आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, आपले अनुभव सांगत, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत.
आजच्या या नवीन युगात वारी ,वारकरी , संत त्यांचे अभंग हे काळानुरूप काही अंशी लोप पावत चालले आहेत . त्याच प्रमाणे आजचा शहरातील आणि ग्रामीण भागातील तरुण वर्ग या सर्व गोष्टींपासून वंचित होत आहे . संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ , संत नामदेव , संत तुकाराम हे कोण होते , त्यांनी काय काम केल आहे , त्यांनी त्यांच्या रचना द्वारे समाजाला काय शिकवण दिली या गोष्टी कालांतराने लोप पावतील या विचाराने जेष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे आणि त्यांची कन्या पार्श्वगायिका सोनाली चंद्रात्रे पटेल यांनी या संतांनी लिहिलेल्या मूळ अभंगाना धक्का न देता , मात्र आजच्या पिढीला समजतील , भावतील आणि मुख्य म्हणजे त्या तालावर हि पिढी सुद्धा मंत्रमुग्ध होईल, या परीने नाविन्य पूर्ण संगीताचा साज चढवत ” तुका आकाशा एवढा “ या कार्यक्रमाची आणि अल्बम ची निर्मिती केली आहे .
या कार्यक्रमाचे वैशिठ्य म्हणजे ओवी , अभंग रचना या जरी मूळ स्वरूपात असतील तरीही , त्याची चाल आणि मुख्य म्हणजे त्याचे संगीत हे आजच्या जमान्यातील तंत्र आणि वाद्ये वाजवून केले आहे . मूळ स्वरूपातील मृदुंग , पायपेटी हि वाद्ये आहेतच पण तबला , ड्रम ,बासरी ,सतार, वोइलिन,संतूर , गिटार , नाशिक ढोल , दक्षिणात्य खोळ , घट्टम या सारख्या अनेक नाविण्यपूर्ण वाद्यांचा वापर या रचना करताना केला आहे . यातील गवळण दक्षिणात्य संगीताचा ठेका देत उत्तम जमून आली आहे .
संत तुकाराम यांचे चरित्र , भक्तिमार्ग , त्यांचा जन्मापासून वैकुन्ठ्गमनाचा प्रवास , त्यांच्या साध्या सोप्या रचना , त्यांचे अभंगवाणीने समाजाला पोहचवलेले अंधश्रद्धा निर्मुलन सुधारीत विचार , हे आजच्या काळात , सर्वांपर्यंत पोहचवण महत्वाचे वाटले आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ , संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या मुळ ४५०० अभंगांपैकी निवडक तसेच न ऐकलेले , नवीन अभंग रचना यांना , पूर्णपणे नवीन संगीताचा साज चढवत , पार्श्वगायिका सोनाली चंद्रात्रे पटेल यांनी आपल्या सुमधुर आवाजाने आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या नाविन्य पूर्ण संगीताने ” तुका आकाशा एवढा ” हा अल्बम भक्त मंडळींसाठी रेकॉर्ड केला . तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले . या गाण्यांचा अल्बम निर्माते प्रीतीश चंद्रात्रे यांनी रिदमसॉफ्ट एंटरटेनमेंट या ब्यानर खाली सर्वप्रथम बनवला आणि ६व्या चित्र पदार्पण पुरस्कार सोहळ्यामध्ये 2016 , सर्वोकृष्ठ गायिका ( सोनाली चंद्रात्रे पटेल) , सर्वोकृष्ठ संगीतकार ( श्रीकृष्ण चंद्रात्रे ) आणि सर्वोकृष्ठ अल्बम ( तुका आकाशा एवढा ) हि नामांकने मिळून” तुका आकाशा एवढा ” हा या सोहळ्यातील सर्वोकृष्ठ अल्बम ठरला .
हीच यशोगाथा पुढे सुरु ठेवत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार्श्वगायिका सोनाली चंद्रात्रे पटेल हा कार्यक्रम तरुणाई आणि वारकरी सांप्रदायासाठी लाइव स्वरूपात आणत आहेत. आणि हा कार्यक्रम गावोगावी जाऊन करण्याचा त्यांचा मानस आहे . या कार्यक्रमात गायिका व सूत्रधार , पार्श्वगायिका सोनाली चंद्रात्रे पटेल आहेत आणि सह गायक ज्ञानेश्वर कासार हे आहेत . या कार्यक्रमात कीर्तनरंगरुपी निरुपण आणि संगीत , श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी केले आहे , यात संत तुकारामांचे ” तुका आकाशा एवढा ” , संत एकनाथांचे ” देव माझे मन लागो तुझ्या चरणी ” , संत ज्ञानेश्वर यांचे ” अवघाची संसार सुखाचा करीन ” आणि संत नामदेव यांचे ” नाथ नको रे अंतरु ” अश्या अनेक भक्तिमय रचनांचा समावेश आहे
थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आंनद घेण्यासाठी ” तुका आकाशा एवढा “ हा श्रवणीय संगीतमय कार्यक्रम , धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था , मंदिरे यांच्यासाठी तर आहेच पण मुख्यत्वे करून आजच्या तरुणाईहि यावर ताल धरेल आणि त्यांची हि एकादशीसुद्धा भक्तिमय आणि मंत्रमुग्ध होईल .