नवी दिल्ली – खेड्यातून लोंढे रोजगारासाठी शहरात येत आहेत . खेडी विकसित करा . शहरांचा अजगर करू नका अशा मागण्यांना धुडकावून खेडी उजाड करणाऱ्या ‘स्मार्ट सिटी ‘ योजनेचा आज अखेर केंद्र सरकारने बिगुल वाजविला गुरुवारी पहिल्या 20 स्मार्ट सिटीजची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी याची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पहिल्या टप्प्यातील २० स्मार्ट सिटी
1 भुवनेश्वर- ओरिसा 2. पुणे – महाराष्ट्र 3. जयपुर-राजस्थान 4. सूरत- गुजरात 5. कोचीन-केरला 6. अहमदाबाद- गुजरात 7. जबलपुर-मध्यप्रदेश 8. विशाखापट्टनम -आंध्र प्रदेश 9. सोलापुर- महाराष्ट्र 10. धवनगिरि -कर्नाटक ११-इंदौर -मध्यप्रदेश 12. नवी दिल्ली, १३. कोईम्बतूर- तामिळनाडू ,१४ काकिनाडा -आंध्र प्रदेश १५. बेळगाव-कर्नाटक , १६. उदयपुर-राजस्थान , १७ गुवाहाटी-आसाम ,१८.चेन्नइ -तामिळनाडू १९. लुधियाना -पंजाब, २० भोपाल-मध्यप्रदेश
निवड झाली पुढे काय ?
केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, निवड झालेल्या शहरांना पहिल्या वर्षी 200-200 कोटी रुपये आणि त्यानंतर तीन वर्षे 100-100 कोटी रुपये दिले जातील.
या प्रॉजेक्टसाठी 48000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यात केंद्र आणि राज्य सरकार यांची भागीदारी राहील.
यावर्षी २० शहरांची निवड झाली आहे पुढच्या वर्षी ४० आणि त्यापुढच्या वर्षात आणखी ४० शहरांची निवड केली जाणार आहे अशा पद्धतीने १०० शहरांसाठी हि योजना आहे.