मुंबई :
दहीहंडीचा थर २० फुटाचाच राहील आणि या खेळात १८ वर्षाखालील मुलांचा समावेश करता येणार नाही या निर्णयावर आता मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे दहीहंडीचे थर 35 फूट करावी तसंच 14 वर्षांवरील मुलामुलींना सहभागी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना 20 फूट उंचीचेच थर लावता येतील आणि 18 वर्षांखालील मुलांचा समावेश करता येणार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे गेल्या वर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले होते. पण गोविंदा पथकाच्या मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने त्यावरील तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्बंधांवर शिक्कामोर्तब केलं आहे.दहीहंडीचा घातक खेळांमध्ये समावेश करा;कारवाईसाठी मुंबई पोलिस कायद्यात दुरुस्ती करावी;धर्मादाय आयुक्तांनी आयोजकांना मिळणाऱ्या पैशांची चौकशी करावी;जखमी गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी असे निर्देश हि न्यायालयाने दिले आहेत