Home Blog Page 684

मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की,भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – अवघ्या ३२ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ वर्षात वारंवार पुण्यात येतात भूमिपूजन, उदघाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येतायत, तेव्हा असं वाटतं की, हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे? की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी? अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केली.

मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी होत आहे. या अगोदर ५ वेळा महामेट्रोच्या कार्यक्रमासाठी मोदी पुण्यात प्रत्तक्ष आले होते आणि एका टप्प्याचे उदघाटन त्यांनी कलकत्ता येथून आभासी पद्धतीने केले होते. मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मोदी पुण्यात आले होते आणि त्या निमित्ताने त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानात सभा घेतली होती. डिसेंबर २०१८ मध्ये हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनासाठी ते पुण्यात परत आले होते आणि बालेवाडी स्टेडियमवर त्यांनी सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२२ रोजी गरवारे ते वनाज मार्गाचे उदघाटन मोदी यांनी केले आणि कोथरूडमध्ये एमआयटी कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी सभा घेतली.

१ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या टप्प्याचे उदघाटन त्यांनी केले आणि शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर सभा घेतली. दिनांक ६ मार्च २०२४ रोजी कलकत्याहून त्यांनी आभासी पद्धतीने रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याचे उदघाटन आणि पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते निगडी या मार्गाची कोनशिला त्यांनी बसवली आणि आता ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या उदघाटनासाठी उद्या येत आहेत आणि स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभाही घेणार आहेत. विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राजकीय फायद्यासाठी सभा घेण्याचा खटाटोप चालला आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

मेट्रो चा पहिला टप्पा सुद्धा अजून पूर्ण झालेला नाही. तरीही मोदी महामेट्रोचा सातवा कार्यक्रम करीत आहेत. भाजप मोठी विकासकामे करीत असल्याचा देखावा निर्माण करून एक प्रकारे पुणेकरांची शुद्ध फसवणूक करीत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उदघाटन मोदी यांनी केले. त्यानंणर पाच महिने उलटूनही टर्मिनल कार्यान्वित झाले नाही. त्या पाठोपाठ केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा उदघाटन केले, त्यालाही दोन महिने उलटून गेले. परिस्थिती जैसे थे आहे. ही स्टंटबाजी भाजप का करीत आहे? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

भाजपकडे विकासाची दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यासाठी हे खटाटोप चालू आहेत. मेट्रोच्या ३२ किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी पंतप्रधानपदावरील व्यक्ती वारंवार पुण्यात येऊन कार्यक्रम करते, हेही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही, असे मोहन जोशी म्हणाले.

पुणेकरांनी अजून किती वर्ष त्रास सहन करायचा
मेट्रो प्रकल्प हा काँग्रेस पक्षाने आणला. प्रकल्पाकरिता आवश्यक त्या मंजुऱ्याही काँग्रेस सरकारने मिळवल्या २०१४ नंतर हा प्रकल्प वेगाने पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे प्रकल्पाला विलंब होत गेला. प्रकल्प ११हजार कोटींचा होता. विलंबामुळे खर्च वाढत गेला. मेट्रो आल्यास वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, या आशाही मावळल्या. वाहतुकीच्या त्रासातून सुटका कधी होईल? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शौचास गेलेल्या मुलास बिबट्याने उचलून नेले:जुन्नरची घटना, ऊसाच्या शेतात आढळला मृतदेह

जुन्नर : मोकळ्या मैदानात शौचास गेलेल्या एका 9 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार मारल्याची भयंकर घटना जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत घडली आहे.

आज दिनांक २५-०९-२०२४ रोजी तेजेवाडी ( ता. जुन्नर )गावातील ओझर – लेण्याद्री रस्त्यालगत वीटभट्टी कामगार यांचा मुलगा चि. रुपेश तानाजी जाधव वय- ९ वर्ष हा पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास बसला असताना लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा- ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने आजोबांना न जुमानता मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मुलाची शोधाशोध सुरु केली, एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाची बॉडी शेजारच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळाली. सदर शोधकार्य विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांचे अधिनस्त 30-35 वनकर्मचारी आणि रेस्कु टीम सदस्य यांनी गावातील आजी- माजी उपसरपंच व इतर जबाबदार नागरिक, तरुण यांच्या मदतीने राबविले. त्यानंतर मुलाची बॉडी शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठविण्यात आली. घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 10 पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. (लगतच्या शिरोली गावहद्दीत 2 पिंजरे यापूर्वीच कार्यरत होते.
काल रात्री लगतच्या परिसरातील विद्युत डीपी जळल्यामुळे व पावसामुळे तेथे विजपुरवठा खंडित होता. त्यामुळे घरामागे असलेल्या अंधारात ही दुर्दैवी घटना घडली.

बचावार्थ गोळी डोक्यात नाही,पायात मारतात, एन्काउंटर कसे म्हणता? कोर्टाने सुनावले..

0

4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही,

मुंबई:बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे मान्य करावे? आरोपीला हातकडी लावली होती. त्यामुळे स्वसंरक्षणासारखी स्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी चालवता आली असती.

कोर्ट म्हणाले – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

कोर्ट म्हणाले – आरोपीने ट्रिगर दाबताच 4 जणांना त्याच्यावर सहजपणे नियंत्रण मिळवता आले असते. तो काही फार बलवान माणूस नव्हता. त्यामुळे पोलिसांचा युक्तिवाद मान्य करणे फार अवघड आहे. याला एन्काउंटर म्हणता येत नाही. पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होईल.

मृत अक्षय शिंदेचे वडील अण्णा मारुती शिंदे यांनी आपल्या मुलीच्या एन्काउंटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. अक्षयच्या वडिलांनी या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. अक्षय शिंदेचे एन्काउंटर विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर 2 चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याचे सोमवारी सायंकाळी एन्काउंटर करण्यात आले. या घटनेमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणी न्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांनी हे एन्काउंटर संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयच्या वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक डोळ्यापुढे ठेवून एन्काउंटर

या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत अण्णा मारुती शिंदे यांच्या वकिलांनी अक्षय शिंदेची हत्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केल्याचा आरोप करत थेट राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एसआयटी चौकशी करण्याचीही मागणी केली. अण्णा शिंदेचे वकील अमित कटारनवरे म्हणाले, मुलाने रिमांड कॉपीत कोणताही त्रास नसल्याचे म्हटले होते. जामिन मिळून शकतो का? यावर त्याने जामीन मिळू शकतो असेही सांगितले. त्याने 500 रुपये मनी ऑर्डर करण्यास सांगितले होते.

माझ्या मुलामध्ये पिस्तूल हिसकावून घेण्याची हिंमत नव्हती. या प्रकरणातील मोठ्या माशांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला. महाराष्ट्रात लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे कदाचित त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली असावी.

‘देवाभाऊचा न्याय’ असे मेसेज फिरत आहेत

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर सोशल मीडियात देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय, असे मेसेज फिरत आहेत. हे असे असेल तर मग न्यायव्यवस्थेची गरजच काय? आरोपीच्या पत्नीने बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार, तिथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रॅन्चकडे सोपवण्यात आले होते. कोर्टाच्या परवानगीने या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलिस कस्टडी ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आली होती. त्यासाठी त्याला नेले जात होते. त्यावेळी आरोपी शांत बसला होता. त्यावेळी तो आक्रमक होईल अशी कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नव्हती असे सरकारनेच कोर्टाला सांगितले आहे, अशी बाबही याचिकाकर्त्या पीडित कुटुंबीयांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्याच्या शरीरात थोडीही ताकद नव्हती

अक्षय शिंदेंच्या पालकांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, एन्काउंटर होण्यापूर्वी अक्षयने पालकांकडे 500 रुपये मागितले होते. जेणेकरून त्याला कँटिनमधून काही पदार्थ घेऊन खाता येतील. त्यावेळी त्याची परिस्थिती हलाखीची होती. तो पळून जाण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्याच्या शरीरात तेवढी ताकदही नव्हती की तो पिस्तुल खेचू शकेल.

तळागाळात कायद्याचे राज्य असावे
याचिकाकर्ते पुढे म्हणाले, तळागाळात कायद्याचे राज्य असले पाहिजे. पोलिस कुणाला दोषी ठरवायचे व कुणाला नाही हे ठरवत आहेत. ते अतिशय वाईट उदाहरण सादर करत आहेत. न्यायालये आणि आम्ही येथे का आहोत? पोलिस आणि गृहमंत्री असा न्याय करत आहेत. अशा कृत्यांमुळे पोलिसांना असे गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चकमकीचे कौतुक करणारे पोस्टर कोर्टाच्या पटलावर सादर केले. त्यावर न्यायमूर्तींनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी वकिलांना असे दस्तावेज रेकॉर्डवर न ठेवता गुणवत्तेवर युक्तिवाद करण्याची तंबी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रश्न आणि राज्य सरकारची उत्तरे

राज्य सरकार – या घटनेची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी 307 व अपघाती मृत्यू अहवाल (ADR) असे 2 एफआयआर दाखल करण्यात आलेत. या दोन्हीची सीआयडी चौकशी करत आहे.

न्यायमूर्ती – वेणेगावकर (राज्य सरकारचे वकील) आम्हाला टाइमलाइनबद्दल सांगा. टाइमलाइनबद्दल काहीही गोपनीय नाही.

न्यायमूर्ती – आरोपीला बोईसरहून बदलापूरला का हलवण्यात येत होते?

राज्य सरकार – कारण, गुन्हा तिकडे बदलापूरला घडला होता.

न्यायमूर्ती – त्यावेळी त्याच्यासोबत कोणते अधिकारी होते? गुन्हे शाखेचे होते की ठाणे पोलिस होते?

राज्य सरकार – होय.

न्यायमूर्ती – आरोपीला पोलिस कोठडी मंजूर होती काय?

राज्य सरकार – होय.

कोर्ट : अक्षय शिंदेला घेऊन जाणारा अधिकारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा होता?राज्य सरकार: होय.कोर्ट: घटना घडली ती जागा रिकामी होती की जवळपास वसाहती आणि घरे होती?

राज्य सरकार : उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला एक छोटेसे शहर होते. घटनेची माहिती मिळताच अक्षय आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही कोणते हॉस्पिटलमध्ये गेला? ते किती दूर होते?

राज्य सरकार : कळव्याजवळील शिवाजी हॉस्पिटल. हा प्रवास जवळपास 25 मिनिटांचा होता. हे जवळचे हॉस्पिटल होते.

न्यायालय : एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीवर कारवाई होत असताना निष्काळजीपणा कसा? SOP काय आहे, त्याला हातकडी घातली होती का?

राज्य सरकार : घातली होती, त्याने पाणी मागितले होते.

कोर्ट : पिस्तुलावरील बोटांचे ठसे घेतले का?

राज्य सरकारः FSL द्वारे फिंगर प्रिंट्स घेण्यात आले.

कोर्ट : तुम्ही म्हणताय की आरोपीने 3 गोळ्या झाडल्या, पोलिस कर्मचाऱ्याला एक गोळी लागली, उरलेल्या 2 कुठे गेल्या? सहसा, स्वसंरक्षणार्थ आपण पायाला गोळी मारतो की हाताला?

राज्य सरकार : अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही, अशी मोकळी प्रतिक्रिया दिली.

कोर्ट : वाहनात 4 अधिकारी होते आणि त्यांना एक आरोपी आवरता आला नाही, असे कसे मानायचे?

राज्य सरकार: ही ऑन द स्पॉट प्रतिक्रिया होती.

न्यायालय : ते टाळता आले नसते का? पोलिसांची गाडी आहे. पायात गोळी मारणे हे स्वसंरक्षणार्थ केले जाते हे सामान्य माणसालाही माहीत आहे का? आरोपीवर गोळी झाडणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय?

राज्य सरकार: ते सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आहेत.

कोर्ट – गोळी चालवणारा अधिकारी एपीआय दर्जाचा आहे, तर मग तो प्रत्युत्तरादाखल कोणती कारवाई करायची हे आपल्याला माहिती नसल्याचा दावा करू शकत नाही. गोळी मारली पाहिजे हे त्याला माहिती असले पाहिजे.

राज्य सरकार : निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्वतंत्र एजन्सींनी तपास केला पाहिजे. राज्य सीआयडी आणि एसीपी याचा तपास करत आहेत.

कोर्ट : तुम्ही पोलिस अधिकाऱ्याचे बोटांचे ठसे घेतले का? सर्व अधिकाऱ्यांचे बोटांचे ठसे घ्या, आम्ही या प्रकरणाकडे प्रत्येक अंगाने पाहत आहोत. फॉरेन्सिक टीमची वाट पाहण्याऐवजी तुम्ही स्वतःच बोटांचे ठसे घ्यायला हवे होते. सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?

राज्य सरकार : आम्ही वाटेतच सरकारी आणि खासगी इमारतींचे फुटेज सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते.

कोर्ट : आम्हाला आणखी एक गोष्ट हवी आहे. फॉरेन्सिक टीमला हे शोधण्यासाठी विचारा की, आरोपीला दुरून किंवा पॉइंट ब्लँक रेंजवर गोळी घातली गेली. त्याला कुठे गोळी लागली? यात पोलिसांचा सहभाग असला तरी आम्हाला या प्रकरणाचा निष्पक्ष तपास हवा आहे. आम्हाला शंका नाही, पण आम्हाला सत्य हवे आहे. आरोपीच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला आहे का?

राज्य सरकार : नाही.

न्यायालय : शस्त्रे व्यवस्थित जप्त केली आहेत का?

राज्य सरकार : होय, ते एफएसएलकडे पाठवले आहेत.

अक्षयचे वडील : घटनेच्या एक दिवस आधी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्हाला मृतदेह दफन करायचा आहे, पण त्यासाठी जागा मिळत नाही.

कोर्ट : पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असे दिसते की, गोळी पॉईंट ब्लँक रेंजमधून चालवण्यात आली होती. आरोपींना काही शस्त्र दिले होते का? त्याने पिस्तूल हिसकावून घेतले असे म्हणत आहात?

राज्य सरकार : शस्त्रे दिली नाहीत. त्याने पिस्तूल हिसकावले नव्हते, ते हाणामारीत पडले होते.

कोर्ट : आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते रुग्णालयात मृत घोषित करेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जतन करावे, अशी आमची इच्छा आहे.

अजित दरेकर पुणे लोकसभेच्या मुख्य समन्वयकपदी

पुणे:   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेल्या राज्यातील लोकसभा निरिक्षकांसोबत कामकाजा करीता महाराष्ट्राचे प्रभारी  रमेश चेन्निथलाजी यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील लोकसभा क्षेत्राकरीता मुख्य समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     त्याच अनुषंगाने पुणे लोकसेभेच्या मुख्य समन्वयक पदी माजी नगरसेवक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

     पुणे लोकसभा मतदार संघात आठ विधानसभा मतदार संघाची क्षेत्र येतात. आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पुणे लोकसभासाठी माजी खासदार  जगदीश ठाकुर यांची नेमणुक केली आहे.

     या नेमणुकीनंतर श्री. अजित दरेकरांनी महाविकास आघाडीच्या आठही विधानसभेचे उमेदवार निवडणुन आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू असा विश्वास व्‍यक्त केला.

आर्किटेक्ट स्वप्न साकार करणारा सूत्रधार – राजलक्ष्मी अय्यर

स. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पिंपरी, पुणे (दि. २५ सप्टेंबर २०२४) – आर्किटेक्ट हा लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा सूत्रधार असतो. वास्तूशास्त्राचे शिक्षण घेताना नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करा. इतरांशी स्पर्धा करू नका. अभ्यासाचा मनावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. पालक, शिक्षक, वर्गमित्र यांच्याशी संवाद साधा. निसर्ग ही एक साखळी असून आपण या साखळीतील एक भाग आहोत हे लक्षात ठेवा. चांगले कार्य करत राहिल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस, चांगले कार्य हातून घडेल. त्यासाठी उत्तम मार्गदर्शक, अनुभवी गुरूंची आवश्यकता असते. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली काम करा‌. तुम्ही नक्की यशस्वी वास्तूविशारद व्हाल, असे मार्गदर्शन डीप्रूट्स डिझाईन आणि लिव्हिंग प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या संस्थापक प्रिन्सिपल आर्किटेक्ट राजलक्ष्मी अय्यर यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि कार्यशाळा सोमवारी (२३ सप्टेंबर) निगडी प्राधिकरणातील महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, प्रा. शिरीष मोरे, लक्ष्मण तोरगळे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
शिल्पा पाटील यांनी महाविद्यालयाने आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात, वास्तूकलेची माहिती व्हावी यासाठी भारतातील विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. यासाठी पीसीईटी संचालक मंडळाचे नेहमी सहकार्य, मार्गदर्शन लाभते असे सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

व्दितीय वर्षाचे विद्यार्थी फाल्गुनी पटेल आणि आदित्य काळे यांनी सुत्रसंचालन केले. आभार आर्किटेक्ट नीलिमा भिडे यांनी मानले.

४०० हून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव:पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होणार थाटामाटात


महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धा धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. मनिषा सोनवणे, सौ. सुषमा खटावकर, कु. मधुरा धामणगावकर यांचा तेजस्विनी पुरस्काराने होणार गौरव

पुणे : पुण्याची गौरवशाली ओळख असलेल्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाला शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी सुरुवात होत असून धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित महिला महोत्सव शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत साजरा होणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा दिमाखदार रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.


यंदा महिला महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद या उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा सोहम संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा अभिजित सोनवणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून तर आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मा. सौ. सुषमा खटावकर, क्रीडापटू मा. मधुरा धामणगावकर यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून खडतर परिस्थितीत आपले मुलांना चांगली शिकवणूक, विचार देऊन आदर्शवत नागरिक घडविणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना भरघोस बक्षिसांची मेजवानी असणार आहे.
शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता म्युझिकल तंबोला (हाऊजी) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कन्यापूजन सोहळा संपन्न होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक कन्येस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्त पठणाचे आयोजन श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, शिवदर्शन येथे करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत परिक्षक स्पर्धेचे मूल्यांकन करणार आहेत.
शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाआरती होणार असून प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
होम मिनिस्टर, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि महाआरतीच्या दिवशी लकी-ड्रॉ देखील काढला जाणार असून स्पर्धेतील विजेत्या महिलांना रोख बक्षिसांसह एलइडी टिव्ही, ओव्हन, मिक्सर, गॅस शेगडी, वॉशिंग मशीन व इतर गृहपयोगी वस्तू बक्षिसरूपाने दिल्या जाणार आहेत.
या सर्व स्पर्धांसाठी व कन्यापूजन, महाआरतीसाठी येणाऱ्या महिलांना नावनोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी मा. आबा बागुल जनसंपर्क कार्यालय, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे – 9 येथे केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 7972771937/9850903535
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून अध्यक्ष मा. आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत महिला महोत्सव भरविण्यास सुरवात केली आणि त्याची धुरा जयश्री बागुल यांच्याकडे सोपविली. गेल्या 24 वर्षांपासून त्या या महिला महोत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत मंदिरात होमहवन, महाप्रसाद, कुंकुमार्चन व आरती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महोत्सवाचा तसेच जागृत देवस्थान असलेल्या लक्ष्मीमातेच्या दर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सुरेन अकोलकरांनी सुहृदांशी जपले मैत्र

पुणे : प्रा. सुरेन अकोलकर हे हरहुन्नरी कलाकार होते. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ, मृदु व प्रेमळ होता. त्यांनी प्रत्येक सुहृदाशी असलेली मैत्री जपली आणि जोपासली. संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी ते उत्तम मार्गदर्शक होते. सिने संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या सुशिक्षित कलाकारांनी स्थापन केलेल्या मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे सुरेन आकोलकर आधारस्तंभ होते, अशा भावना अकोलकरांच्या सुहृदांनी व्यक्त केल्या.
सुप्रसिद्ध की-बोर्ड प्लेअर, संगीतकार आणि मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक सुरेन अकोलकर यांना कलाकार, मित्र परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि अकोलकर मित्र परिवाराच्या वतीने पूना गेस्ट हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोलकर यांच्या पत्नी मृणाल अकोलकर, कन्या अस्मिता अकोलकर-बोकील, मुलगा शार्दुल अकोलकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील गायक-वादक आणि आप्तांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार आणि समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. इकबाल दरबार, विवेक परांजपे, विजय केळकर, अनिल घाटगे, अनुराधा भारती, मंजू मूर्ती आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी यांनी सुरेश अकोलकरांच्या स्मृतींना उजाळा देताना मेलडी मेकर्सच्या स्थापनेची कहाणी सांगितली. सुरेन अकोलकर हे मेलडी मेकर्सचे हुकमी एक्का होते. त्यांची नजर व वृत्ती लोकांना जिंकून घेणारी होती. आम्ही चौघांनी एकमेकांचा हात धरून मेलडी मेकर्सला नावारुपाला आणले.
अशोककुमार सराफ म्हणाले, प्रा. सुरेन अकोलकर यांनी मळलेली वाट स्वीकारली नाही तर प्रवाहाविरुद्ध जाण्याची त्यांच्यात धमक होती. ते अतिशय गोष्टीवेल्हाळ होते. मेलडी मेकर्सला मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सादरीकरणात नाविन्यता देण्याची त्यांची वृत्ती होती. ते उत्तम कलाकारासह विद्यार्थीप्रिय शिक्षकही होते.
मेलडी मेकर्सचे प्रसिद्ध मेंडोलिनवादक प्रमोदकुमार सराफ म्हणाले, कॉलेज काळापासून असलेली आमची मैत्री शेवटपर्यंत टिकून होती. कारण सुरेन अकोलकरांचा स्वभाव आनंदी व मनमोकळा होता. मेडली मेकर्सच्या जडणघडणीचा प्रवासही त्यांनी अनेक आठवणींद्वारे उलगडला. आम्हा सर्वांमध्ये कौटुंबिक स्नेह होता.
सुप्रसिद्ध निवेदक संदीप पंचवाटकर म्हणाले, प्रा. अकोलकर यांनी आपल्याला पहिला शो करण्याची संधी दिली. त्यांनी अनेक होतकरू कलाकारांनाही मंच उपलब्ध करून दिला.
1967 साली बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मेलडी मेकर्सच्या शोमधील सुरेश अकोलकर यांनी वाजविलेली शहनाई धून तसेच ‌‘याद ना जाए‌’ या गीताची धून ऐकविण्यात आली.
सुभाष इनामदार, अनिल गोडे, श्याम पोरे, माधव गोखले, संदीप पंचवाटकर, आनंद म्हसवडे, प्रमोद दिवाकर, सुरेश हिवाळे, सिमा शिंदे, गितांजली जेधे यांनी अकोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मेलडी मेकर्सच्या कार्यक्रमांचे अनेक वर्षे प्रभावीपणे निवेदन करणाऱ्या जयंत जोशी यांनी प्रा. सुरेन अकोलकर यांच्या आठवणी सांगत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नाना भानगीरेंना टक्कर देणार कोण? प्रशांत जगताप कि महादेव बाबर

टक्कर कुणाशी ?

पुणे- हडपसर मतदार संघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्या प्राधान्य क्रमांकाने दावा असल्याचे नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केल्याने हडपसर मध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे मानले जाते आहे. या मतदार संघात अजितदादा गटाचे चेतन तुपे विद्यमान आमदार असताना त्यांना शिंदे गटाच्या नाना भानगिरे यांच्यासाठी हा मतदार संघ सोडवा लागेल असे बोलले जाते.यातच एकनाथ शिंदे VS अजितदादा असे येथे उमेदवारीसाठी चित्र असताना दुसरीकडे महादेव बाबरांच्या साठी ठाकरेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकलेले दिसत आहेत आणि शरद पवार गटाचे प्रशांत जगताप तर कधीच बाशिंग बांधून फिरू लागलेले आहेत म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोत येथे उमेदवारी साठी चुरस निर्माण झाल्याचे दिसते आहे.मात्र शिंदे गटाच्या नाना भानगिरे यांचे पारडे उमेदवारीसाठी येथून जड असल्याचे मानले जाते.

येत्या काही दिवसातच विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेला विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, जागावाटप याबाबत बैठकाही सुरु आहेत.

पुण्यातही विधानसभेला जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचे आघाडी नेत्यांच्या बोलण्यातून दिसू लागले आहे. पुण्यात शरद पवार गटाने शहरातील आठही जागा लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन मतदारसंघ मागितल्याचे सांगितले आहे.

वडगाव शेरी शिवसेनेचाच विधानसभा मतदारसंघ आहे, त्याशिवाय हडपसर व कोथरूड असे तीन मतदारसंघ आम्ही महाविकास आघाडीत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मागितले आहेत अशी माहिती पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. राज्यात आम्हाला बीड, माजलगाव, अमरावतीही पाहिजे आहे, मात्र आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत अंतीम निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत

मी शिवसेनेची पदाधिकारी आहे. पुणे माझाच जिल्हा आहे. वडगाव शेरीत मी रहायलाच आहे. माझे तिथे घर आहे. माझी स्वत:ची तिथे ६३ हजार मते आहेत, याचा अर्थ मी माझ्यासाठी म्हणून तो मतदारसंघ मागते आहे असा नाही. मला पक्षाने जिल्ह्यातील मतदारसंघांचा अहवाल मागितला होता. तो मी दिला. त्यात हडपसर, कोथरूड बरोबरच वडगाव शेरीची मागणी केली आहे असे अंधारे यांनी सांगितले. कोथरूड हा ठाकरेंच्या शिवसेनेलाच दिला जाईल यात कोणाला शंका वाटत नाही असे चित्र आहे पण वडगाव शेरीत आताच शरद पवार गटात माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र तसेच भैयासाहेब जाधव यांनी प्रवेश केला आहे.त्यामुळे शरद पवार गट येथून दावा करेल तर शिवसेनेच्या संजय भोसले यांच्या साठी किंवा खुद्द सुषमा अंधारे यांच्या साठी ठाकरे गट येथून दावा करेल असे दिसते आहे. एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी साठी आघाडीतून सध्या फक्त कोथरूड वर समाधान सहजगत्या मिळेल असे दिसते आहे तर हडपसर आणि वडगाव शेरी साठी मात्र चर्चेच्या फेऱ्या वर फेऱ्या झडत राहतील असे सांगितले जाते.

सतार-व्हायोलिन सहवादनातून परंपरेचे दर्शन

पुणे : सतारीचे झंकार आणि व्हायोलीनची आर्तता, यांच्या स्वरसंगमाचा अनुभव गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून रसिकांनी घेतला. बुजुर्ग कलाकारांचे अनुभवसिद्ध वादन आणि युवा साधकांचे आश्वासक सादरीकरण याचे दर्शनही अनुभवले.

निमित्त होते, रंजनी आयोजित ‌‘परंपरा – संगीत साधनेचा अखंड प्रवास‌’ या शीर्षकांतर्गत आयोजित सतार – व्हायोलीनच्या सहवादन मैफिलीचे. एस. एम. जोशी सभागृहात आयोजित या अनोख्या मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मैफिलीला ज्येष्ठ सतारवादक आणि गुरू उस्ताद उस्मान खां, व्हायोलीन वादिका चारुशीला गोसावी तसेच प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री भाग्यश्री देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. उस्ताद उस्मान खां यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार त्यांच्या शिष्या जया जोग यांनी केला.

मैफलीचा प्रारंभ ज्येष्ठ सतारवादक आणि गुरू जया जोग यांच्या शिष्या प्रज्ञा मेने आणि ज्येष्ठ व्हायोलीनवादक आणि गुरू नीलिमा राडकर यांच्या शिष्या दीपा कुडतरकर यांच्या एकत्रित वादनाने झाला. राग बागेश्रीमध्ये आलाप, जोड, झाला या क्रमाने या दोन्ही शिष्यांनी उत्तम तयारीचे दर्शन घडवले. मध्यलय त्रिताल आणि द्रुत त्रितालातील त्यांच्या वादनाला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.

त्यानंतर गुरू जया जोग आणि त्यांच्या शिष्या प्रज्ञा मेने यांचे सहवादन रंगले. त्यांनी राग यमन मध्ये एकताल आणि त्रितालातील रचना सादर केल्या. गुरू जया जोग यांना यमनमधील ही रचना त्यांचे गुरू आणि प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान खां यांच्याकडून मिळाली. त्या रचनेला जोडून जया जोग यांनी स्वतः त्रितालातील रचना सिद्ध केली. गुरू-शिष्य परंपरेचा हा प्रवाह अखंडित वाहता राहावा, ही भावना यामागे असल्याचे मनोगत जया जोग यांनी मांडले. मैफिलीचे शीर्षकही परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारे असल्याने या रचनेचे औचित्य आहे, असे त्या म्हणाल्या.

त्यानंतर गुरू डॉ. नीलिमा राडकर आणि त्यांच्या शिष्या दीपा कुडतरकर यांचे व्हायोलीन सहवादन झाले. त्यांनी राग दुर्गा सादर केला. झपताल आणि त्यानंतर त्रितालातील रचनांचे सादरीकरण करत त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली.

मैफिलीची सांगता वैशिष्ट्यपूर्ण होती. गुरू जया जोग आणि गुरू डॉ. नीलिमा राडकर यांनी सतार आणि व्हायोलीनचे रंगतदार सहवादनाने मैफिलीचा कळसाध्याय गाठला. भैरवी धूनचे सादरीकरण करताना त्यांनी सादर केलेल्या रागमालेमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. मालकंस, मिया की तोडी, चंद्रकंस तसेच अहिरभैरव, बसंत, बैरागी अशा रागांचे दर्शन घडवणारी ही रागमाला वैशिष्ट्यपूर्ण होती. या सर्व कलाकारांना भावना टिकले तसेच अक्षय पाटणकर यांनी तबल्याची समर्पक साथ केली. रंजना काळे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. नीलिमा राडकर, जया जोग
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

बदलापुरच्या शाळेत लहान मुलींचे व्हिडिओ बनवले:शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न.

अक्षय शिंदेसारखेच बदलापूर प्रकरणातील इतर आरोपींचेही एन्काउंट करा, विरोधकांचा पाठिंबा.

बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न: नाना पटोले

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२४
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलीसांनी एन्काउंटर केले, याप्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही. विरोधी पक्षांनी या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा, विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहितील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे, हे अत्यंत भयावह आहे. ती शाळा भाजपा, आरएसएसची असून शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. साध्या पाकीटमारालाही पोलीस हातकडी बांधून घेऊन जातात मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का? तो काय तुमचा जावई होता का? ज्या पोलिसाची रिव्हॉलव्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का? बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? हे प्रश्न उपस्थित होतात. जे लोक या प्रकरणात आहेत त्या सर्वांना अक्षय शिंदे सारखीच शिक्षा द्या. बदलापुरातच अशी घटना घडली असे नाही तर गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही अलिकडच्या काळात यापेक्षा भयानक घटना घडली आहे. राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे असे नाना पटोले म्हणाले.

‘जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना‌’ ,‘ओ सजना बरखा बहार आयी‌’अशा गाण्यांनी ‌‘गुजरा हुआ जमाना‌’चा सादर झाला सुवर्णकाळ


स्वरप्रज्ञा म्युझिक अकॅडमीचा रंगला वार्षिकोत्सव

पुणे : ‌‘ओ सजना बरखा बहार आयी‌’, ‌‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमें‌’, ‌‘इचकदाना बिचकदाना‌’, ‌‘वो चाँद खिला वो तारे हँसे‌’, ‌‘जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना‌’ अशा अनेक कर्णमधुर गीतांनी पुणेकरांची संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी ठरली. निमित्त होते स्वरप्रज्ञा म्युझिक अकॅडमी आयोजित ‌‘गुजरा हुआ जमाना‌’चे.
‌’स्वरप्रज्ञा च्या वार्षिकोत्सवाअंतर्गत 1950 ते 1980 या काळातील हिंदी संगीताच्या सुवर्ण युगाची ही सफर घडवून आणली ती अकादमीच्या 20 विद्यार्थ्यांनी. कार्यक्रमाची सुरुवात दिगंबर केशवराव गुंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मिलिंद उपाध्ये यांच्या हस्ते दिगंबर गुंडे यांचा सत्कार करण्यात आला. हॅपी कॉलनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात बालचमूंनी सादर केलेल्या ‌‘तुम आशा, विश्वास हो‌’ या प्रार्थनेने झाली तर समारोप ‌‘सारे के सारे गामा को लेकर गाते रहे‌’ या गीताने झाला.
अकादमीच्या संचालिका प्रज्ञा देशपांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या अस्मी कुलकर्णी, निधी अभ्यंकर, सारिका गोडबोले, साधना वझे, योजनगंधा मराठे, मैथिली बलवल्ली, प्रशांत कुलकर्णी, अक्षरा भागवत, तृप्ती कुलकर्णी-जागुष्टे, मयुरी तानवडे, हिमांशू मांजरेकर, मीरा बडवे, अद्वैत कुलकर्णी, अमीत जोशी, स्वरा कुलकर्णी, ईश्वरी वरुडकर, ग्रीष्मा खाडीलकर, मृण्मयी जोशी, ऋजुता मराठे या कलाकारांनी श्रवणीय गीते सादर केली. त्यांना विजय उपाध्ये (हार्मोनियम), अमन सय्यद (किबोर्ड), अतुल गर्दे (गिटार), राजेंद्र हसबनीस (तबला), रोहित साने (रिदम मशीन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ. मानसी अरकडी यांनी केले.
‌‘नन्हा मुन्ना राही हू‌’ं, ‌‘सैंय्या दिलमें आना रे‌’, ‌‘फिर वही शाम वही तनहाई है‌’, ‌‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने‌’, ‌‘नाम गुम जायेगा‌’, ‌‘पिया बावरी‌’, ‌‘भँवरे की गुंजन है मेरा दिल‌’, ‌‘फिर वही शाम वही गम‌’, ‌‘जवाँ है मुहब्बत हँसी है जमाना‌’, ‌‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुनें‌’, ‌‘पिया बावरी‌’, ‌‘दिल चीज क्या है आप मेरी‌’ आदी श्रवणीय गातांचे स्वर सभागृहात निनादत राहिले. नूरजहाँ, शमशाद बेगम, महंमद रफी, जगजीत सिंग, गुलजार आदींच्या सुरेल मेडलीने कार्यक्रमात रंग भरले.

अक्षय शिंदेला सोपे मरण दिले:खासदार उदयनराजे भोसले यांचे बदलापूर एन्काऊंटरवर भाष्य

0

फाशीची शिक्षा होणारच होती , जी एन्काऊंटर पेक्षा भयानक होती,एन्काऊंटर ने त्वरित मुक्ती मिळाली ..पण कोर्टाने फाशी दिली असती तर फाशी होईपर्यंतचे जीवन हि मोठी शिक्षा असते आणि फाशीला कैदी सामोरे जातो तेव्हा अखेरची घटका जस जशी जवळ येते तसतसा तो तुटत जातो अखेरच्या वेळी तर फाशी गेट जवळ त्याला ओढत ओढत नेले जाते तेव्हाची अवस्था जेल मधील संबाधीतांनाच ठाऊक असते त्यामुळे एन्काऊंटर ने शिक्षा वाचली असा एक प्रवाह असताना याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची आहे .

सातारा -बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रस्तुत प्रकरणातील गुन्हेगाराला फार सहज मरण दिले, त्याला तुडवून मारण्याची गरज होती, असे ते म्हणालेत. विरोधी पक्षांनी या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचे सोमवारी सायंकाळी एन्काऊंटर करण्यात आले. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी हे एन्काऊंटर करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, मला सत्ताधारी किंवा विरोधक यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केले असते? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो. या घटनेतील आरोपीला गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज मरण झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. त्यानंतर जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आज झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने कायद्यात योग्य तो बदल करावा. बलात्कार केला की सरळ लोकांपुढे आरोपीला फाशी द्या.

दुसरीकडे, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास मंगळवारी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रॅन्चच्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले होते. पोलिस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. रस्त्यात त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत तो मारला गेला.

या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या पालकांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. अक्षयला पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी त्याचे एन्काऊंटर करण्यात आले. आम्हाला त्याचा मृतदेहही पाहू देण्यात आला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधकांनीही अक्षयच्या हातात बेड्या होत्या, तर मग त्याने गोळीबार कसा केला? असा सवाल उपस्थित केला आहे.

मिलिंद वाळंज यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद- खासदार ओमराजे निंबाळकर

युवा नेते व उद्योजक मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
पुणे, २४ सप्टेंबर – मममिलिंद यांचे वडिल नंदकुमार वाळंज यांनी मुळशी भागातील लोकांसाठी सामाजिक कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे मिलिंद नेत आहेत. ते करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.फफ असे गौरवोद्गार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढले.
मिलिंदादा वाळंज युवा मंच व मित्र परिवार यांच्यावतीने मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा अ‍ॅम्बेव्हॅली येथे नुकताच पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच, मुळशी भागातील वारकरी संप्रदायात योगदान देणार्‍या संस्था व मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार (बाबुजी) वाळंज व शिवसेनेचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते. तसेच सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले, मुळशी भागातील लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन वाळंज कुटुंब सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत. वाळंज कुटुंबाचा वारसा मिलिंद पुढे चालवत आहेत. ते करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आज येथे होताना दिसत आहे. भविष्यात सामाजासाठी उपयोगी असे कार्य त्यांच्या हातून घडावे ही सदिच्छा.
मिलिंद वाळंज म्हणाले, येथील जनतेसाठी चांगले काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. जनतेची इच्छा आणि भविष्यात निवडणूक लढवायची संधी मिळाली तर मी नक्कीच विचार करेन. आमच्या आई वडिलांनी या क्षेत्रात समाजसेवेचे व्रत घेऊन पाया रचला आहे. आता त्यावर कळस बांधण्याचे कार्य आम्ही करू.
रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी मिलिंद वाळंज यांना शुभाशिर्वाद देऊन कीर्तनरूपी सेवा सादर केली.
या कार्यक्रमात सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

तिसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव शुक्रवारी-गणेश चप्पलवार

पर्यटन संचालनालय व परभन्ना फाउंडेशनचा पुढाकारडॉ. विश्वास केळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’; ‘टुरिझम, युथ अँड पीस’वर चर्चासत्र
पुणे : जागतिक पर्यटन दिवसानिमित्त पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा महोत्सवात १५ राज्यांतून आलेल्या ६० लघुपट, माहितीपटांपैकी १२ माहितीपट, तीन लघुपट व एक व्ही-लॉगचे स्क्रीनिंग होणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर २०२४) पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र, घोले रोड पुणे येथे हा लघुपट महोत्सव होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमख प्रा. डॉ. माधवी रेड्डी, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

पर्यटन लघुपट महोत्सव चार टप्प्यांमध्ये पार पडणार असून, यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्क्रीनिंग, चर्चासत्र आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा समावेश आहे. ‘टुरिझम, युथ अँड पीस’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसचे संचालक महेश ठाकूर, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम, बजेट ट्रॅव्हलर प्रज्ञेश मोळक, टुरिझम प्रॅक्टिशनर ऋतुजा अचलारे, प्रबुद्ध इंटरनॅशनलचे संस्थापक सिद्धार्थ अहिवळे सहभागी होणार आहेत, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी महोत्सव सल्लागार समितीचे जीवराज चोले, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस प्रा. डॉ. महेश ठाकूर, संचालनालयाचे उपलेखापाल आनंद जोगदंड, संयोजन समितीचे असीम त्रिभुवन, के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

गणेश चप्पलवार म्हणाले, “कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. विश्वास केळकर, ‘बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड २०२४’ प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस) आणि ‘बेस्ट ऍग्री टुरिझम अवार्ड’ आनंद कृषी पर्यटन केंद्र (आनंद जाधव) यांना प्रदान करण्यात येणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट व्ही-लॉग असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून अभिनेत्री वैशाली केंदळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सिमरन जेठवानी यांनी काम पाहिले आहे.”

“दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवसाचे औचित्य साधून परभन्ना फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. यावर लिहिले आणि वाचले गेले पाहिजे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, ही यामागची भावना आहे.”
– गणेश चप्पलवार, लघुपट महोत्सवाचे प्रमुख

पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख कायम रहावी असे नियोजन करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २४- अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली आज पुणे महानगर विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की मुख्य पुणे शहर दाटीवाटीचे झाले आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्याच्या विकासाचे नियोजन करतांना तज्ज्ञांची मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुण्यात होणाऱ्या कव्हेशन सेंटर हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी नियोजन करावे, गुंठेवारी अधिनियमातील नियमितीकरणाचे शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, हे शुल्क भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष सवलत उपलब्ध करुन जास्तीत जास्त जमिनी नियमित करुन घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की पुणे महानगराचा प्रारुप विकास आराखडा तयार करतांना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल, अशा प्रकारे तयार करावा. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाची गुणवत्ता चांगली राहिल, याची काळजी घ्यावी. घरांच्या गुणवत्तेत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तयार असणाऱ्या एकूण ४ हजार ८८६ घरांपैकी उरलेल्या १ हजार ६२० घरांची सोडत लवकरच काढण्यात यावी. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ६ हजार घरांच्या बांधकामास वेग देण्यात यावा. सोबतच या घरांचे बांधकाम करतांना उद्यान, मोकळी जागा सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्थापनेस आणि १० ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र निर्मितीस मान्यता देण्यात आली. ११ ठिकाणी मलनिस्सारण योजना तयार करण्यास, लोणावळा येथे टायगर व लायन्स पाँईंट येथे ग्लास स्कायवॉक तयार करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.