मुंबई – केवळ सेल्फी काढून आणि भाषणात भाई और बहनो असा उल्लेख करुन महिलां-भगिनींची सुरक्षा होणार काय ? असा सवाल नाही.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे महिला सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलली गेली पाहिजेत.असे प्रतिपादन करीत या भावा-बहिणीच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील महिलां-भगिनींच्या सुरक्षितेची जबाबदारी राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी घ्यावी यासाठी बहिणीच्या नात्याने या राख्यांची पाठविणी करीत आहे असे त्यांनी म्हटलेआहे
महिला सुरक्षेच्या या गंभीर प्रश्नाकडे राखीबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथून त्यांना राख्यांची पाठवणी करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की आज राखी पोर्णिमा, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण आहे. या निमित्ताने बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. वर्षानु-वर्षे ही परंपरां सुरु आहे. परुंतु सध्या राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या “एनसीआरबीच्या’ रिपोर्ट राज्यातील महिलांची स्थिती दर्शविण्यास पुरेसा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपण घेतो त्या शिवरायांनी देखील कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा साडी-चोळी देऊन सन्मान केला होता.या शिवरायांच्या भूमीत महिलांची सुरक्षिता धोक्यात आलेली आहे. ही बाब आपल्या पुरोगामी राज्याच्या दृष्टीने लाजीरवाणी आहे. केवळ सेल्फी काढून आणि भाषणात भाई और बहनो असा उल्लेख करुन महिलां-भगिनींची सुरक्षा होणार नाही. त्यासाठी कठोर पाऊले उचलली गेली पाहिजेत. या भावा-बहिणीच्या सणाच्या निमित्ताने राज्यातील महिलां-भगिनींच्या सुरक्षितेची जबाबदारी राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी घ्यावी यासाठी बहिणीच्या नात्याने या राख्यांची पाठविणी करीत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आ.सुनील तटकरे यांना राख्या बांधून राखीबंधन साजरे केले.