पुणे- भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर सुरु आहेतच ,पण आता रोज एका जवानाचे शव शहीद म्हणून घरी पाठविले जाते आहे . आणि तिसरीकडे पेट्रोल डीझेल गॅस च्या दरवाढीने , बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे अशा परिस्थितीचा फायदा अर्थात भाजपचे विरोधक असलेले राजकीय पक्ष तर घेत आहेतच . पण यावर तोडगा कोणता पक्ष काढू शकतो यावर मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव पुढे येताना दिसत नाही . एक देखील राजकीय पक्ष सक्षम नाही असे जनतेचे ठाम मत बनले आहे .
काँग्रेस चे राहुल गांधी सत्ता जाताच आता एकाकी लढत देत असल्याचे जनतेला जाणवत आहे . असंख्य नेते घरी बसून तमाशा पाहत आहेत तर असंख्य नेते भाजप मध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत . एका अर्थाने कॉंग्रेसचे शुद्धीकरण होत आहे . तरीही मात्र जनतेचा अद्यापही या पक्षावर आणि अन्य कोणत्याही विश्वास दिसून येत नाही . अशा अवस्थेत भारतीय जनता वाटचाल करीत आहे .