असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

Date:

राज्यात रिक्षांचा आकडा १३ लाखांपार; परप्रांतीयांची मुजोरी रोखण्यासाठी मोहीम

पुणे-येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता-बोलता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते.

भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कर्नाटक, तामिळनाडूनंतरचे तिसरे राज्य ठरेल. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक (आरटीओ) कार्यालये विशेष तपासणी मोहीम राबवतील. छत्रपती संभाजीनगर मुंबई महानगर क्षेत्र, नागपूर आदी शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय निव्वळ प्रशासकीय नाही, तर यात उद्धवसेनेचा ‘मराठी अस्मिता’ कार्ड हायजॅक करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मास्टरस्ट्रोक खेळी आहे. “खरी शिवसेना तीच, जी मराठी माणसासाठी प्रत्यक्ष कृती करते,’ हे शिंदेसेनेने या निर्णयातून ठणकावून सांगितल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार १ जानेवारी २०२५ रोजी राज्यात १२,२२,८४० रिक्षा होत्या. १ जानेवारी २०२६ पर्यंत हा आकडा १२,९६,४३० वर पोहोचला, तर टॅक्सी ७७ लाख आहेत. रिक्षा संख्येत सुमारे ६ टक्के वाढ महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याकडे अंगुलीनिर्देश करते. बहुतांश परप्रांतीय मराठी भाषिकांशी मुजोरी करतात, अशा तक्रारी आहेत. त्यांना चाप बसवण्यासाठीच परवाना रद्दची मोहीम आहे.

कायदा १९८८ चा, अंमलबजावणी ३७ वर्षांनी

परवाना रद्दचा कायदा आहे का?
-महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४ आणि २७ (४) नुसार, रिक्षा, टॅक्सी, बस चालवण्याच्या परवान्यासाठी मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. ‘मोटार वाहन कायदा १९८८’ च्या कलम ८६ नुसार आरटीओला परवाना निलंबन किंवा रद्दचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी आता ३७ वर्षांनंतर होईल असे दिसते.
परीक्षा लेखी की तोंडी?
-आरटीओ निरीक्षक चालकाला मराठी समजते की नाही याची तोंडी प्रश्न विचारूनच खातरजमा करतील. जुन्या चालकांची लेखी, तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश नाहीत, परंतु नव्या परवान्यासाठी ही प्रक्रिया कडक केली जाणार आहे.
आतापर्यंत परीक्षा कशी होती?
-परवान्यासाठी अर्ज करणाऱ्याला निरीक्षक मराठीत प्रश्न विचारत किंवा रस्ते चिन्हांचे फलक वाचायला सांगतात. दहावीत मराठी विषय पास असलेल्यांना बऱ्याच वेळा सवलत मिळते. कारण त्यांचे १० वीपास प्रमाणपत्र भाषेच्या ज्ञानाचा पुरावा मानले जाते.
जुन्यांना मराठी येत नसेल तर?
जुना परवाना असलेल्यांना मराठीत येत नसल्यास आधी ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली जाऊ शकते. ठरावीक मुदतीत तो मराठी शिकला नाही तर आता नव्या निर्णयानुसार परवाना रद्द होऊ शकतो.
केवळ १५ दिवसांत लाखो चालकांची परीक्षा घेणे शक्य आहे?
तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. १ मेपासूनची मोहीम प्रामुख्याने ‘जागरूकता’ आणि नवीन परवाना वितरणावर लक्ष केंद्रित करेल. आरटीओ कार्यालयांना केवळ कडक अंमलबजावणीचे आदेश आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये जपला महामानवाच्या समरसतेचा वारसा

पुणे: राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या...

देशात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ३३ % महिला आरक्षण राजीव गांधी यांनीच दिलेले: काँग्रेस’चा दावा !

सरकारच्या ‘निवडणुक’जीवी राजकारणामुळे देशाचे नुकसान !‘सामाजिक मागासलेपणाच्या ऊध्दारा’च्या डॅा...

वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट, 9 कामगारांचा अंत

रायपूर: छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराय येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये...