मुद्रण कॉलेज चे रूपांतर विश्वविद्यालयात व्हावे–पं. गाडगीळ
पुणे-मुद्रण महर्षी डॉ. प.भ.कुलकर्णी प्रतिष्ठान आणि पुणे विद्यार्थी गृह यांचे तर्फे मुद्रण क्षेत्रात भरीव योगदान दिल्या बद्दल माजी प्राचार्य ऋषीकुमार उनियाल यांना पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते मुद्रणमहर्षी डॉ प.भ कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार,पुणेरी पगडी,शाल, मानपत्र,स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.या वेळी दि.पुना प्रेस असो.चे अध्यक्ष रवी जोशी , पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुभाष जिर्गे ,कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे,कुलसचिव सुनील रेडेकर, विश्वस्त राजेंद्र कडूस्कर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रिंट विक मासिकातील 100 उद्योजकां मध्ये नाव आलेले कॉलेज चे माजी विद्यार्थी बुर्डा, इंडिया चे बी.ए. शेष,विक्रम प्रिंटर्स चे मंदार उगार, अमोल असो.चे अमोल देशपांडे यांचे आणि प्रिंटिंग डिप्लोमा मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी कु.ढोरे चैताली,सत्यमकुमार राय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी घुमरे अविनाश ,दर्फे शुभांगी या सर्वांचे स्मृतिचिन्ह ,श्यामची आई गौरव ग्रंथ व प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.त्याचप्रमाणे प्रिंटींग डिप्लोमा चे विद्यार्थी कु.दौंडकर प्रांजल, राऊत प्रशांत ,गायकवाड गणेश प्रिंटींग इंजि.कॉलेज चे कु.कटारिया प्रणाली,चव्हाण युवराज,हरणमारे शिवम,ठोंबरे प्रताप यांना प्रत्येकी 5000रु.शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र यावेळी दिले.
यावेळी पंडित गाडगीळ म्हणाले की आधुनिक काळाची गरज असल्याने संस्थेने भारतातील पहिले मुद्रण महाविद्यालय म्हणून न पहाता आता त्याचे रूपांतर मुद्रण विश्वविद्यालया कडे नेऊन वाटचाल करावी म्हणजे कै. डॉ प.भ.कुलकर्णी आणि आम्हा मुद्रक परिवाराला समाधान मिळेल तर शेष,उगार आणि देशपांडे यांनी मुद्रण क्षेत्रातील चालू घडामोडी तसेच उद्योजक म्हणून वाटचाल कशी केली याची सविस्तर माहिती दिली तसेच प्रश्न उत्तर या चर्चेत देखील मुलांना प्रिंटींग मध्ये मोठे करिअर असल्याचे सांगितले.
रवी जोशी यांनी देखील प्रिंटिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामामुळे आपली मोठी आर्थिक प्रगती होते तसेच या मध्ये महिलांनी अजून पुढे आले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रतिष्ठान ला त्यांचे संस्थेतर्फे शताब्दी निमित्ताने 1लाख रु.देणगी जाहीर केली तर रवींद्र जोशी यांना ऑल इंडिया मास्टर्स प्रिंटर्स असोसिएशन,दिल्ली चे अध्यक्ष पदाचे निवडणूक साठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.कॉलेज चे मीना हडप यांनी 10हजार,मंदार उगार 21हजार,अमोल देशपांडे यांनी 3वर्षात एकूण 33हजार,तर भोसले सर यांनी दरवर्षी 5000रु एका विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे कबूल केले.या प्रसंगी जीवन गौरव पुरस्कारास उत्तर देताना उनियाल सर म्हणाले की प.भ.कुलकर्णी यांच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे आम्ही घडलो, त्यांचे मार्गदर्शनाखाली कॉलेज उभारणीत तसेच मुलांना शिक्षण देण्यात मदत केली यामुळेच आजचा सन्मान मिळाला असे वाटते. कार्यक्रमाचे स्वागत नितीन वाणी, सूत्रसंचालन सुधन्वा रानडे , आभार प्रदर्शन प्रा. राजेंद्र कांबळे यांनी केले ,तर स्वागत गीत मुक्तांगण स्कुलच्या विद्यार्थ्यांनी म्हटले.आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत प्रकाश घोडके,सचिन कुलकर्णी,दत्ता मुजुमदार ,ममता कुलकर्णी ,मधुरा महाजन,प्राचार्य डॉ.नेरकर ,प्राचार्य शिंदेआणि रघुनाथ ढोक यांनी केली.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग , आजी माजी प्राचार्य ,कर्मचारी उपस्थित होते.