मुंबई, : विजया दशमी अर्थात दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत विजया दशमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुष्ट प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे विजया दशमी. या निमित्ताने अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथांवर विजय मिळवून आनंद आणि स्नेहाचे सोने लुटले जावे. आपले प्रत्येक सण हे निसर्गाच्या जवळ जाण्याचेच महत्त्व अधोरेखित करतात.त्यामुळे हा सणही पर्यावरणपूरक साजरा केला तर तो निर्सगाचाच सन्मान राखण्यासारखा आहे.