बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान – संतोष अजमेरा

Date:

पुणे: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव जनसामान्यांवर वाढत आहे. या परिस्थितीत बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील मोठे आव्हान असून पत्रकारांनी त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्य अधिकारी संतोष अजमेरा यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय, पुणे व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी  प्रमुख वक्ते श्री. अजमेरा बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, विभागीय उपसंचालक मोहन राठोड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख संजय तांबट, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होत्या.

श्री. अजमेरा म्हणाले, पत्रकार दिन दररोज साजरा करायला पाहिजे कारण रोजच्या घडामोडींची माहिती घेतल्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. वृत्तपत्र जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व मोठे आहे. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती रिपोर्टर झाला आहे. काही व्यक्ती बातमीची विश्वासार्हता न तपासता बातमी देतात त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात टिकण्यासाठी निर्भिड, नि:पक्षपाती असण्याबरोबरच वाचन व लिखाणाची आवड असणे आवश्क आहे.

श्री. राठोड म्हणाले, दिवसेंदिवस मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच वेब माध्यमांचा प्रभावीपणे वापर होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात सध्या नवनवी आव्हाने समोर येत असून यापुढील काळातही ती येतच  राहणार आहेत. पत्रकारांनी व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी या आव्हानांवर मात करुन पुढे जाण्याची गरज आहे.

श्री. काळे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात सुरुवातीपासून वेगवेगळया आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या  स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये माध्यमांत टिकून राहून काम करणे हे देखील आव्हान आहे. या क्षेत्रात अभ्यासू, प्रामाणिक, जिज्ञासू  व कष्टाळू व्यक्तींची  गरज आहे. समाजाच्या बदलत्या परिस्थितीनुसार वृत्तसंस्थांमध्ये व पत्रकारांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास, वाचन व लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात श्री. डुंबरे म्हणाले, सध्या सोशल मिडीया वेगवान व प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी माध्यमे व पत्रकार महत्वाचा भाग आहे. माध्यमांमध्ये मालकी रचना बदलल्यामुळे या क्षेत्रात चांगली विचारधारा असणाऱ्या माणसांची  गरज आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तांबट यांनी केले. तर आभार वृषाली पाटील यांनी मानले. यावेळी पत्रकार, माहिती सहाय्यक जयंत कर्पे, रोहित साबळे, मिलिंद भिंगारे, ज्ञानेश्वर कोकणे, विशाल कार्लेकर, विलास कुंजीर, मोहन मोटे, पंढरीनाथ शेलार, सुनील झुंजार व  विशाल तामचीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....