळात संभाजी ब्रिगेड राजभवनावर ‘कुदळ मोर्चा’ घेऊन जाणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत बोलताना अँड. मनोज आखरे म्हणाले, राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपलाच दांडा, झेंडा आणि अजेंडा विधानभवनात गेला पाहिजे. आपण शिवसेना ठाकरे गटाकडे 27 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या कामाला लागा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  

मेळाव्या मागची भूमिका स्पष्ट करून महासचिव सौरभ खेडेकर म्हणाले, आपल्या देशाच्या शेजारी जी अवस्था आहे, त्याकडे पाहता आपण अधिक जागृत होवून काम केले पाहिजे. आगामी काळात काही लोकांचा ‘कार्यक्रम’ करण्याची आता गरज आहे. तसेच महाराष्ट्राला संघटना फोडणे, पक्ष फोडणे या गोष्टी नवीन नाहीत; पण अशा लोकांचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला सन्मान जनक जागा मिळाल्या तर आपलेही प्रतिनिधी विधानसभेत जातील. मात्र सन्मान जनक जागा न मिळाल्यास आपण पक्षासाठी वेगळी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा देखील खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे  म्हणाले, संभाजी ब्रिगेडचा संघर्ष हा फॅसीझम विरुद्ध समतेचा आहे मात्र 2014 पासून आपल्या देशात लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रातील समतावादी विचार पुरोगामी विचार उत्तरेत जाऊ नये म्हणून आर एस एस आणि ब्राह्मणवादी विचारांच्या पक्षांनी संघटनांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी संघटना फोडीचा पक्ष फोडीचा राजकारण केलं आहे परंतु अशा ब्राम्हणवादी व आरएसएसवादी विचाराने आमचा आव्हान आहे की तुम्ही परिस्थिती कितीही विषमतावादी बनवाल राज्यात दंगली घडवण्याचे विचार करा पण जोवर ब्रिगेडिचा विचार येथे आहे तोवर मंदिर आणि मस्जिद शांतच असेल एकीकडे संविधान , आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे असं दुहेरी दुष्टचक्र निर्माण करायचं काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे जमीन आदानींना विकली आणि आकाश अंबानींना विकलं ते कोणत्या कायद्याखाली ही लोकशाही आहे का? अशावेळी जनप्रबोधन करणं हे संभाजी ब्रिगेडची जबाबदारी आहे.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर मामा देशमुख,प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, हरियानाचे अध्यक्ष मांगीराम चोपडे, अभिमन्यू पवार, प्रा. प्रेमकुमार बोके, डॉ. सुदर्शन तारक, सतीश वासावे, संतोष शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.        

मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा सचिव तेजश्री पवार, उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, कार्याध्यक्ष अविनाश घोडके, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर, जिल्हा सचिव निलेश ढगे, कार्याध्यक्ष साजिद सय्यद, मावळचे दिनकर केदारी, शिवाजी पवार, रंजीत बिराजदार, अशोक फाजगे, निलेश कांबळे, राजाराम गाजरे, कुमार गायकवाड, दिनेश बिरवाडकर, संतोष कराळे, रेखाताई कामठे, महेश पवार, अर्चना गव्हाणे, वेंकट मानपिडे, राजेश अडसूळ, अर्जुन जागडे आदींसह राज्य भरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार उमाळे आणि आभार डॉ संदीप कडलक यांनी मानले.

‘सेल्फी विथ पांदण’ पाठवून मुख्यमंत्र्यांचे पोर्टल जाम करा   

विकासाच राजकारण करणारे सरकार सध्या सरकारी योजनांची खिरापत वाटत आहे. पण आपल्याला परिवर्तनाच राजकारण करायच आहे. सरकारचा विकास आपल्या गावापर्यंत आणि शेतापर्यंत आला आहे का? असा सवाल उपस्थित करून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी कार्यकर्त्यांना गावाला शेताला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था दाखवणाऱ्या रस्त्यांचे फोटो ‘सेल्फी विथ पांदण’ काढून मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर उपलोड करण्याचे आवाहन केले. तसेच संबंध राज्यातून इतके फोटो पाठवा की मुख्यमंत्र्यांचे पोर्टल जाम झाले पाहिजे, असे ही सांगितले . 

संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे आंदोलन पुन्हा पेटणार 

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानात गडकरींच्या पुतळ्या ऐवजी संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, यासाठी मागील काळात संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं होतं. महिन्याभरापूर्वी यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील झालेली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुणे महापालिकेने संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा न उभारल्यास संभाजी ब्रिगेड स्वतः तो पुतळा उभारू. मग आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी यावेळी दिला.

विनेश फोगाटचा भव्य सत्कार 

केंद्र सरकारच्या कपट राजकारणाने भारताची लेक विनेश फोगाट हिचा बळी घेतला. भारत सुवर्ण पादकाला मुकला. पण ‘भारत के सन्मान मे संभाजी ब्रिगेड मैदान मे’, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे यांनी भारताची कुस्तीपट्टू विनेश फोगाट हिचा कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात सप्टेंबर महिन्यात भव्य सत्कार करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी तिला सुवर्ण पदक देवून सन्मानीत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२० ते २५ वाहनांना धडक, ८ जणांचा मृत्यू ,२० जण जखमी

वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून...

१ किलो सोने चोरून पळालेल्या भामट्याला पोलिसांनी पकडले,सर्व सोनेही केले हस्तगत.

पुणे- एक किलो सोने चोरी करुन, पोलीसांना गुंगारा देणा-या...

कात्रजमध्ये अफू विकणाऱ्या देवीलालला पकडले

पुणे- पुणे पोलिसांनी कात्रज मध्ये अफू विकणाऱ्या देवीलाल ला...

बाजीराव रस्त्यावरील जुगार अड्डयावर छापा: ९ जण पकडले

पुणे- बाजीराव रस्त्यावर फुटक्या बुरुजा जवळील फ्लॅट मध्ये गेली...