पुणे-आज बकरी ईद निमित्त इदगाह मैदान येथे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.तर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे विविध जाती-धर्मांच्या भक्तगणांनांच्या उपस्थितीत श्री गणेशाची सामुहिक आरती करत सर्व कला-गुणांचा ईश्वर असलेल्या, बुद्धीच्या देवतेला सर्वत्र शांतता, सलोखा आणि सामाजिक एकता टिकून राहण्यासाठी साकडं घातले. निमित्त होते येथील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे आयोजित सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत गणपतीच्या आरतीचे.
जात आणि धर्म हे भारतीय समाजरचनेचे वास्तव असून केवळ विविध जाती-धर्मांमधील तेढ कमी होण्यासाठी नव्हे तर जाती जातींमध्ये ही तेढ निर्माण होऊच नये म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे सामाजिक समरसतेचे अनेक विविध उपक्रम राबविले जातात. त्याच काही उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे गणपतीच्या दिवसांतील सर्वधर्मीयां समवेत होणारी गणपतीची आरती होय. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते यावेळी आरती करण्यात आली. यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदीराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, विजय गोरे, नितीन काळे, बाबा नलावडे, अतीस सैय्यद, भरत कोंडालकर, बबलु सुभे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाचे यंदा 30 वे वर्षे होते. या माध्यमातून ख्रिच्शन, मुस्लिम, जैन, बौद्ध, शीख आदी धर्मांतील प्रतिनिधींनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला त्यात बौद्ध धर्माचे जयसिंगराव कांबळे, ख्रिश्चन समाजाचे रेव्हरंड सुशिलकुमार खिलारे, सुरेंद्र लोंढे, जैन समाजाचे हिरालाल छाजेड, मुस्लिम समाजाचे मसुमअली सय्यद,शिख समुदयाचे भोलासिंग आरोरातसेच विठ्ठल गायकवाड,राजेश लाहोटी,गणेश शिंदे आदी मान्यवरांनी आदींनी प्रातिनिधीक स्वरुपात गणपतीची आरती केली.