हे तीनही पत्रकार काल रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळीच एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मुंबईत मारहाण करण्यात आली होती. त्याचसोबत कॅमे-याची तोडफोड करून कॅमेरामनलाही मारहाण झाली होती. 24 तासांत 5-6 पत्रकारांवर मुंबईसारख्या महानगरात हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईत तीन पत्रकारांवर हल्ला- एका पत्रकाराचा मृत्यू…
मुंबई- मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये गुरुवारी रात्री तीन पत्रकारांवर हल्ला झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविणाऱ्या राज्यात नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह कोणाच्याही जीविताची शाश्वती आता उरलेली नाही असे हळूहळू स्पष्ट होते आहे
हे तीनही पत्रकार काल रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळीच एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मुंबईत मारहाण करण्यात आली होती. त्याचसोबत कॅमे-याची तोडफोड करून कॅमेरामनलाही मारहाण झाली होती. 24 तासांत 5-6 पत्रकारांवर मुंबईसारख्या महानगरात हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे तीनही पत्रकार काल रात्री पोलिसांनी छापा मारलेल्या बारचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळीच एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला मुंबईत मारहाण करण्यात आली होती. त्याचसोबत कॅमे-याची तोडफोड करून कॅमेरामनलाही मारहाण झाली होती. 24 तासांत 5-6 पत्रकारांवर मुंबईसारख्या महानगरात हल्ला झाल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राघवेंद्र दुबे असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव असून, ते मीरा-भाईंदरमधील एका साप्ताहिकाचे संपादक होते. तर, शशी शर्मा आणि संतोष मिश्रा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी एका बारवर छापा टाकला. बारवर टाकलेल्या धाडीची बातमी कव्हर करण्यासाठी पत्रकार तेथे गेले होते. रात्री 1 वाजता पोलिसांनी मीरा भाईंदर रोडवरील व्हाइट हाऊस बिअर बारवर टाकलेल्या धाडीत 15 मुलींना ताब्यात घेतले होते. यावेळी घटना स्थळी शशी शर्मा आणि संतोष मिश्रा वार्तांकनासाठी हजर होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर या दोघांवर हल्ला केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी राघवेंद्र दुबे हे मीरा रोड पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तेथे अनेक बार मालक उपस्थित होते. त्यावेळी पोलिस, बारमालक आणि दुबे यांच्यात बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दुबे यांचा मृतदेह एस. के. स्टोन चौकीजवळ ठिकाणी आढळून आला. त्यावेळी दुबे यांच्या डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. या घटनेत बारमालकांचा सहभाग असावा असे प्रथमदर्शिनी दिसत आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.