मुंबई –
पलूस कडेगाव मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. विश्वजीत पतंगराव कदम यांनी बुधवारी मुंबईत विधिमंडळात आमदारकीची शपध घेतली. काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. पतंगराव कदम यांची काम करण्याची धडाडी आणि पक्षनिष्ठा यांचा आदर्श ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून, अशी ग्वाही डाॅ. विश्वजीत कदम यांनी या वेळी दिली.
विधानसभेचे सभापती हरिभाऊ बगाडे यांनी डाॅ. विश्वजीत कदम यांना आमदारकीची शपध दिली. कदम कुटुंबीयांसह मोहनदादा कदम, डाॅ. शिवाजीराव कदम यांच्यासह मतदारसंघातील स्धानिक नेते-कार्यकर्ते या वेळी आवर्जून उपस्थित होते. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार प्रदीप रणपिसे, हुसेन दलवाई, प्रणिती शिंदे, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
विधिमंडळातील काॅंग्रेसच्या कार्यालयात या वेळी डाॅ. विश्वजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. तरूण धडाडीचे नेतृत्व म्हणून डाॅ. विश्वजीत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करतील, त्यांना राजकारणात उज्ज्वल व दीर्घ पल्ल्याचे भवितव्य असून, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यांत आला.
स्व. पतंगराव कदम यांची काम करण्याची धडाडी आणि पक्षनिष्ठा यांचा आदर्श ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही डाॅ. विश्वजीत कदम यांनी या वेळी दिली.
शेतकरी समस्या, युवकांच्या समस्या, महिला-अल्पसंख्याक घटक आदींसाठी मी कायमच झटेन. तसेच, पलूस – कडेगाव आणि सांगली जिल्हा केंद्रस्थानी ठेवून विधिमंडळाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून विकासाभिमुख काम करेन, असेही डाॅ. विश्वजीत कदम म्हणाले.
डाॅ. विश्वजीत कदम यांनी घेतली आमदारकीची शपथ
Date: