पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेल ने फसवणूक आणि खोटेपणा केल्याची तक्रार मुख्य निर्वाचन अधिकारी यांच्याकडे सुनील महाजन , राजीव बर्वे , योगेश सोमण , आणि प्रमोद आडकर यांनी केली आहे .
सुनील महाजन यांनी म्हटले आहे कि , माधव राजगुरू ,प्रभाकर संत , सुरेश देशपांडे, आणि जयंत येलूलकर हे बिनविरोध निवडून अआलेले नवनिर्माण पॅनेल चे असताना ते आपल्याच परिवर्तन पॅनेलचे असल्याचे वृत्तपत्रांना खोटी बातमी पुरविण्यात आली . आमच्याकडे ते नवनिर्माण पॅनेल चे उमेदवार असल्याचा पुरावा आहे . यामुळे परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आम्ही केल्याचे महाजन यांनी सांगितले .