पुणे :- गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला २५०० हजार रोपांचे वाटप करण्यात आले.पर्यावरण दिनाच्यावेळी पर्यावरण पूरक कामे करण्याची प्रतिज्ञा करत एक पाऊल पुढे जात त्यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि, नागरी वस्ती असलेल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करुन वातावरणमध्ये होणारे बदल व प्रदुषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.येणाऱ्या पिढीमध्ये पर्यावरण टिकवण्यासाठीची सुरुवात स्वत: पासुन करायला हवी ही भावना रुजवली पाहिजे.
पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड प्रमाणात होत असलेली जंगलतोड रोखली जावी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात निसर्गसौंदर्य टिकून राहावे हाच वृक्ष संवर्धनाचा संदेश या उपक्रमांतर्गत देण्यात आला.