मुंबई
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादात बॉलिवूडचा सुप्पर अभिनेता सलमान खान यानेही गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमाननं पाठिंबा दर्शवला असून चौहान यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा देणाऱ्या प्रशासनाला मात्र याबाबत काहीच म्हणायचे नसल्याचे दिसते
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारनं ‘महाभारत’फेम गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केली आहे. मात्र, चौहान हे या पदास पात्र नसल्याचं सांगत संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीविरोधात महिन्याहून अधिक काळापासून आंदोलन उभारले आहे. बॉलिवूडमधील नामवंत नट-नट्यांनीही विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरत चौहान यांच्या नियुक्तीवर फेरविचार करण्याची मागणी सरकारकडं केली आहे. सलमाननंही त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे. ‘हिंदी चित्रपटसृष्टी आज ज्या स्थानी आहे, ते स्थान मिळवण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं त्यांच्या भावना समजून घेऊन चौहान यांनी स्वत:हून बाजूला व्हायला हवं,’ असं सलमान म्हणाला.