नाशिक – कुंभमेळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच एका साध्वीनं व्यासपीठावरच गोंधळ घातला. पुरुष साधूंच्या बरोबरीने महिला साध्वींना सन्मान मिळालाच पाहिजे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांपुढील माईक ओढून घेण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला साध्वींच्या आखाड्याला मान्यता मिळावी अशी मागणी करत साध्वीने गोंधळ घातला.25 सप्टेंबरला त्याचा समारोप होणार आहे. आज पहाटे या ठिकाणी ध्वजारोहण होताच साध्वींच्या एका संघटनेने बंडाचा ध्वज फडकावत या सोहळ्यात पुरुष साधूंच्या बरोबरीने सन्मान देण्याची अपेक्षा व्यक्त केली केली. शिवाय त्यांनी वेगळ्या आखाड्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर शाही स्नानासाठी जागेची मागणीसुद्धा केली आहे. या मागणीसाठी साध्वींनी आज झालेल्या सोहळ्यात थेट व्यासपीठावर जाऊन गोंधळ घातला.या बाबत साध्वी त्रिकाल भैरवनाथ सरस्वती महाराज म्हणाल्या , ‘‘ वेगळ्या आखाड्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांपासून ते मंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले होते. पण, मेळा सुरू झाला तरीही त्याची पूर्तता केली गेली नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिला या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतात. असे असताना महिला साधू या पुरुष साधूच्या एकाही आखाड्याचा भाग नाहीत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र आखाडा मिळायलाच हवा. आम्हाला जर स्वतंत्र आखाडा मिळाला तर या ठिकाणी अजून 15 हजार स्वाधी येणार आहेत’’, असेही त्या म्हणाल्या
कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी अनेक मान्यवरांना चोरट्यांनी आपले हिसके दाखविले दागिने पाकिटे — मोबा ईल यांच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या , मीडियातील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार हि घडला