सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली, गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीनास्नान केले. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल, महानिर्वाण व निर्मोही या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केले. स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले. कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणूका काढण्यात आल्या. पहाटे महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरमित बग्गा, त्यांच्यापाठोपाठ सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे नेते रामतीर्थावर दाखल झालेत. निर्वाणी आखाड्याची शाहीस्नान मिरवणूक पोचण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन इथे पोचले. निर्वाणी आखाड्यातील साधू-संत-महंतांचे दुतोंड्या मारुतीजवळ जात पालकमंत्र्यांनी स्वागत केलं. गोदामाईच्या स्नानाची आस लागलेले साधू-संत धावत रामतीर्थापर्यंत पोचले अन् “जय बजरंग बली‘, “सियावर रामचंद्र की जय‘, अशा जयघोषानं रामतीर्थ दुमदुमून गेलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज रामतीर्थावर पोचले. तद्नंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि इतर पुरोहितांनी गंगापूजन, सिंहस्थ स्नान पूजन, गंगाभेट, इष्टदेवता-ध्वज-निशाणपूजन, तीर्थपूजन असे विधी केलेत. मग पुन्हा “सियावर रामचंद्र की जय‘, “जय बजरंग बली‘, असा जयघोष झाला. निशाण-ध्वज-इष्टदेवतांचे स्नान होताच, महंत ग्यानदास महाराजांनी डुबकी मारली. निर्वाणी आखाडा पुढे निघताच, गौरी पटांगणावर थांबलेला दिगंबर आखाडा रामतीर्थावर पोचला. दिगंबर आखाड्याचे स्नान लांबते म्हटल्यावर सुरक्षा विभागातर्फे साधू-संत-महंतांना स्नान आटोपल्यावर रामतीर्थ सोडण्याची विनंती करण्यात आली. हे स्नान आटोपताच अखेरचा निर्मोही आखाडा दाखल झाला. या आखाड्याची स्नान उरकताच, सकाळी साडेदहाला यशवंत महाराज पटांगणावरील बॅरेकेटसची तटबंदी ओलांडून रामतीर्थावर प्रवेश केला. गर्दी होते म्हटल्यावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी दोरखंडाच्या माध्यमातून गर्दी व्यवस्थापन करण्यास सुरवात केली. या मार्गावरुन येणाऱ्या भाविकांची अडचण होते म्हटल्यावर पालकमंत्री इथे पोचले आणि गर्दी व्यवस्थापनात त्यांनी स्वतः दोरखंड धरत, भाविकांना विनंती केली.त्र्यंबकेश्वर येथे ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’, ‘नमो पार्वतेपतये हर हर महादेव’, ‘श्रीचंद्रदेव भगवान की जय’, ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’, अशा घोषणांनी त्र्यंबकेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. मध्यरात्र सरत असतानाच पहाटेच दहाही आखाड्यांमध्ये शाहीस्नानाच्या मिरवणुकीसाठी तयारी करण्यात आली होती. सजलेले नागा साधू, फुलांच्या माळांनी सजलेले रथ, शस्त्रधारी साधूंच्या कसरती यांच्या जोडीला आसमंत भेदत जाणाऱ्या ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविकांनी शाहीस्नानातील रंगत वाढवली. नाशिकच्या तुलनेमध्ये भाविकांची संख्या खूपच कमी होती; मात्र उत्साहात काहीही कमतरता जाणवत नव्हती.
सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिले शाहीस्नान संपन्न
नाशिक – गुरू, सुर्य आणि मंगळ ग्रहांच्या परस्पर सहवास आणि त्यातुन निर्माण झालेल्या पवित्र सिंहस्थ पर्वात इष्टदेवतांना स्नान करून येथील रामकुंडात आज मंत्रोच्चार, श्रीरामाच्या जयघोषात पहिले शाहीस्नान झाले.
सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली, गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीनास्नान केले. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल, महानिर्वाण व निर्मोही या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केले. स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले. कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणूका काढण्यात आल्या. पहाटे महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरमित बग्गा, त्यांच्यापाठोपाठ सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे नेते रामतीर्थावर दाखल झालेत. निर्वाणी आखाड्याची शाहीस्नान मिरवणूक पोचण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन इथे पोचले. निर्वाणी आखाड्यातील साधू-संत-महंतांचे दुतोंड्या मारुतीजवळ जात पालकमंत्र्यांनी स्वागत केलं. गोदामाईच्या स्नानाची आस लागलेले साधू-संत धावत रामतीर्थापर्यंत पोचले अन् “जय बजरंग बली‘, “सियावर रामचंद्र की जय‘, अशा जयघोषानं रामतीर्थ दुमदुमून गेलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज रामतीर्थावर पोचले. तद्नंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि इतर पुरोहितांनी गंगापूजन, सिंहस्थ स्नान पूजन, गंगाभेट, इष्टदेवता-ध्वज-निशाणपूजन, तीर्थपूजन असे विधी केलेत. मग पुन्हा “सियावर रामचंद्र की जय‘, “जय बजरंग बली‘, असा जयघोष झाला. निशाण-ध्वज-इष्टदेवतांचे स्नान होताच, महंत ग्यानदास महाराजांनी डुबकी मारली. निर्वाणी आखाडा पुढे निघताच, गौरी पटांगणावर थांबलेला दिगंबर आखाडा रामतीर्थावर पोचला. दिगंबर आखाड्याचे स्नान लांबते म्हटल्यावर सुरक्षा विभागातर्फे साधू-संत-महंतांना स्नान आटोपल्यावर रामतीर्थ सोडण्याची विनंती करण्यात आली. हे स्नान आटोपताच अखेरचा निर्मोही आखाडा दाखल झाला. या आखाड्याची स्नान उरकताच, सकाळी साडेदहाला यशवंत महाराज पटांगणावरील बॅरेकेटसची तटबंदी ओलांडून रामतीर्थावर प्रवेश केला. गर्दी होते म्हटल्यावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी दोरखंडाच्या माध्यमातून गर्दी व्यवस्थापन करण्यास सुरवात केली. या मार्गावरुन येणाऱ्या भाविकांची अडचण होते म्हटल्यावर पालकमंत्री इथे पोचले आणि गर्दी व्यवस्थापनात त्यांनी स्वतः दोरखंड धरत, भाविकांना विनंती केली.त्र्यंबकेश्वर येथे ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’, ‘नमो पार्वतेपतये हर हर महादेव’, ‘श्रीचंद्रदेव भगवान की जय’, ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’, अशा घोषणांनी त्र्यंबकेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. मध्यरात्र सरत असतानाच पहाटेच दहाही आखाड्यांमध्ये शाहीस्नानाच्या मिरवणुकीसाठी तयारी करण्यात आली होती. सजलेले नागा साधू, फुलांच्या माळांनी सजलेले रथ, शस्त्रधारी साधूंच्या कसरती यांच्या जोडीला आसमंत भेदत जाणाऱ्या ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविकांनी शाहीस्नानातील रंगत वाढवली. नाशिकच्या तुलनेमध्ये भाविकांची संख्या खूपच कमी होती; मात्र उत्साहात काहीही कमतरता जाणवत नव्हती.
सिंहस्थ . कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली, गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ वाजून १६ मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीनास्नान केले. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल, महानिर्वाण व निर्मोही या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केले. स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर भाविकांनी रांगोऴ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केले. कुशावर्त तीर्थावर प्रस्थान करताना नागा साधूंच्या मिरवणूका काढण्यात आल्या. पहाटे महापौर अशोक मुतर्डक, उपमहापौर गुरमित बग्गा, त्यांच्यापाठोपाठ सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे नेते रामतीर्थावर दाखल झालेत. निर्वाणी आखाड्याची शाहीस्नान मिरवणूक पोचण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन इथे पोचले. निर्वाणी आखाड्यातील साधू-संत-महंतांचे दुतोंड्या मारुतीजवळ जात पालकमंत्र्यांनी स्वागत केलं. गोदामाईच्या स्नानाची आस लागलेले साधू-संत धावत रामतीर्थापर्यंत पोचले अन् “जय बजरंग बली‘, “सियावर रामचंद्र की जय‘, अशा जयघोषानं रामतीर्थ दुमदुमून गेलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज रामतीर्थावर पोचले. तद्नंतर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि इतर पुरोहितांनी गंगापूजन, सिंहस्थ स्नान पूजन, गंगाभेट, इष्टदेवता-ध्वज-निशाणपूजन, तीर्थपूजन असे विधी केलेत. मग पुन्हा “सियावर रामचंद्र की जय‘, “जय बजरंग बली‘, असा जयघोष झाला. निशाण-ध्वज-इष्टदेवतांचे स्नान होताच, महंत ग्यानदास महाराजांनी डुबकी मारली. निर्वाणी आखाडा पुढे निघताच, गौरी पटांगणावर थांबलेला दिगंबर आखाडा रामतीर्थावर पोचला. दिगंबर आखाड्याचे स्नान लांबते म्हटल्यावर सुरक्षा विभागातर्फे साधू-संत-महंतांना स्नान आटोपल्यावर रामतीर्थ सोडण्याची विनंती करण्यात आली. हे स्नान आटोपताच अखेरचा निर्मोही आखाडा दाखल झाला. या आखाड्याची स्नान उरकताच, सकाळी साडेदहाला यशवंत महाराज पटांगणावरील बॅरेकेटसची तटबंदी ओलांडून रामतीर्थावर प्रवेश केला. गर्दी होते म्हटल्यावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी दोरखंडाच्या माध्यमातून गर्दी व्यवस्थापन करण्यास सुरवात केली. या मार्गावरुन येणाऱ्या भाविकांची अडचण होते म्हटल्यावर पालकमंत्री इथे पोचले आणि गर्दी व्यवस्थापनात त्यांनी स्वतः दोरखंड धरत, भाविकांना विनंती केली.त्र्यंबकेश्वर येथे ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’, ‘नमो पार्वतेपतये हर हर महादेव’, ‘श्रीचंद्रदेव भगवान की जय’, ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’, अशा घोषणांनी त्र्यंबकेश्वरचा परिसर दुमदुमून गेला. मध्यरात्र सरत असतानाच पहाटेच दहाही आखाड्यांमध्ये शाहीस्नानाच्या मिरवणुकीसाठी तयारी करण्यात आली होती. सजलेले नागा साधू, फुलांच्या माळांनी सजलेले रथ, शस्त्रधारी साधूंच्या कसरती यांच्या जोडीला आसमंत भेदत जाणाऱ्या ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविकांनी शाहीस्नानातील रंगत वाढवली. नाशिकच्या तुलनेमध्ये भाविकांची संख्या खूपच कमी होती; मात्र उत्साहात काहीही कमतरता जाणवत नव्हती.