कर्ज स्वस्त होणार, EMI ही कमी होईल:रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% ने कमी करून 6.25% केले

Date:

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट म्हणजेच ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते त्या व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचाही आएमआयचा भार काहीसा हलका होणार आहे. नवीन कर्जदारांनाही आता वाहन कर्ज, गृहकर्ज व अन्य वैयक्तिक कर्जांमध्ये लवकरच दिलासा मिळणार आहे.

रेपो रेट आधी ६.५० टक्के होता, जो आता पाव टक्क्यांनी कमी करत ६.२५ टक्के करण्यात आला आहे. कोविडच्या काळात म्हणजे मे २०२० नंतर एप्रिल २०२२ पर्यंत आरबीआयने रेपो रेट ४ टक्के एवढा स्थिर ठेवला होता. मात्र, नंतर यामध्ये यथावकाश वाढ करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. फेब्रुवारी २०२३ मध्ये हा दर वाढत वाढत ६.५० टक्क्यांपर्यंत पोचला, ज्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यात बदल करण्यात आला नाही. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर बँकाही रिझर्व्ह बँकेची री ओढत व्याजदरांमध्ये कपात करतील अशी अपेक्षा आहे.
तुमचे किती पैसे वाचणार?
त्यासाठी एक उदाहरण बघू. समजा तुमचं ५० लाख रुपयांचे गृहकर्ज आहे आणि २० वर्षांचा परतफेडीचा कालावधी असून समजा सध्याचा व्याजदर ८.५० टक्के आहे. तुमच्या बँकेनेही व्याजदरात पाव टक्क्यांची कपात करून तो ८.२५ टक्के केला तर तुमच्या ईएमआयवर काय परिणाम होईल?

जुना ईएमआय (८.५० टक्के) : ४३,०५९ रुपये
नवीन ईएमआय (८.२५ टक्के) : ४२,४५२ रुपये

म्हणजे, तुमची दरमहा ६०७ रुपये व वर्षाला ७,२८४ रुपयांची बचत होईल. काहीजणांना ही किरकोळ घट वाटण्याची शक्यता आहे, पण प्रत्येक रुपयाचे महत्त्व हे कर्जदारांनाच माहिती असतं. तसंच दशकाचा किंवा त्याहून जास्त कालावधीचा विचार व होणारा परिणाम विचारात घेता तसेच यापुढेही व्याजदर कपातीची शक्यता लक्षात घेता, एकूण परिणाम निश्चितच जास्त असायची शक्यता आहे. कारण, जर हीच दिशा सुरू राहिली तर कदाचित वित्तीय धोरण समितीच्या पुढील बैठकांमध्येही आणखी काही प्रमाणात व्याजदरात कपात केली जाऊ शकते.

खुलासा : वरील गणित हे अंदाजे व एक उदाहरण म्हणून दिले आहे. निश्चित किती ईएमआय कमी होईल हे तुमचा व्याजदर, कालावधी, बँकेचे धोरण अशा अन्य गोष्टींवर अवलंबून असेल. त्याशिवाय ज्यांनी फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडलाय अशांनाच व्याजदर कपातीचा फायदा मिलतो. फिक्स्ड रेटचा पर्याय निवडलेल्यांचा ईएमआय कमी होत नाही.

पर्सनल लोनचं उदाहरण : समजा तुम्ही ५ लाख रुपयांचं वैयक्तिक कर्ज ५ वर्षांच्या मुदतीसाठी घेतलेलं असून त्यासाठी १२ टक्के व्याज देताय. तर त्या पाव टक्क्यांची कपात झाल्यास काय होईल?

जुना ईएमआय (१२ टक्के) : ११,२८२ रुपये
नवीन ईएमआय (११.७५ टक्के) : ११,१४९ रुपये

म्हणजे दर महिन्याला ईएमआयपोटी १३३ रुपये व वर्षाला १,५९६ रुपये तुम्हाला कमी भरावे लागतील.

वाहन कर्जाचं उदाहरण : समजा तुम्ही ७ वर्षांच्या मुदतीसाठी ९.५ टक्के दराने १० लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले आहे. पाव टक्क्यांची कपात या दरात झाली तर काय होईल?

जुना ईएमआय (९.५ टक्के) : १६,६५९ रुपये
नवीन ईएमआय (९.२५ टक्के) : १६,५०७ रुपये

म्हणजे तुम्हाला दरमहा १५२ रुपये व वर्षाला १,८२४ रुपये कमी ईएमआय भरावा लागेल.

याआधीच्या बैठकीमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेश्यो (सीआरआर) १४ डिसेंबर व २८ डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी पाव टक्क्यांनी कमी केला होता. बँकांकडे असलेल्या एकूण ठेवींपैकी काही टक्के ठेवी रोख स्वरुपात रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे बँकांसाठी बंधनकारक आहे. या प्रमाणाला सीआरआर म्हणतात. सीआरआरमध्ये घट याचा अर्थ कर्जवितरणासाठी बँकांना अधिक निधी उपलब्ध होणं. सीआरआर मध्ये घट व आता रेपो रेटमध्ये घट याचा अर्थ भारतीय रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी, कर्जवितरण वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे असा होतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

चार एकर जागेवर पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा;...

नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री

१० व्हेंटिलेटर, १० सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा...

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...