पुणे-गेल्या १५ हून अधिक वर्षापासून बंद पडलेल्या भीमपुरा येथील पुणे कँटोंमेंट बोर्ड तर्फे चालविण्यात येणार्या वीर सावरकर शाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खा.अनिल शिरोळे व राज्य मंत्री दिलीप कांबळे ह्यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. ह्या प्रसंगी बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, प्रमुख संचालक एल के पेगू, सदस्य दिलीप गिरमकर, विनोद मथुरावाला, रूपाली बीडकर, किरण मंत्री, प्रियंका श्रीगिरी आदि उपस्थित होते. ” दाट वस्ती मधील शाळा बंद पडल्यामुळे मुलांना दुसर्या शाळेत जावे लागत होते. २.५४ कोटी रुपये खर्चून शाळेचा पुनर्विकास आगामी १८ महिन्यात पूर्ण होणार असून त्यामुळे कुंभार बावडी, पहाडी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच शिक्षणाची सोय उपलब्ध होणार असल्याचे शिरोळे ह्या प्रसंगी बोलताना म्हणाले. नूतनीकरण झाल्यानंतर शाळेत तीन मजली इमारतीमध्ये प्रामुख्याने इंग्लिश मिडियम बरोबरच ई लर्निंग , स्मार्ट क्लासेस व ई – लायब्ररी च्या सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.
१५ वर्षे बंद असलेली वीर सावरकर शाळा सुरु करणार -खा. अनिल शिरोळे
Date: